शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

चाकरमान्यांच्या तपासणीचा गोंधळ वाढणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:38 IST

रत्नागिरी : कोरोना काळात आलेल्या गणेशोत्सवाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने नियमावली जारी केली आहे. त्यानुसार तपासणी नाक्यांवर गोळा केली जाणारी ...

रत्नागिरी : कोरोना काळात आलेल्या गणेशोत्सवाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने नियमावली जारी केली आहे. त्यानुसार तपासणी नाक्यांवर गोळा केली जाणारी माहिती ग्राम कृती दलाकडे पाठविण्यात येत असून, सर्वच जबाबदारी ग्राम कृती दलांकडे देण्यात आली आहे. जिल्ह्यातील गावांची संख्या जास्त आणि ग्रामपंचायतींची संख्या कमी असल्याने या सर्व जबाबदारी पेलताना ग्राम कृती दलाच्या नाकीनऊ येणार असून, ऐन सणात तारेवरची कसरत होणार आहे. त्यामुळे चाकरमान्यांच्या तपासणीचा गोंधळ अधिक वाढणार आहे.

जिल्हाधिकारी डाॅ. बी. एन. पाटील यांनी कोरोनाच्या अनुषंगाने आवश्यक त्या नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा केला जावा, या अनुषंगाने शनिवारी नियमावली जारी केली आहे. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्याबाहेरून एस. टी., रेल्वे अथवा खासगी वाहनाने येणाऱ्या नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्हीही डोस घेतले असल्याचे प्रमाणपत्र तपासणी नाक्यावर सादर करावे लागणार आहे किंवा ७२ तासांपूर्वी कोरोना चाचणी केल्याचे प्रमाणपत्र सोबत ठेवावे लागणार आहे. हे दोन्ही नसल्यास कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबतचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. मात्र, तपासणी नाक्यावरील प्रवाशांची संकलित केलेली माहिती संबंधित तहसीलदारांकडे पाठविण्यात येणार असून, त्यांच्यामार्फत ती ग्राम कृती दलांकडे पाठविण्यात येणार आहे.

या आदेशात नमूद केल्याप्रमाणे जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या गावातील ग्रामस्थांची माहिती संकलित करणे, आवश्यक असल्यास त्याची स्थानिक आरोग्य यंत्रणेमार्फत आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी उद्युक्त करण्यासाठी या चाचणी पाॅझिटिव्ह आल्यास त्याला विलगीकरणात ठेवण्याची जबाबदारीही ग्राम कृती दलाकडे देण्यात आली आहे. कोरोनाबाधित असलेल्यांना कोराेना केअर सेंटरमध्ये दाखल करणे तसेच लक्षणे नसल्यास त्यांना विलगीकरण केंद्रात दाखल करणे व त्यासाठी विलगीकरण केंद्र उभारण्याची जबाबदारीही ग्राम कृती दलाकडे देण्यात आली आहे. हा सर्व अहवाल पुन्हा तहसीदारांकडे पाठवावा लागणार आहे.

ग्राम कृती दलांकडे तहसीलदारांमार्फत प्रवाशांची यादी आल्यानंतर त्यांची माहिती संकलित करणे, त्याचबरोबर येणाऱ्यांची चाचणी करून त्यांना विलगीकरण केंद्रात ठेवणे आणि त्यांना या विलगीकरणात सुविधा देणे, हेही काम या ग्राम कृती दलांच्या सदस्यांना करावे लागणार आहे. आधीच कृती दलांच्या सदस्यांची संख्या कमी आहे तसेच अनेक गावे दुर्गम आहेत. त्यामुळे प्रत्येक चाकरमान्यांपर्यंत पोहोचताना अनेक अडचणी येणार आहेत. त्यामुळे कृती दल पोहोचण्याआधीच चाकरमानी घरी पोहोचण्याची शक्यता आहे. यातूनही संसर्गाचा धोका वाढू शकतो.

गावे १५३१, ग्राम कृती दले ८४५

जिल्ह्यातील गावांची संख्या १,५३१ असून ८४५ ग्रामपंचायती आहेत. यात काही ग्रुप ग्रामपंचायती आहेत. गावांची संख्या अधिक आणि कृती दलांची संख्या कमी, त्यातच अनेक गावे दुर्गम भागात असल्याने ग्राम कृती दल बाहेरून येणाऱ्या ग्रामस्थांपर्यंत वेळेत कसे पोहोचणार, हा प्रश्न आहेच. शिवाय प्रत्येकाच्याच घरी गणपतीचा सण आहे. ऐन सणात ग्राम कृती दलाची धावपळ होणार आहे.