शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

पहिलीसाठी विद्यार्थ्याचे वय कमी होणार?

By admin | Updated: October 26, 2014 23:25 IST

किमान पाच वर्ष अकरा महिने ठेवण्याचा निर्णय विचाराधीन

रत्नागिरी : पहिलीमध्ये विद्यार्थ्याला प्रवेश देताना वयाची अट किमान पाच वर्ष अकरा महिने ठेवण्याचा निर्णय विचाराधीन आहे. नवीन शैक्षणिक वर्षात जूनमध्ये प्रवेश देण्यासाठी नवीन अटीची अमंलबजावणी करण्यात येणार आहे. राज्यात नव्याने स्थापन होणाऱ्या शासनाकडून त्यास मान्यता देण्यात येणार आहे.पहिलीच्या प्रवेशासाठी किमान वयाची अट निश्चित करण्यासाठी शिक्षण खात्यातर्फे विविध स्तरावरून संशोधन करण्यात आले होते. त्यासाठी समित्या स्थापन केल्या होत्या. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. पूर्व प्राथमिक व प्राथमिक शिक्षणाच्या पातळीवर वेगवेगळ्या शाळांमध्ये वेगवेगळ्या वयोगटातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. पुणे आणि मुंबईमध्ये शिक्षण हक्क कायद्याच्या आॅनलाईन प्रवेशप्रक्रियेदरम्यान या प्रकारामुळे अनेक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर शालेय प्रवेशासाठी राज्यभरात एक समान धोरण असावे, म्हणून राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक महावीर माने यांच्या एक सदस्यीय समितीला त्यावरील संभाव्य उपायांचा विचार करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यानुसार माने यांच्या समितीने हा अहवाल तयार केला असून सरकारकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे.पहिली प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे अपेक्षित वय, प्रवेशाचे वय कोणत्या तारखेला ग्राह्य धरायचे, याचाही या अहवालाच्या निर्मितीदरम्यान विचार करण्यात आला आहे. त्यानुसार ३१ जुलै रोजी ५ वर्षे ११ महिने पूर्ण करणाऱ्या बालकांनाच पहिलीला प्रवेश दिला जावा, अशा सूचना या अहवालामध्ये करण्यात आल्या आहेत. येत्या शैक्षणिक वर्षामध्ये शिक्षण हक्क कायद्यामधील २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशाबाबतचे वेळापत्रक देखील लवकरच जाहीर केले जाणार आहे. प्राथमिक शिक्षण प्रवेशासाठी किमान साडे तीन वर्षाची अट घालण्यात आली होती. त्यामुळे पहिलीतील पाल्य ६ ते ७ वयोगटातील असे. परंतु वय कमी करण्याच्या निर्णयामुळे सर्वसाधारण पहिलीतील विद्यार्थी किमान ६ वयोगटातील असणार आहे. (प्रतिनिधी)