शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
3
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
4
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
5
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
6
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
7
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
8
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
9
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
10
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
11
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
12
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
13
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
14
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
15
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
16
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
17
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
18
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
19
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
20
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!

राजापूर पंचायत समितीत सभापती, उपसभापती बदलाचे वारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:22 IST

राजापूर : यापूर्वी निश्चित करण्यात आलेल्या सुत्रानुसार राजापूर पंचायत समितीमध्ये सभापती व उपसभापती बदलाचे वारे वाहू लागले आहेत. राजापूर ...

राजापूर : यापूर्वी निश्चित करण्यात आलेल्या सुत्रानुसार राजापूर पंचायत समितीमध्ये सभापती व उपसभापती बदलाचे वारे वाहू लागले आहेत. राजापूर पंचायत समितीच्या पुढील सभापती पदासाठी कोंड्ये तर्फ सौंदळच्या सदस्य करुणा कदम तर उपसभापती पदासाठी पाचलच्या सदस्य अमिता सुतार यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

राजापूर पंचायत समितीमध्ये शिवसेनेची एकहाती सत्ता असून, १२पैकी ९ सदस्य शिवसेनेकडून निवडून आले होते तर काॅंग्रेसकडून एक तर राष्ट्रवादीकडून दोन सदस्य विजयी झाले होते. मधल्या कालखंडात राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष आत्माराम सुतार यांनी पक्षाचा त्याग करुन शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांच्या पत्नी अमिता सुतार या पाचल पंचायत समिती गणातून निवडून आल्या होत्या. त्यांनीही पतीसमवेत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे राजापूर पंचायत समितीमध्ये शिवसेनेचे संख्याबळ वाढून १० झाले आहे.

राजापूर पंचायत समितीचे सभापतीपद पहिल्या अडीच वर्षांसाठी नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाले होते तर पुढील अडीच वर्षांसाठी सर्वसाधारण महिला असे आरक्षण जाहीर झाले होते. शिवसेनेत तीन महिला सदस्य सभापती पदासाठी जोरदार आग्रही असल्याने प्रत्येकी आठ महिन्यांचा कालावधी तिघांना समान वाटून देण्याचा निर्णय घेण्यात आला हाेता. त्यानुसार पहिली संधी ओझर पंचायत समितीच्या सदस्य विशाखा लाड यांना देण्यात आली होती. त्यानंतर केळवली गणातील प्रमिला कानडे यांना दुसऱ्यावेळी संधी देण्यात आली हाेती. त्यांचाही कालखंड संपत आल्याने सभापती व उपसभापती बदलाचे वारे वाहू लागले आहेत.

पुढील वर्षी हाेणाऱ्या जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शिवसेनेकडून माेर्चेबांधणी सुरू आहे. आगामी निवडणुका डाेळ्यासमाेर ठेवून सभापती व उपसभापती यांचे राजीनामे घेऊन नवीन सदस्यांना संधी देण्याच्या विचारात पक्ष आहे. त्यामुळे सभापती, उपसभापती बदल हाेणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

तसेच ठरलेल्या सुत्रानुसार कोंड्ये तर्फ सौंदळ गणातील करुणा कदम यांना सभापतीपद तर पाचलच्या सदस्य अमिता सुतार यांना उपसभापतीपद देण्याचे ठरल्याची चर्चा आहे. मात्र, राज्यातील सत्तेत दोन्ही काॅंग्रेसची शिवसेनेशी महाविकास आघाडी असल्याने पंचायत समितीमध्ये उपसभापतीपद मिळावे, अशी मागणी दोन्ही काॅंग्रेसकडून गेल्यावेळी करण्यात आली होती. मात्र, पूर्ण सत्ता असलेल्या शिवसेनेने दोन्ही काॅंग्रेसच्या मागणीला अर्जुनाचा घाट दाखवला होता. त्यामुळे आता शिवसेना दाेघांपैकी एकाला संधी देणार की पुन्हा पदापासून लांब ठेवणार, हेच पाहायचे आहे.