शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

राजापूर पंचायत समितीत सभापती, उपसभापती बदलाचे वारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:22 IST

राजापूर : यापूर्वी निश्चित करण्यात आलेल्या सुत्रानुसार राजापूर पंचायत समितीमध्ये सभापती व उपसभापती बदलाचे वारे वाहू लागले आहेत. राजापूर ...

राजापूर : यापूर्वी निश्चित करण्यात आलेल्या सुत्रानुसार राजापूर पंचायत समितीमध्ये सभापती व उपसभापती बदलाचे वारे वाहू लागले आहेत. राजापूर पंचायत समितीच्या पुढील सभापती पदासाठी कोंड्ये तर्फ सौंदळच्या सदस्य करुणा कदम तर उपसभापती पदासाठी पाचलच्या सदस्य अमिता सुतार यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

राजापूर पंचायत समितीमध्ये शिवसेनेची एकहाती सत्ता असून, १२पैकी ९ सदस्य शिवसेनेकडून निवडून आले होते तर काॅंग्रेसकडून एक तर राष्ट्रवादीकडून दोन सदस्य विजयी झाले होते. मधल्या कालखंडात राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष आत्माराम सुतार यांनी पक्षाचा त्याग करुन शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांच्या पत्नी अमिता सुतार या पाचल पंचायत समिती गणातून निवडून आल्या होत्या. त्यांनीही पतीसमवेत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे राजापूर पंचायत समितीमध्ये शिवसेनेचे संख्याबळ वाढून १० झाले आहे.

राजापूर पंचायत समितीचे सभापतीपद पहिल्या अडीच वर्षांसाठी नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाले होते तर पुढील अडीच वर्षांसाठी सर्वसाधारण महिला असे आरक्षण जाहीर झाले होते. शिवसेनेत तीन महिला सदस्य सभापती पदासाठी जोरदार आग्रही असल्याने प्रत्येकी आठ महिन्यांचा कालावधी तिघांना समान वाटून देण्याचा निर्णय घेण्यात आला हाेता. त्यानुसार पहिली संधी ओझर पंचायत समितीच्या सदस्य विशाखा लाड यांना देण्यात आली होती. त्यानंतर केळवली गणातील प्रमिला कानडे यांना दुसऱ्यावेळी संधी देण्यात आली हाेती. त्यांचाही कालखंड संपत आल्याने सभापती व उपसभापती बदलाचे वारे वाहू लागले आहेत.

पुढील वर्षी हाेणाऱ्या जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शिवसेनेकडून माेर्चेबांधणी सुरू आहे. आगामी निवडणुका डाेळ्यासमाेर ठेवून सभापती व उपसभापती यांचे राजीनामे घेऊन नवीन सदस्यांना संधी देण्याच्या विचारात पक्ष आहे. त्यामुळे सभापती, उपसभापती बदल हाेणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

तसेच ठरलेल्या सुत्रानुसार कोंड्ये तर्फ सौंदळ गणातील करुणा कदम यांना सभापतीपद तर पाचलच्या सदस्य अमिता सुतार यांना उपसभापतीपद देण्याचे ठरल्याची चर्चा आहे. मात्र, राज्यातील सत्तेत दोन्ही काॅंग्रेसची शिवसेनेशी महाविकास आघाडी असल्याने पंचायत समितीमध्ये उपसभापतीपद मिळावे, अशी मागणी दोन्ही काॅंग्रेसकडून गेल्यावेळी करण्यात आली होती. मात्र, पूर्ण सत्ता असलेल्या शिवसेनेने दोन्ही काॅंग्रेसच्या मागणीला अर्जुनाचा घाट दाखवला होता. त्यामुळे आता शिवसेना दाेघांपैकी एकाला संधी देणार की पुन्हा पदापासून लांब ठेवणार, हेच पाहायचे आहे.