शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

जुने-नवे संघर्ष रंगणार?

By admin | Updated: October 21, 2014 23:45 IST

रत्नागिरी मतदारसंघ : शिवसेनेत पदांवरून साठमारी सुरू!

रत्नागिरी : आमचा जुन्या शिवसैनिकांना कोणताही उपद्रव होणार नाही, असे राष्ट्रवादीतून कार्यकर्त्यांसह सेनेत पक्षांतर करणाऱ्यांनी सांगितले असले तरी पक्षातील पदांवरून जुन्या व नव्या कार्यकर्त्यांमध्ये आतापासूनच धूसफूस सुरू झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील जुन्या-नव्यांमधील संघर्ष रंगण्याची स्पष्ट चिन्हे आहेत. दुसऱ्या पक्षातील उमेदवाराला स्वीकारले, परंतु आपली पदे नव्यांना हिसकावू द्यायची नाहीत, यासाठी ‘जुन्यां’कडून रणनीती आखली जात आहे. तर पदांचीच सवय झालेल्या नव्यांना पदांशिवाय राहण्याची सवय नसल्याने पदांसाठी ‘आगे बढो’ असे सूत्र अवलंबिले जात आहे. त्यामुळेच हा संघर्ष वाढण्याची चिन्हे ठळक झाली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून रत्नागिरी विधानसभेची जागा ही सेना-भाजपाची युती असल्याने भाजपाच्या वाट्याला आली होती. २००४ पासून सतत तीनवेळा भाजपा उमेदवार बाळ माने यांना कोणामुळे पराभव पत्करावा लागला, याचाही उलगडा नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतून झाला आहे. सेनेतीलच ‘राजकीय शाखेची’ हाराकिरी हा विषय त्यातून अधोरेखित झाला. त्यामुळे नव्यांच्या आगमनाने जुन्या निष्ठावंतांमध्ये असंतोष खदखदू लागला आहे. दुसऱ्या पक्षातून आलेल्या नेत्यास रत्नागिरीतून प्रथम मिळणारी विधानसभेची उमेदवारी देण्यावरून जुन्यांमध्ये असंतोषाची पहिली ठिणगी उडाली होती. यावरून आठवडाबाजारमधील कार्यालयात झालेल्या पहिल्याच सभेत खडाजंगीही झाली होती. गेल्या काही वर्षांपासून रत्नागिरी मतदारसंघ सेनेला मिळावा ही कार्यकर्त्यांची मागणी होती. यावेळी युती तुटल्याने ही संधी शिवसैनिकांना चालून आली होती. त्यामुळे निष्ठावंत शिवसैनिकही येथून जिंकायचेच या जिद्दीने कामालाही लागले होते. तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांनी तालुक्यात अतिशय नेटकेपणे संघटना बांधणीचे काम केले होते. त्यांना उमेदवारी जवळ-जवळ निश्चित झाली होती. त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. मात्र आयत्यावेळी वायुवेगाने घडामोडी झाल्या अन आपला उमेदवार निवडून आणण्याची कार्यकर्त्यांची उमेदच निघून गेली. नेत्यांचा असंतोष थंडावला तरी कार्यकर्त्यांतील असंतोषाची धग अद्यापही कायम आहे. निष्ठावंत कार्यकर्त्याला मिळणारी उमेदवारी तर गेलीच परंतु पक्षात आलेल्या नव्यांकडून आता संघटनेतील पदांसाठी साठमारी सुरू होईल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. निरलस भावनेतून पक्षाचे कार्य करणारे कार्यकर्ते आता कमी आहेत, ही वस्तूूस्थिती नाकारून चालणार नाही. त्यामुळेच दुसऱ्या पक्षातून आलेले पदाधिकारी हे केवळ कार्यकर्ता बनून राहणार नाहीत हेही तितकेच खरे आहे. इथुनच जुुने-नवे वादाची सुरुवात होते. विधानसभेची निवडणूक आता झालीय म्हणजेच कोंढाण्याचे लग्न झालेय, आता पक्षात आलेल्या नव्या सुभेदारांसाठी पक्षाच्या कोणत्या निष्ठावान कार्यकर्त्यांना आपल्या पदांचे गड खालसा करावे लागणार हा खरा प्रश्न आहे. निष्ठावंताच्या उमेदवारीचा बळी आधीच गेलाय आता जुन्यांची कोणती व किती पदे पणाला लागणार, हाच कळीचा मुद्दा बनला आहे. असंतोषाची ही धग वाढती असून त्यामुळे जुने-नवे यांच्यात संघर्षाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)असंतोषाची धग थांबणार कशी?आपली पदे हिसकावू द्यायची नाहीत यासाठी जुन्या कार्यकर्त्याकडून रणनीतीची आखणी.नव्या कार्यकर्त्यांनाही हवी संघटनेतील गडांची सुभेदारी.प्रथमच मिळालेल्या उमेदवारीचा बळी गेलाच आता पदे पणाला न लावण्याचा जुन्यांचा निर्धार. नेत्यांचा असंतोष थंडावला असला तरी कार्यकर्त्यांमधील असंतोषाची धग अद्यापही कायम. पक्षप्रमुखांच्या आदेशाला दिला शिवसैनिकांनी मान.