शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

शहराच्या विद्रूपीकरणाला जबाबदार काेण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:32 IST

मेहरुन नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : शहरात जाहिराती असो वा शुभेच्छाफलक लावताना नगर परिषदेकडून परवानगी घेणे आवश्यक आहे. ...

मेहरुन नाकाडे

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : शहरात जाहिराती असो वा शुभेच्छाफलक लावताना नगर परिषदेकडून परवानगी घेणे आवश्यक आहे. जेलनाका, मारूतीमंदिर, साळवी स्टाॅप याठिकाणी होर्डिंग्स लावू नये अशी सूचना असतानाही फलकबाजी करून शहराच्या साैंदर्याला बाधा निर्माण करण्यात येत आहे. कार्यक्रम होऊन गेला तरी फलक हटविण्याची तसदी घेतली जात नाही.

विविध राजकीय पक्षांच्या जाहीरात वा अन्य फलकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. कंपन्यांकडून जाहीरातीचे फलक लावताना नगरपरिषदेकडून परवानगी घेण्यात येत आहे. शहरातील मारूतीमंदिर, साळवी स्टाॅप, माळनाका, जेलरोड या ठिकाणी फलकांची गर्दी वाढत आहे.

नगरपरिषदेकडून नागरिकांना, वाहनचालकांना त्रास होणारे किंवा अनधिकृत फलक वेळोवेळी हटविण्यात येतात. अनधिकृत फलक लावणाऱ्याविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येते. फलक लावताना सर्वसामान्य नागरिक, वाहतुकीला अडथळा येणार नाही, याची काळजी प्रत्येकानेच घेणे गरजेचे आहे. मात्र असे होत नसल्यानेच फलकांची गर्दी वाढते.

राजकीय पक्षांच्या कार्यक्रमावेळी तर फलकांची गर्दी प्रचंड वाढते. इतकेच नव्हे तर पक्षाचे झेंडेही पथदीपांच्या खांबांना लावले जातात. साळवीस्टाॅप ते बसस्थानकापर्यंतचा संपूर्ण मार्ग त्या-त्या पक्षांचे फलक, झेंडेमय झालेले असतात. त्यावेळी नागरिकांमधून कुतूहल नाही तर तीव्र नाराजी व्यक्त होत असते. कार्यक्रम झाल्यावरही फलक काढले जात नाहीत, तेव्हा नाराजीत आणखी भर पडते.

सूचनेकडे दुर्लक्ष

जेलरोड, माळनाका, मारूतीमंदिर, साळवी स्टाॅप याठिकाणी सूचनाफलक लावूनसुध्दा शुभेच्छाफलक लावले जातात. मारूतीमंदिर सर्कल परिसरात तर फलकांची इतकी गर्दी होते की, समोरचे वाहनही दिसत नाही.

कार्यक्रम संपला तरी फलक हटविले जात नाहीत.

वारंवार कारवाई

नगरपरिषदेकडून अनधिकृत फलक हटविण्याची कारवाई सातत्याने सुरू असते.

वाहतुकीला व पादचाऱ्यांना त्रास होणारे फलक ताब्यात घेतले जातात.

नगरपरिषदेकडून कारवाई करूनसुध्दा फलकांची गर्दी कमी होण्याऐवजी वाढत आहे.

दंडात्मक कारवाई

कोणतेही फलक लावण्यापूर्वी नगर परिषदेकडून परवानगी घेणे आवश्यक आहे.

अनधिकृत असलेले फलक नगरपरिषदेच्या पथकाकडून ताब्यात घेण्यात येतात.

दंडात्मक कारवाई केली जाते. दंडाची रक्कम नागरी, सुविधा केंद्रात भरलेनंतर फलक ताब्यात दिले जातात.

कारवाई सुरूच

शहराच्या साैंदर्याला बाधा येऊ नये तसेच रहदारी व वाहतुकीला अडथळा ठरणारे अनधिकृत फलक हटविण्याची कारवाई नगरपरिषदेकडून केली जाते. फलक लावण्याची परवानगी देताना दिवसांची मर्यादा असते, तरीही फलक न हटवल्यास कारवाई केली जाते.

- निमेश नायर, आरोग्य सभापती,नगरपरिषद