शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

कोकणात पक्ष संघटना बळकट करणार

By admin | Updated: August 3, 2016 00:54 IST

राजेंद्र गवई : वेगळ्या विदर्भाला ‘रिपब्लिकन’ही अनुकूल

 रत्नागिरी : सद्यस्थितीत नागपूर विभागाला अनेक मंत्री मिळाले आहेत. मुख्यमंत्रीही याच विभागातील आहेत. त्यामुळे वेगळ्या विदर्भ राज्याला आपोआप अनुकूलता आली आहे. विदर्भ वेगळे राज्य व्हावे, याला आमच्या पक्षाचीही अनुकूलता आहे. त्याआधी या भागाचा विकासही होणे आवश्यक असल्याचे मत रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (गवई गट) चे सरचिटणीस राजेंद्र गवई यांनी आज सायंकाळी येथे मांडले. कोकणचे नेतृत्व करणारे बी. व्ही. पवार यांचे निधन झाल्यानंतर कोकणातील पक्ष संघटनेकडे काहीसे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे पक्ष संघटनेला पुन्हा बळकटी देण्यासाठी कोकणातील हा आपला दौरा असल्याचे गवई म्हणाले. येथील पक्ष कार्यकारिणी येत्या दोन दिवसात पूर्णत: बनवली जाईल. पक्षातर्फे शेतकऱ्यांचे प्रश्न हाती घेतले जाणार असून, बेरोजगारांसाठी नोकरी शिबिरेही घेतली जाणार आहेत. भाषणबाजी नको तर तळागाळात काम करणारे कार्यकर्ते आपल्याला हवे आहेत. रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया हा केवळ बौध्दांचा पक्ष नाही तर सर्वसमावेशक पक्ष असला पाहिजे. त्यासाठी पक्षाला व्यापक स्वरूप देऊन पक्ष मजबूत होऊ शकतो, असेही गवई म्हणाले. गटातटाच्या राजकारणामुळे आंबेडकरी चळवळीचे नुकसान झाले हे खरेच आहे. आम्ही सर्व गटांना एकत्र आणण्याचे प्रयत्नही केले. मात्र, काही गटांना त्यांचे मित्रपक्ष आमच्यापेक्षा अधिक प्रिय आहेत, त्यामुळेच चळवळीची अशी स्थिती झाली आहे, असे गवई म्हणाले. (प्रतिनिधी) आघाडीला इशारा : आम्ही ताकद दाखवून देऊ कॉँग्रेसबरोबर येत्या निवडणूकांमध्ये आघाडीची तयारी आहे. परंतु ही आघाडी सन्मानजनक हवी. त्यासाठी आम्ही सोनिया गांधींपर्यंत पोहोचू. मात्र सन्मानजनक आघाडी झाली नाही तर आमचे धोरण हे ‘हम भी डुबेंगे, तुम्हे भी लेके डुबेंगे’ असे राहील, असा इशाराही राजेंद्र गवई यांनी दिला. गेल्या निवडणूकीत कॉँग्रेस व राष्ट्रवादीने रिपब्लिकन पार्टीला न्याय देण्यात कुठेतरी चूक केली. भाजपने रामदास आठवले, सदाभाऊ खोत, जानकर यांना मंत्रीपदे दिली तर विनायक मेटेंना आमदारकी दिली आणि आपला शब्द पाळला आहे. कॉँग्रेस, राष्ट्रवादीने आम्हाला दिलेले शब्द पाळले नाहीत तर आम्हाला आमची ताकद दाखवून द्यावी लागेल, असे ते म्हणाले.