शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देतबसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
2
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
3
मुंबई मनपा निवडणुकीसाठी DCM एकनाथ शिंदे तयारीला लागले; आनंदराज आंबेडकरांसोबत बैठक, काय ठरले?
4
तुमचा ITR रिफंड अडकला आहे? कधीपर्यंत मिळणार? प्राप्तीकर विभागाकडून मोठी अपडेट
5
१०००, २०००, ३०००, ४०००...स्मार्टफोनच्या विक्रीतून दुकानदार किती कमाई करतात? जाणून घ्या
6
माय-लेकीने मिळून घरच्या कर्त्या पुरुषाला संपवलं अन् पोलिसांसमोर रचला बनाव! कसा उघड झाला गुन्हा?
7
'माझ्या बॉयफ्रेंडशी लई गुलूगुलू बोलते' रागातून होमगार्ड महिलेची हत्या, मृतदेह नाल्यात फेकला
8
'ट्रेडिंग गुरू' अवधूत साठे सेबीच्या रडारवर; कर्जतच्या क्लासवर मोठी कारवाई; काय आहे प्रकरण?
9
"मी वेगळा रस्ता निवडतोय...", टीव्ही अभिनेत्याने शेअर केला व्हिडिओ, घटस्फोट की आणखी काही?
10
Matthew Breetzke World Record : हा भाऊ काय ऐकत नाय! फिफ्टी प्लसचा 'चौकार' अन् आणखी एक विश्व विक्रमी डाव
11
"हा ट्रम्प यांच्या नोबेल पुरस्कार जिंकण्याच्या प्रयत्नाचा एक भाग," अमेरिकेच्या माजी NSA नं भारतावरील टॅरिफवरुन केली जोरदार टीका
12
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
13
आलिया भटचे होणारे भाऊजी कोण? शाहीनने शेअर केले बॉयफ्रेंडसोबतचे फोटो; कोण आहे तो?
14
SC on Stray Dogs: श्वानांना सार्वजनिक ठिकाणी खायला घालण्यास बंदी; पकडण्यापासून रोखल्यास २ लाखांचा दंड; सुप्रीम कोर्टाचा निर्णय
15
'मी प्रेमाने तिच्या जवळ गेलो पण...'; पहिल्या रात्रीच पत्नीचा खरा चेहरा समोर आला, घाबरलेला पती पोलिसांकडे गेला!
16
मुकेश अंबानी यांच्या आई कोकिला बेन यांची प्रकृती बिघडली; एअरलिफ्ट करून रुग्णालयात दाखल
17
“यांना वेळ द्यायचा तरी किती? मुंबईत घुसणारच, आम्हाला आमचे आरक्षण द्या”: मनोज जरांगे पाटील
18
सावध व्हा, तुमच्यासोबतही असं घडू शकतं! अधिकारी असल्याची बतावणी करून २.३ कोटी रुपये पळवले
19
Asia Cup आधी रिंकू सिंहचा शतकी धमाका; ८ उत्तुंग षटकारासह २२५ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा
20
अमेरिकेतील ५.५ कोटी परदेशी नागरिक अडचणीत, 'असं' झालं तर थेट हाकलून दिलं जाणार! नेमकं प्रकरण काय?

जुने-नवे संघर्ष रंगणार?

By admin | Updated: October 21, 2014 23:45 IST

रत्नागिरी मतदारसंघ : शिवसेनेत पदांवरून साठमारी सुरू!

रत्नागिरी : आमचा जुन्या शिवसैनिकांना कोणताही उपद्रव होणार नाही, असे राष्ट्रवादीतून कार्यकर्त्यांसह सेनेत पक्षांतर करणाऱ्यांनी सांगितले असले तरी पक्षातील पदांवरून जुन्या व नव्या कार्यकर्त्यांमध्ये आतापासूनच धूसफूस सुरू झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील जुन्या-नव्यांमधील संघर्ष रंगण्याची स्पष्ट चिन्हे आहेत. दुसऱ्या पक्षातील उमेदवाराला स्वीकारले, परंतु आपली पदे नव्यांना हिसकावू द्यायची नाहीत, यासाठी ‘जुन्यां’कडून रणनीती आखली जात आहे. तर पदांचीच सवय झालेल्या नव्यांना पदांशिवाय राहण्याची सवय नसल्याने पदांसाठी ‘आगे बढो’ असे सूत्र अवलंबिले जात आहे. त्यामुळेच हा संघर्ष वाढण्याची चिन्हे ठळक झाली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून रत्नागिरी विधानसभेची जागा ही सेना-भाजपाची युती असल्याने भाजपाच्या वाट्याला आली होती. २००४ पासून सतत तीनवेळा भाजपा उमेदवार बाळ माने यांना कोणामुळे पराभव पत्करावा लागला, याचाही उलगडा नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतून झाला आहे. सेनेतीलच ‘राजकीय शाखेची’ हाराकिरी हा विषय त्यातून अधोरेखित झाला. त्यामुळे नव्यांच्या आगमनाने जुन्या निष्ठावंतांमध्ये असंतोष खदखदू लागला आहे. दुसऱ्या पक्षातून आलेल्या नेत्यास रत्नागिरीतून प्रथम मिळणारी विधानसभेची उमेदवारी देण्यावरून जुन्यांमध्ये असंतोषाची पहिली ठिणगी उडाली होती. यावरून आठवडाबाजारमधील कार्यालयात झालेल्या पहिल्याच सभेत खडाजंगीही झाली होती. गेल्या काही वर्षांपासून रत्नागिरी मतदारसंघ सेनेला मिळावा ही कार्यकर्त्यांची मागणी होती. यावेळी युती तुटल्याने ही संधी शिवसैनिकांना चालून आली होती. त्यामुळे निष्ठावंत शिवसैनिकही येथून जिंकायचेच या जिद्दीने कामालाही लागले होते. तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांनी तालुक्यात अतिशय नेटकेपणे संघटना बांधणीचे काम केले होते. त्यांना उमेदवारी जवळ-जवळ निश्चित झाली होती. त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. मात्र आयत्यावेळी वायुवेगाने घडामोडी झाल्या अन आपला उमेदवार निवडून आणण्याची कार्यकर्त्यांची उमेदच निघून गेली. नेत्यांचा असंतोष थंडावला तरी कार्यकर्त्यांतील असंतोषाची धग अद्यापही कायम आहे. निष्ठावंत कार्यकर्त्याला मिळणारी उमेदवारी तर गेलीच परंतु पक्षात आलेल्या नव्यांकडून आता संघटनेतील पदांसाठी साठमारी सुरू होईल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. निरलस भावनेतून पक्षाचे कार्य करणारे कार्यकर्ते आता कमी आहेत, ही वस्तूूस्थिती नाकारून चालणार नाही. त्यामुळेच दुसऱ्या पक्षातून आलेले पदाधिकारी हे केवळ कार्यकर्ता बनून राहणार नाहीत हेही तितकेच खरे आहे. इथुनच जुुने-नवे वादाची सुरुवात होते. विधानसभेची निवडणूक आता झालीय म्हणजेच कोंढाण्याचे लग्न झालेय, आता पक्षात आलेल्या नव्या सुभेदारांसाठी पक्षाच्या कोणत्या निष्ठावान कार्यकर्त्यांना आपल्या पदांचे गड खालसा करावे लागणार हा खरा प्रश्न आहे. निष्ठावंताच्या उमेदवारीचा बळी आधीच गेलाय आता जुन्यांची कोणती व किती पदे पणाला लागणार, हाच कळीचा मुद्दा बनला आहे. असंतोषाची ही धग वाढती असून त्यामुळे जुने-नवे यांच्यात संघर्षाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)असंतोषाची धग थांबणार कशी?आपली पदे हिसकावू द्यायची नाहीत यासाठी जुन्या कार्यकर्त्याकडून रणनीतीची आखणी.नव्या कार्यकर्त्यांनाही हवी संघटनेतील गडांची सुभेदारी.प्रथमच मिळालेल्या उमेदवारीचा बळी गेलाच आता पदे पणाला न लावण्याचा जुन्यांचा निर्धार. नेत्यांचा असंतोष थंडावला असला तरी कार्यकर्त्यांमधील असंतोषाची धग अद्यापही कायम. पक्षप्रमुखांच्या आदेशाला दिला शिवसैनिकांनी मान.