शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

कोटींचा आकडा आणला कुठून : सामंत

By admin | Updated: November 23, 2015 00:32 IST

आता जयगड येथील कंपनीने चौपदरीकरणाला नकार का दिला व दुपदरीकरणाच्या कामाला शासनाने मान्यता कशी दिली हे माने यांनीच त्यांच्या वरिष्ठांना विचारावे,

रत्नागिरी : जयगड - निवळी या दुपदरी रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम हे प्रत्यक्षात ४२ कोटींचे आहे. त्यामुळे माजी आमदार बाळ माने यांनी ८० कोटींचा आकडा आणला कुठून असा सवाल करत, त्यांनी आधी माहिती करून घ्यावे व नंतर बोलावे. तसेच सात कंपन्यांमधील आर. डी. सामंत कंपनीची सर्वात कमी रकमेची निविदा स्वीकारली गेली. माने यांनी शिफारस केलेल्या कंपनीची निविदा स्वीकारली न गेल्यानेच कदाचित ते दुखावले असावेत, असा टोला आमदार उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत लगावला.रत्नागिरी तालुक्यातील जयगड - निवळी रस्ता हा चौपदरी होणार होता. त्याबाबत राज्य शासनाशी आधी करारही झाला होता. परंतु, आता जयगड येथील कंपनीने चौपदरीकरणाला नकार का दिला व दुपदरीकरणाच्या कामाला शासनाने मान्यता कशी दिली हे माने यांनीच त्यांच्या वरिष्ठांना विचारावे, असे सामंत यांनी यावेळी सांगितले.उद्या मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे कामही आर. डी. सामंत कंपनीला मिळाले तर तेही मॅनेज करून मागच्या दाराने मिळवले असा आरोप बाळ माने करणार काय? असा सवालही सामंत यांनी केला. (प्रतिनिधी)मुळात दुपदरीकरणाचा निर्णय का झाला याचे उत्तर जयगड येथील त्या कंपनीकडून व शासनाकडून माने यांनी घ्यावे. हा रस्ता चौपदरी करण्याची माने यांची मागणी असेल तर त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे त्यासाठी साकडे घालावे. परंतु, चौपदरीकरणामुळे बाजारपेठा उदध्वस्त होतील, अनेक घरे हटवावी लागतील. हे करणे योग्य आहे का? असा सवाल आता माने यांनाच जनतेने विचारावा, असेही सामंत म्हणाले.