शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
“रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
3
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हण्याल्या...
4
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
5
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
6
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
7
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
8
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
9
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
10
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
11
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
12
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
13
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
14
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
15
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
16
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
17
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
18
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
19
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
20
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
Daily Top 2Weekly Top 5

चाकरमान्यांच्या तपासणीचा गोंधळ वाढणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:38 IST

रत्नागिरी : कोरोना काळात आलेल्या गणेशोत्सवाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने नियमावली जारी केली आहे. त्यानुसार तपासणी नाक्यांवर गोळा केली जाणारी ...

रत्नागिरी : कोरोना काळात आलेल्या गणेशोत्सवाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने नियमावली जारी केली आहे. त्यानुसार तपासणी नाक्यांवर गोळा केली जाणारी माहिती ग्राम कृती दलाकडे पाठविण्यात येत असून, सर्वच जबाबदारी ग्राम कृती दलांकडे देण्यात आली आहे. जिल्ह्यातील गावांची संख्या जास्त आणि ग्रामपंचायतींची संख्या कमी असल्याने या सर्व जबाबदारी पेलताना ग्राम कृती दलाच्या नाकीनऊ येणार असून, ऐन सणात तारेवरची कसरत होणार आहे. त्यामुळे चाकरमान्यांच्या तपासणीचा गोंधळ अधिक वाढणार आहे.

जिल्हाधिकारी डाॅ. बी. एन. पाटील यांनी कोरोनाच्या अनुषंगाने आवश्यक त्या नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा केला जावा, या अनुषंगाने शनिवारी नियमावली जारी केली आहे. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्याबाहेरून एस. टी., रेल्वे अथवा खासगी वाहनाने येणाऱ्या नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्हीही डोस घेतले असल्याचे प्रमाणपत्र तपासणी नाक्यावर सादर करावे लागणार आहे किंवा ७२ तासांपूर्वी कोरोना चाचणी केल्याचे प्रमाणपत्र सोबत ठेवावे लागणार आहे. हे दोन्ही नसल्यास कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबतचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. मात्र, तपासणी नाक्यावरील प्रवाशांची संकलित केलेली माहिती संबंधित तहसीलदारांकडे पाठविण्यात येणार असून, त्यांच्यामार्फत ती ग्राम कृती दलांकडे पाठविण्यात येणार आहे.

या आदेशात नमूद केल्याप्रमाणे जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या गावातील ग्रामस्थांची माहिती संकलित करणे, आवश्यक असल्यास त्याची स्थानिक आरोग्य यंत्रणेमार्फत आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी उद्युक्त करण्यासाठी या चाचणी पाॅझिटिव्ह आल्यास त्याला विलगीकरणात ठेवण्याची जबाबदारीही ग्राम कृती दलाकडे देण्यात आली आहे. कोरोनाबाधित असलेल्यांना कोराेना केअर सेंटरमध्ये दाखल करणे तसेच लक्षणे नसल्यास त्यांना विलगीकरण केंद्रात दाखल करणे व त्यासाठी विलगीकरण केंद्र उभारण्याची जबाबदारीही ग्राम कृती दलाकडे देण्यात आली आहे. हा सर्व अहवाल पुन्हा तहसीदारांकडे पाठवावा लागणार आहे.

ग्राम कृती दलांकडे तहसीलदारांमार्फत प्रवाशांची यादी आल्यानंतर त्यांची माहिती संकलित करणे, त्याचबरोबर येणाऱ्यांची चाचणी करून त्यांना विलगीकरण केंद्रात ठेवणे आणि त्यांना या विलगीकरणात सुविधा देणे, हेही काम या ग्राम कृती दलांच्या सदस्यांना करावे लागणार आहे. आधीच कृती दलांच्या सदस्यांची संख्या कमी आहे तसेच अनेक गावे दुर्गम आहेत. त्यामुळे प्रत्येक चाकरमान्यांपर्यंत पोहोचताना अनेक अडचणी येणार आहेत. त्यामुळे कृती दल पोहोचण्याआधीच चाकरमानी घरी पोहोचण्याची शक्यता आहे. यातूनही संसर्गाचा धोका वाढू शकतो.

गावे १५३१, ग्राम कृती दले ८४५

जिल्ह्यातील गावांची संख्या १,५३१ असून ८४५ ग्रामपंचायती आहेत. यात काही ग्रुप ग्रामपंचायती आहेत. गावांची संख्या अधिक आणि कृती दलांची संख्या कमी, त्यातच अनेक गावे दुर्गम भागात असल्याने ग्राम कृती दल बाहेरून येणाऱ्या ग्रामस्थांपर्यंत वेळेत कसे पोहोचणार, हा प्रश्न आहेच. शिवाय प्रत्येकाच्याच घरी गणपतीचा सण आहे. ऐन सणात ग्राम कृती दलाची धावपळ होणार आहे.