शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

‘ज्याच्या घरी गाय, त्याच्या घरी भगवंतांचे पाय’

By admin | Updated: March 2, 2016 23:58 IST

तुकाराम गोलमडे : जाकादेवीत जिल्हास्तरीय पशुपक्षी प्रदर्शन, गोपालक मेळावा

रत्नागिरी : कृषीप्रधान भारत देशात दुग्ध उत्पादनाला चालना मिळण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने गोपालन केले पाहिजे़ ‘ज्याच्या घरी गाय, त्याच्या घरी भगवंताचे पाय’ असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष तुकाराम गोलमडे यांनी केले. ते जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातर्फे तालुक्यातील जाकादेवी येथे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय पशुपक्षी प्रदर्शन व गोपालक, शेतकरी मेळाव्यामध्ये बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन समितीचे सभापती तथा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश शेवडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आनंद पुसावळे, पंचायत समिती सभापती बाबू म्हाप, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ़ सुभाष म्हस्के, जिल्हा परिषद सदस्या शुभांगी देसाई, दत्ता देसाई, दुग्ध उत्पादन सोसायटीचे अध्यक्ष अशोक जाधव, तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ़ अभिजीत कसालकर, पंचक्रोशीतील सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच यांच्यासह शेतकरी व गोपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते़यावेळी गोलामडे म्हणाले की, अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून भारत देशाने फार मोठा प्रगतीचा टप्पा ओलांडला आहे़ ही अभिमानाची गोष्ट असली तरी, आपला कोकण त्याबाबतीत फारच मागे राहिला आहे, अशी खंत व्यक्त करत त्यांनी प्रत्येक तालुक्यात पशु मेळाव्याचे आयोजन केले पाहिजे, असे सांगितले़ अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, देश पुढे गेला. मात्र, कोकणात परिवर्तन घडलेले नाही़ दगड, खडी, वाळू याचे उत्खनन करून घर बांधायचे एवढेच काम कोकणातील माणूस करत राहिला़, असे गोलामडे यांनी सांगितले.शेतीबरोबर पशुसंवर्धन महत्वाचे असल्याचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पुसावळे यांनी सांगितले़ या मेळाव्याला डेअरी मॅनेजर अनुपस्थित असल्याने अशोक जाधव यांनी नाराजी व्यक्त केली. तर कोकणात सहकाराचा अभाव असून, शेतकऱ्यांना अर्थाजनासाठी, स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी पशु मेळाव्याचे आयोजन महत्वाचे असल्याचे मत सभापती बाबू म्हाप यांनी व्यक्त केले़ डॉ़ सुभाष म्हस्के यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली़ तर सूत्रसंचालन सुशील जाधव यांनी केले. या मेळाव्यानिमित्त जिल्हाभरातून विविध जातीचे शेकडो गायी, म्हशी, बोकड, कोंबडे, शेळ्या, बैल इत्यादी पशुधन प्रदर्शनासाठी आणण्यात आले होते़ शेकडो शेतकरी, गोपालकांनी या मेळाव्यात सहभाग घेतला होता. यावेळी आदर्श पशुपालक, कामधेनू दत्तक ग्राम योजनेचे अध्यक्ष, गुणवंत कर्मचारी, अधिकारी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. (शहर वार्ताहर)येथील शेतकऱ्यांनी मानसिकता बदलणे गरजेचे आहे़ दूध उत्पादनासाठी चिलिंग, पाश्चरायझिंग, प्लँट नाहीत, हे खरे असले तरी, येथील शेतकऱ्याकडे व्यावसायिकपणा नाही़ त्यामुळे मार्केटींगमध्ये तो कमी पडत आहे़, असे मत उपाध्यक्ष सतीश शेवडे यांनी व्यक्त केले़