शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

रत्नागिरीत पुन्हा कडक लाॅकडाऊन होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:22 IST

रत्नागिरी : चौथ्या स्तरात लाॅकडाऊन शिथील केल्यानंतर कोरोना रूग्णसंख्या कमी होतेय, असा दिलासा मिळत असतानाच अचानक २२ जून रोजीच्या ...

रत्नागिरी : चौथ्या स्तरात लाॅकडाऊन शिथील केल्यानंतर कोरोना रूग्णसंख्या कमी होतेय, असा दिलासा मिळत असतानाच अचानक २२ जून रोजीच्या अहवालात एकदम ९,१९५ रूग्ण २४ तासात वाढले. त्यामुळे ४८,७३१वरून जिल्ह्याची रूग्णसंख्या ५७,९२६ झाल्याने जिल्हा हादरला. रूग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने त्यातच आता मुख्यमंत्र्यांनी कोरोना रूग्ण वाढलेल्या सात जिल्ह्यांना निर्बंध शिथील करण्याची घाई करू नका, असे सुनावल्याने आता पुन्हा रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा कडक लाॅकडाऊन करण्याची वेळ येणार का, अशी संभ्रमावस्था नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील बाधित रूग्ण आणि कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या यात तफावत असल्याचे दिसू लागले आहे. आधीच कोरोनाच्या रूग्णांची संख्या दरदिवशी ५०० ते ७०० दरम्यान येत आहे. असे असताना २१ रोजीच्या आकडेवारीत एकूण रूग्णांची संख्या ४८,७२१ नमूद केली होती. मात्र, २२ रोजी सापडलेल्या रूग्णांची संख्या ५१९ आणि एकूण रूग्णांची संख्या ५७,९२६ एवढी नमूद करण्यात आल्याने एका दिवसात नेमके सापडले किती, हा प्रश्न निर्माण झाला. याबाबत जिल्हा प्रशासनाने स्पष्ट करताना रत्नागिरी जिल्ह्यातील रहिवासी असणाऱ्या राज्यभरातील इतर रूग्णांचा समावेश शासनाच्या कोविड १९ पोर्टलवर होत असल्याचे सांगितले. याचदिवशी जिल्ह्यात डेल्टा प्लसचे ९ रूग्ण सापडल्याचा गौप्यस्फाेट आरोग्यमंत्री डाॅ. राजेश टोपे यांनी केला. त्यामुळे पोर्टलवरील रूग्णसंख्येत दिसणारी वाढ लक्षात घेता, पुन्हा लाॅकडाऊन होणार की काय, ही भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

संगमेश्वर तालुक्यातील डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या रूग्णांनी जिल्ह्याची चिंता वाढवली असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या वाढती आहे, अशा रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि हिंगोली या जिल्ह्यांमधील निर्बंध उठविण्याची घाई नको, असे या जिल्हा प्रशासनांना गुरूवारी झालेल्या व्हीसीत बजावले आहे. त्यामुळे आता पुन्हा या जिल्ह्यांवर कडक निर्बंध लादले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

डेल्टा प्लस व्हेरिएंट रूग्णाच्या मृत्यूने काळजी वाढली

संगमेश्वर तालुक्यात सापडलेल्या ९ व्हेरिएंट रूग्णांपैकी आठ रूग्ण बरे झाले असले तरी आरोग्य विभागाकडून एका महिला रूग्णाचा मृत्यू १३ रोजी झाल्याचे शुक्रवारी जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले. त्यामुळे आता पुन्हा चिंतेचे वातावरण पसरले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी या सात जिल्ह्यांना डेल्टा प्लसच्या अनुषंगाने अधिक सतर्क राहण्याच्या सूचना दिल्याने लाॅकडाऊनचे संकेत मिळत आहेत.

व्हिडीओमुळे संभ्रम

उच्च् व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा जिल्ह्यात दि. १ ते ८ जुलै या कालावधीत कडक निर्बंध घालण्यात येणार असल्याचा एका वृत्त वाहिनीवरील जुन्या मुलाखतीचा व्हिडीओ शुक्रवारी वेगाने व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संभ्रम निर्माण झाला. अखेर ही मुलाखत गेल्यावर्षीची असल्याचे स्पष्ट झाल्याने नागरिकांना हायसे वाटले.