शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
7
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
8
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
9
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
10
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
11
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
12
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
13
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
14
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
16
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
17
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
18
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
19
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
20
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी

आता कुठे गेली जातपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:31 IST

माणुसकी हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे, हे पुन्हा एकदा महापुराने झालेल्या हाणीने दाखवून दिले आहे. जातीयतेचे विष पेरणाऱ्यांना आता ...

माणुसकी हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे, हे पुन्हा एकदा महापुराने झालेल्या हाणीने दाखवून दिले आहे. जातीयतेचे विष पेरणाऱ्यांना आता तरी अक्कल आली तर बरे होईल, तसेच लोकांनी आता तरी शहाणे व्हावे. नाहीतर जाती-धर्माच्या नावाखाली आग लावणारे लोकच सर्वश्रेष्ठ, असे म्हणण्याशिवाय पर्याय राहणार नाही. ज्या-ज्या वेळी नैसर्गिक आपत्ती आली त्या-त्या वेळी जात, धर्म विसरुन सर्वच जण एकमेकांसाठी धावून आल्याचा आतापर्यंतचा इतिहास आहे. असे असतानाही काही जण सामाजिक ऐक्य बिघडविण्यासाठी जातीयतेचे, धर्माधर्माचे विष पेरुन वाद निर्माण करण्याचे काम उत्तमपणे पार पडतात आणि आपल्यासारखे अनेक जण त्याला बळी पडतात. त्यामुळे नुकसान कोणाचे होते, याकडे आपण दुर्लक्ष करून या विखारी माणसांच्या पाठीशी धावून सर्वांचेच नुकसान करून घेतो. असे प्रकार गेली कित्येक वर्षे सुरू आहेत. माणूस शिकला सवरलेला असतानाही जातीयता, धर्माधर्मातील तेढ निर्माण करणाऱ्या लोकांपासून सावध झालेला नाही; मात्र आपलंच नुकसान करून जातीयतेला थारा देण्याचे काम करीत आहे. हे कुठे तरी बदलले पाहिजेत. त्यासाठी प्रत्येक धर्माच्या लोकांनी धार्मिकतेचा बुरखा घेतलेला मग तो हिंदू असो वा मुसलमान असो, अशा लोकांना बाजूला करण्याचे काम प्रत्येकानेच करायला पाहिजेत.

पर्यावरणातील सततच्या बदलामुळे कधी अतिवृष्ष्टी, अवकाळी पाऊस, महापूर, उन्हाळा आपण अनुभवत आहोत. नुकतेच अतिवृष्टीमुळे महापुराच्या संकटाला आपण सामोरे जात आहोत. या कठीण कालखंडात सर्वच व्यवसाय उद्ध्वस्त झाले आहेत. सामाजिक संस्था, संघटना, शासन आणि इतर लोकांनी मदतीचा हात दिला. धान्य, कपडे आदि जीवनाश्यक वस्तू या माध्यमातून मदतीचा ओघ सुरूच आहे. घरांची झालेली पडझड, शेतीचे नुकसान, व्यापाऱ्यांचे नुकसान असे न भरुन येणारे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत हजारो हात मदतीला धावत आहेत. नुकसान झाले आहेच. शिवाय यापुढे येणाऱ्या महामारीला तोंड कसे द्यायचे, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोरोना महामारीमध्ये आलेल्या महापुराने सर्वांनाच उद्ध्वस्त केले आहे. या महापुरामध्ये काही दिवस लोक अन्नपाण्यावाचून तडफडत होते. डोक्यावर नैसर्गिक संकट असतानाच पोटात काहीही नसल्याने अनेकांचा जीव कासावीस झाला होता. यामध्ये काहींचे नातेवाईकही दगावले. जनावरे तर कुठे बेपत्ता झाली, हेच समजले नाही. अशा परिस्थितीमध्ये कोण कोणासाठी धावून आला, हे कोणालाही माहीत नाही. कोणाचा कोणी जीव वाचवला, हेही कोणाच्या ध्यानीमनी नाही. जे पूरग्रस्त भागात मदतकार्यासाठी पुढे सरसावले त्यांना जात-धर्म नव्हता. मग आम्ही जातीयतेचे ओझे घेऊन एखाद्याच्या सांगण्यावरून तसेच चिथावण्यावरून का म्हणून धावून जायचे, असा प्रश्न उपस्थित केल्यास तो चुकीचा ठरणार नाही. त्यासाठी प्रत्येकाने माणुसकीपेक्षा दुसरे काही नाही, असा विचार केल्यास तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना चांगलीच चपराक बसेल.