शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

राजापूर पंचायत समितीत सभापती, उपसभापती बदलाचे वारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:22 IST

राजापूर : यापूर्वी निश्चित करण्यात आलेल्या सुत्रानुसार राजापूर पंचायत समितीमध्ये सभापती व उपसभापती बदलाचे वारे वाहू लागले आहेत. राजापूर ...

राजापूर : यापूर्वी निश्चित करण्यात आलेल्या सुत्रानुसार राजापूर पंचायत समितीमध्ये सभापती व उपसभापती बदलाचे वारे वाहू लागले आहेत. राजापूर पंचायत समितीच्या पुढील सभापती पदासाठी कोंड्ये तर्फ सौंदळच्या सदस्य करुणा कदम तर उपसभापती पदासाठी पाचलच्या सदस्य अमिता सुतार यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

राजापूर पंचायत समितीमध्ये शिवसेनेची एकहाती सत्ता असून, १२पैकी ९ सदस्य शिवसेनेकडून निवडून आले होते तर काॅंग्रेसकडून एक तर राष्ट्रवादीकडून दोन सदस्य विजयी झाले होते. मधल्या कालखंडात राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष आत्माराम सुतार यांनी पक्षाचा त्याग करुन शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांच्या पत्नी अमिता सुतार या पाचल पंचायत समिती गणातून निवडून आल्या होत्या. त्यांनीही पतीसमवेत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे राजापूर पंचायत समितीमध्ये शिवसेनेचे संख्याबळ वाढून १० झाले आहे.

राजापूर पंचायत समितीचे सभापतीपद पहिल्या अडीच वर्षांसाठी नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाले होते तर पुढील अडीच वर्षांसाठी सर्वसाधारण महिला असे आरक्षण जाहीर झाले होते. शिवसेनेत तीन महिला सदस्य सभापती पदासाठी जोरदार आग्रही असल्याने प्रत्येकी आठ महिन्यांचा कालावधी तिघांना समान वाटून देण्याचा निर्णय घेण्यात आला हाेता. त्यानुसार पहिली संधी ओझर पंचायत समितीच्या सदस्य विशाखा लाड यांना देण्यात आली होती. त्यानंतर केळवली गणातील प्रमिला कानडे यांना दुसऱ्यावेळी संधी देण्यात आली हाेती. त्यांचाही कालखंड संपत आल्याने सभापती व उपसभापती बदलाचे वारे वाहू लागले आहेत.

पुढील वर्षी हाेणाऱ्या जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शिवसेनेकडून माेर्चेबांधणी सुरू आहे. आगामी निवडणुका डाेळ्यासमाेर ठेवून सभापती व उपसभापती यांचे राजीनामे घेऊन नवीन सदस्यांना संधी देण्याच्या विचारात पक्ष आहे. त्यामुळे सभापती, उपसभापती बदल हाेणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

तसेच ठरलेल्या सुत्रानुसार कोंड्ये तर्फ सौंदळ गणातील करुणा कदम यांना सभापतीपद तर पाचलच्या सदस्य अमिता सुतार यांना उपसभापतीपद देण्याचे ठरल्याची चर्चा आहे. मात्र, राज्यातील सत्तेत दोन्ही काॅंग्रेसची शिवसेनेशी महाविकास आघाडी असल्याने पंचायत समितीमध्ये उपसभापतीपद मिळावे, अशी मागणी दोन्ही काॅंग्रेसकडून गेल्यावेळी करण्यात आली होती. मात्र, पूर्ण सत्ता असलेल्या शिवसेनेने दोन्ही काॅंग्रेसच्या मागणीला अर्जुनाचा घाट दाखवला होता. त्यामुळे आता शिवसेना दाेघांपैकी एकाला संधी देणार की पुन्हा पदापासून लांब ठेवणार, हेच पाहायचे आहे.