शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

शाळा दुरुस्ती रखडणार?

By admin | Updated: July 17, 2014 23:53 IST

जिल्हा परिषद : रत्नागिरी तालुक्यात ५८ वर्गखोल्या मोडकळीस

रत्नागिरी : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ४३ प्राथमिक शाळांच्या ५८ वर्गखोल्या मोडकळीस आल्या आहेत. या शाळांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव रत्नागिरी पंचायत समितीकडे देण्यात आले आहेत. प्रस्ताव पाठवले खरे, मात्र यासाठी जिल्हा परिषदेकडे आलेला निधीच अपुरा असल्याने यंदा या मोडकळीस आलेल्या वर्गखोल्या दुरुस्त होतील की नाही, हा प्रश्नच आहे.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण दिले जाते. शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी सर्वशिक्षा अभियानातून कोट्यवधी रुपये दरवर्षी करण्यात येत आहेत. जिल्ह्यात या सर्वशिक्षा अभियानातून सुमारे एक ते दीड हजार वर्गखोल्या बांधण्यात आल्या. मात्र, आता या अभियानातून वर्गखोल्या बांधण्यासाठीचे अनुदान बंद करण्यात आले आहे.रत्नागिरी पंचायत समितीकडून तालुक्यातील मोडकळीस आलेल्या वर्गखोल्यांचे प्रस्ताव शाळांकडून मागविण्यात आले होते. त्याप्रमाणे करबुडे खापरेकोंड, करबुडे मूळगाव, कुरतडे नं. १, तरवळ - बौध्दवाडी, हरचिरी उर्दू, सैतवडे नं. १, कर्ला उर्दू मुलांची, कर्ला मराठी, वाटद नं. १, चवे निवई, देऊड गावातील, देऊड चाटवळ, कोतवडे वारेवाडी, तोणदे आगाशेकोंड, पाली नं. २, तरवळ नं. १, पन्हळी, कोळंबे धामेळे, रीळ, मालगुंड नं.१, खेडशी डफळचोळ, सोमेश्वर कीरबाग, गणेशगुळे, कशेळी नं. १, वाटद मिरवणे, चाफे नं. १, वाटद मिरवणे, चाफे नं. १, देऊड लावगण नं. २, गावखडी गुरववाडी, खानू नं. १, हातखंबा तारवेवाडी, वेळवंड नं. २, चांदोर नं. ५, पावस भाटीवाडी, खालगांव नं. २, वाटद खंडाळा, कोळंबे नं. ३, सांडेलावगण या प्राथमिक शाळांतील वर्गखोल्यांचा दुरुस्तीच्या प्रस्तावांमध्ये समावेश आहे.या वर्गखोल्यांची दुरुस्ती जिल्हा वार्षिक योजनेतून आणि सेसफंडाच्या अनुदानातून करण्यात येते. वर्गखोल्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाला शासनाकडून यंदा केवळ ६० लाख रुपये अनुदान प्राप्त झाले आहे. त्यामुळे या तुटपुंज्या अनुदानातून रत्नागिरी तालुक्यातील दुरुस्तीची किती कामे होणार? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत असून ही दुरुस्ती यंदा रखडण्याची चिन्हे दिसत आहेत. (शहर वार्ताहर)