शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत पुन्हा कडक लाॅकडाऊन होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:22 IST

रत्नागिरी : चौथ्या स्तरात लाॅकडाऊन शिथील केल्यानंतर कोरोना रूग्णसंख्या कमी होतेय, असा दिलासा मिळत असतानाच अचानक २२ जून रोजीच्या ...

रत्नागिरी : चौथ्या स्तरात लाॅकडाऊन शिथील केल्यानंतर कोरोना रूग्णसंख्या कमी होतेय, असा दिलासा मिळत असतानाच अचानक २२ जून रोजीच्या अहवालात एकदम ९,१९५ रूग्ण २४ तासात वाढले. त्यामुळे ४८,७३१वरून जिल्ह्याची रूग्णसंख्या ५७,९२६ झाल्याने जिल्हा हादरला. रूग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने त्यातच आता मुख्यमंत्र्यांनी कोरोना रूग्ण वाढलेल्या सात जिल्ह्यांना निर्बंध शिथील करण्याची घाई करू नका, असे सुनावल्याने आता पुन्हा रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा कडक लाॅकडाऊन करण्याची वेळ येणार का, अशी संभ्रमावस्था नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील बाधित रूग्ण आणि कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या यात तफावत असल्याचे दिसू लागले आहे. आधीच कोरोनाच्या रूग्णांची संख्या दरदिवशी ५०० ते ७०० दरम्यान येत आहे. असे असताना २१ रोजीच्या आकडेवारीत एकूण रूग्णांची संख्या ४८,७२१ नमूद केली होती. मात्र, २२ रोजी सापडलेल्या रूग्णांची संख्या ५१९ आणि एकूण रूग्णांची संख्या ५७,९२६ एवढी नमूद करण्यात आल्याने एका दिवसात नेमके सापडले किती, हा प्रश्न निर्माण झाला. याबाबत जिल्हा प्रशासनाने स्पष्ट करताना रत्नागिरी जिल्ह्यातील रहिवासी असणाऱ्या राज्यभरातील इतर रूग्णांचा समावेश शासनाच्या कोविड १९ पोर्टलवर होत असल्याचे सांगितले. याचदिवशी जिल्ह्यात डेल्टा प्लसचे ९ रूग्ण सापडल्याचा गौप्यस्फाेट आरोग्यमंत्री डाॅ. राजेश टोपे यांनी केला. त्यामुळे पोर्टलवरील रूग्णसंख्येत दिसणारी वाढ लक्षात घेता, पुन्हा लाॅकडाऊन होणार की काय, ही भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

संगमेश्वर तालुक्यातील डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या रूग्णांनी जिल्ह्याची चिंता वाढवली असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या वाढती आहे, अशा रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि हिंगोली या जिल्ह्यांमधील निर्बंध उठविण्याची घाई नको, असे या जिल्हा प्रशासनांना गुरूवारी झालेल्या व्हीसीत बजावले आहे. त्यामुळे आता पुन्हा या जिल्ह्यांवर कडक निर्बंध लादले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

डेल्टा प्लस व्हेरिएंट रूग्णाच्या मृत्यूने काळजी वाढली

संगमेश्वर तालुक्यात सापडलेल्या ९ व्हेरिएंट रूग्णांपैकी आठ रूग्ण बरे झाले असले तरी आरोग्य विभागाकडून एका महिला रूग्णाचा मृत्यू १३ रोजी झाल्याचे शुक्रवारी जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले. त्यामुळे आता पुन्हा चिंतेचे वातावरण पसरले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी या सात जिल्ह्यांना डेल्टा प्लसच्या अनुषंगाने अधिक सतर्क राहण्याच्या सूचना दिल्याने लाॅकडाऊनचे संकेत मिळत आहेत.

व्हिडीओमुळे संभ्रम

उच्च् व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा जिल्ह्यात दि. १ ते ८ जुलै या कालावधीत कडक निर्बंध घालण्यात येणार असल्याचा एका वृत्त वाहिनीवरील जुन्या मुलाखतीचा व्हिडीओ शुक्रवारी वेगाने व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संभ्रम निर्माण झाला. अखेर ही मुलाखत गेल्यावर्षीची असल्याचे स्पष्ट झाल्याने नागरिकांना हायसे वाटले.