शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

रत्नागिरीत पुन्हा कडक लाॅकडाऊन होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:22 IST

रत्नागिरी : चौथ्या स्तरात लाॅकडाऊन शिथील केल्यानंतर कोरोना रूग्णसंख्या कमी होतेय, असा दिलासा मिळत असतानाच अचानक २२ जून रोजीच्या ...

रत्नागिरी : चौथ्या स्तरात लाॅकडाऊन शिथील केल्यानंतर कोरोना रूग्णसंख्या कमी होतेय, असा दिलासा मिळत असतानाच अचानक २२ जून रोजीच्या अहवालात एकदम ९,१९५ रूग्ण २४ तासात वाढले. त्यामुळे ४८,७३१वरून जिल्ह्याची रूग्णसंख्या ५७,९२६ झाल्याने जिल्हा हादरला. रूग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने त्यातच आता मुख्यमंत्र्यांनी कोरोना रूग्ण वाढलेल्या सात जिल्ह्यांना निर्बंध शिथील करण्याची घाई करू नका, असे सुनावल्याने आता पुन्हा रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा कडक लाॅकडाऊन करण्याची वेळ येणार का, अशी संभ्रमावस्था नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील बाधित रूग्ण आणि कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या यात तफावत असल्याचे दिसू लागले आहे. आधीच कोरोनाच्या रूग्णांची संख्या दरदिवशी ५०० ते ७०० दरम्यान येत आहे. असे असताना २१ रोजीच्या आकडेवारीत एकूण रूग्णांची संख्या ४८,७२१ नमूद केली होती. मात्र, २२ रोजी सापडलेल्या रूग्णांची संख्या ५१९ आणि एकूण रूग्णांची संख्या ५७,९२६ एवढी नमूद करण्यात आल्याने एका दिवसात नेमके सापडले किती, हा प्रश्न निर्माण झाला. याबाबत जिल्हा प्रशासनाने स्पष्ट करताना रत्नागिरी जिल्ह्यातील रहिवासी असणाऱ्या राज्यभरातील इतर रूग्णांचा समावेश शासनाच्या कोविड १९ पोर्टलवर होत असल्याचे सांगितले. याचदिवशी जिल्ह्यात डेल्टा प्लसचे ९ रूग्ण सापडल्याचा गौप्यस्फाेट आरोग्यमंत्री डाॅ. राजेश टोपे यांनी केला. त्यामुळे पोर्टलवरील रूग्णसंख्येत दिसणारी वाढ लक्षात घेता, पुन्हा लाॅकडाऊन होणार की काय, ही भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

संगमेश्वर तालुक्यातील डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या रूग्णांनी जिल्ह्याची चिंता वाढवली असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या वाढती आहे, अशा रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि हिंगोली या जिल्ह्यांमधील निर्बंध उठविण्याची घाई नको, असे या जिल्हा प्रशासनांना गुरूवारी झालेल्या व्हीसीत बजावले आहे. त्यामुळे आता पुन्हा या जिल्ह्यांवर कडक निर्बंध लादले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

डेल्टा प्लस व्हेरिएंट रूग्णाच्या मृत्यूने काळजी वाढली

संगमेश्वर तालुक्यात सापडलेल्या ९ व्हेरिएंट रूग्णांपैकी आठ रूग्ण बरे झाले असले तरी आरोग्य विभागाकडून एका महिला रूग्णाचा मृत्यू १३ रोजी झाल्याचे शुक्रवारी जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले. त्यामुळे आता पुन्हा चिंतेचे वातावरण पसरले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी या सात जिल्ह्यांना डेल्टा प्लसच्या अनुषंगाने अधिक सतर्क राहण्याच्या सूचना दिल्याने लाॅकडाऊनचे संकेत मिळत आहेत.

व्हिडीओमुळे संभ्रम

उच्च् व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा जिल्ह्यात दि. १ ते ८ जुलै या कालावधीत कडक निर्बंध घालण्यात येणार असल्याचा एका वृत्त वाहिनीवरील जुन्या मुलाखतीचा व्हिडीओ शुक्रवारी वेगाने व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संभ्रम निर्माण झाला. अखेर ही मुलाखत गेल्यावर्षीची असल्याचे स्पष्ट झाल्याने नागरिकांना हायसे वाटले.