शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
5
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
6
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
7
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
8
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
9
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
10
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
11
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
12
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
13
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
14
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
15
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
16
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
17
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
18
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
19
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
20
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!

पहिलीसाठी विद्यार्थ्याचे वय कमी होणार?

By admin | Updated: October 26, 2014 23:25 IST

किमान पाच वर्ष अकरा महिने ठेवण्याचा निर्णय विचाराधीन

रत्नागिरी : पहिलीमध्ये विद्यार्थ्याला प्रवेश देताना वयाची अट किमान पाच वर्ष अकरा महिने ठेवण्याचा निर्णय विचाराधीन आहे. नवीन शैक्षणिक वर्षात जूनमध्ये प्रवेश देण्यासाठी नवीन अटीची अमंलबजावणी करण्यात येणार आहे. राज्यात नव्याने स्थापन होणाऱ्या शासनाकडून त्यास मान्यता देण्यात येणार आहे.पहिलीच्या प्रवेशासाठी किमान वयाची अट निश्चित करण्यासाठी शिक्षण खात्यातर्फे विविध स्तरावरून संशोधन करण्यात आले होते. त्यासाठी समित्या स्थापन केल्या होत्या. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. पूर्व प्राथमिक व प्राथमिक शिक्षणाच्या पातळीवर वेगवेगळ्या शाळांमध्ये वेगवेगळ्या वयोगटातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. पुणे आणि मुंबईमध्ये शिक्षण हक्क कायद्याच्या आॅनलाईन प्रवेशप्रक्रियेदरम्यान या प्रकारामुळे अनेक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर शालेय प्रवेशासाठी राज्यभरात एक समान धोरण असावे, म्हणून राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक महावीर माने यांच्या एक सदस्यीय समितीला त्यावरील संभाव्य उपायांचा विचार करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यानुसार माने यांच्या समितीने हा अहवाल तयार केला असून सरकारकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे.पहिली प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे अपेक्षित वय, प्रवेशाचे वय कोणत्या तारखेला ग्राह्य धरायचे, याचाही या अहवालाच्या निर्मितीदरम्यान विचार करण्यात आला आहे. त्यानुसार ३१ जुलै रोजी ५ वर्षे ११ महिने पूर्ण करणाऱ्या बालकांनाच पहिलीला प्रवेश दिला जावा, अशा सूचना या अहवालामध्ये करण्यात आल्या आहेत. येत्या शैक्षणिक वर्षामध्ये शिक्षण हक्क कायद्यामधील २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशाबाबतचे वेळापत्रक देखील लवकरच जाहीर केले जाणार आहे. प्राथमिक शिक्षण प्रवेशासाठी किमान साडे तीन वर्षाची अट घालण्यात आली होती. त्यामुळे पहिलीतील पाल्य ६ ते ७ वयोगटातील असे. परंतु वय कमी करण्याच्या निर्णयामुळे सर्वसाधारण पहिलीतील विद्यार्थी किमान ६ वयोगटातील असणार आहे. (प्रतिनिधी)