शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
5
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
6
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
7
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
8
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
9
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
10
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
11
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
12
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
13
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
14
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
15
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
16
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
17
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
18
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
19
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
20
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल

चाकरमान्यांच्या तपासणीचा गोंधळ वाढणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:38 IST

रत्नागिरी : कोरोना काळात आलेल्या गणेशोत्सवाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने नियमावली जारी केली आहे. त्यानुसार तपासणी नाक्यांवर गोळा केली जाणारी ...

रत्नागिरी : कोरोना काळात आलेल्या गणेशोत्सवाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने नियमावली जारी केली आहे. त्यानुसार तपासणी नाक्यांवर गोळा केली जाणारी माहिती ग्राम कृती दलाकडे पाठविण्यात येत असून, सर्वच जबाबदारी ग्राम कृती दलांकडे देण्यात आली आहे. जिल्ह्यातील गावांची संख्या जास्त आणि ग्रामपंचायतींची संख्या कमी असल्याने या सर्व जबाबदारी पेलताना ग्राम कृती दलाच्या नाकीनऊ येणार असून, ऐन सणात तारेवरची कसरत होणार आहे. त्यामुळे चाकरमान्यांच्या तपासणीचा गोंधळ अधिक वाढणार आहे.

जिल्हाधिकारी डाॅ. बी. एन. पाटील यांनी कोरोनाच्या अनुषंगाने आवश्यक त्या नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा केला जावा, या अनुषंगाने शनिवारी नियमावली जारी केली आहे. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्याबाहेरून एस. टी., रेल्वे अथवा खासगी वाहनाने येणाऱ्या नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्हीही डोस घेतले असल्याचे प्रमाणपत्र तपासणी नाक्यावर सादर करावे लागणार आहे किंवा ७२ तासांपूर्वी कोरोना चाचणी केल्याचे प्रमाणपत्र सोबत ठेवावे लागणार आहे. हे दोन्ही नसल्यास कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबतचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. मात्र, तपासणी नाक्यावरील प्रवाशांची संकलित केलेली माहिती संबंधित तहसीलदारांकडे पाठविण्यात येणार असून, त्यांच्यामार्फत ती ग्राम कृती दलांकडे पाठविण्यात येणार आहे.

या आदेशात नमूद केल्याप्रमाणे जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या गावातील ग्रामस्थांची माहिती संकलित करणे, आवश्यक असल्यास त्याची स्थानिक आरोग्य यंत्रणेमार्फत आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी उद्युक्त करण्यासाठी या चाचणी पाॅझिटिव्ह आल्यास त्याला विलगीकरणात ठेवण्याची जबाबदारीही ग्राम कृती दलाकडे देण्यात आली आहे. कोरोनाबाधित असलेल्यांना कोराेना केअर सेंटरमध्ये दाखल करणे तसेच लक्षणे नसल्यास त्यांना विलगीकरण केंद्रात दाखल करणे व त्यासाठी विलगीकरण केंद्र उभारण्याची जबाबदारीही ग्राम कृती दलाकडे देण्यात आली आहे. हा सर्व अहवाल पुन्हा तहसीदारांकडे पाठवावा लागणार आहे.

ग्राम कृती दलांकडे तहसीलदारांमार्फत प्रवाशांची यादी आल्यानंतर त्यांची माहिती संकलित करणे, त्याचबरोबर येणाऱ्यांची चाचणी करून त्यांना विलगीकरण केंद्रात ठेवणे आणि त्यांना या विलगीकरणात सुविधा देणे, हेही काम या ग्राम कृती दलांच्या सदस्यांना करावे लागणार आहे. आधीच कृती दलांच्या सदस्यांची संख्या कमी आहे तसेच अनेक गावे दुर्गम आहेत. त्यामुळे प्रत्येक चाकरमान्यांपर्यंत पोहोचताना अनेक अडचणी येणार आहेत. त्यामुळे कृती दल पोहोचण्याआधीच चाकरमानी घरी पोहोचण्याची शक्यता आहे. यातूनही संसर्गाचा धोका वाढू शकतो.

गावे १५३१, ग्राम कृती दले ८४५

जिल्ह्यातील गावांची संख्या १,५३१ असून ८४५ ग्रामपंचायती आहेत. यात काही ग्रुप ग्रामपंचायती आहेत. गावांची संख्या अधिक आणि कृती दलांची संख्या कमी, त्यातच अनेक गावे दुर्गम भागात असल्याने ग्राम कृती दल बाहेरून येणाऱ्या ग्रामस्थांपर्यंत वेळेत कसे पोहोचणार, हा प्रश्न आहेच. शिवाय प्रत्येकाच्याच घरी गणपतीचा सण आहे. ऐन सणात ग्राम कृती दलाची धावपळ होणार आहे.