शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

आता कुठे गेली जातपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:31 IST

माणुसकी हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे, हे पुन्हा एकदा महापुराने झालेल्या हाणीने दाखवून दिले आहे. जातीयतेचे विष पेरणाऱ्यांना आता ...

माणुसकी हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे, हे पुन्हा एकदा महापुराने झालेल्या हाणीने दाखवून दिले आहे. जातीयतेचे विष पेरणाऱ्यांना आता तरी अक्कल आली तर बरे होईल, तसेच लोकांनी आता तरी शहाणे व्हावे. नाहीतर जाती-धर्माच्या नावाखाली आग लावणारे लोकच सर्वश्रेष्ठ, असे म्हणण्याशिवाय पर्याय राहणार नाही. ज्या-ज्या वेळी नैसर्गिक आपत्ती आली त्या-त्या वेळी जात, धर्म विसरुन सर्वच जण एकमेकांसाठी धावून आल्याचा आतापर्यंतचा इतिहास आहे. असे असतानाही काही जण सामाजिक ऐक्य बिघडविण्यासाठी जातीयतेचे, धर्माधर्माचे विष पेरुन वाद निर्माण करण्याचे काम उत्तमपणे पार पडतात आणि आपल्यासारखे अनेक जण त्याला बळी पडतात. त्यामुळे नुकसान कोणाचे होते, याकडे आपण दुर्लक्ष करून या विखारी माणसांच्या पाठीशी धावून सर्वांचेच नुकसान करून घेतो. असे प्रकार गेली कित्येक वर्षे सुरू आहेत. माणूस शिकला सवरलेला असतानाही जातीयता, धर्माधर्मातील तेढ निर्माण करणाऱ्या लोकांपासून सावध झालेला नाही; मात्र आपलंच नुकसान करून जातीयतेला थारा देण्याचे काम करीत आहे. हे कुठे तरी बदलले पाहिजेत. त्यासाठी प्रत्येक धर्माच्या लोकांनी धार्मिकतेचा बुरखा घेतलेला मग तो हिंदू असो वा मुसलमान असो, अशा लोकांना बाजूला करण्याचे काम प्रत्येकानेच करायला पाहिजेत.

पर्यावरणातील सततच्या बदलामुळे कधी अतिवृष्ष्टी, अवकाळी पाऊस, महापूर, उन्हाळा आपण अनुभवत आहोत. नुकतेच अतिवृष्टीमुळे महापुराच्या संकटाला आपण सामोरे जात आहोत. या कठीण कालखंडात सर्वच व्यवसाय उद्ध्वस्त झाले आहेत. सामाजिक संस्था, संघटना, शासन आणि इतर लोकांनी मदतीचा हात दिला. धान्य, कपडे आदि जीवनाश्यक वस्तू या माध्यमातून मदतीचा ओघ सुरूच आहे. घरांची झालेली पडझड, शेतीचे नुकसान, व्यापाऱ्यांचे नुकसान असे न भरुन येणारे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत हजारो हात मदतीला धावत आहेत. नुकसान झाले आहेच. शिवाय यापुढे येणाऱ्या महामारीला तोंड कसे द्यायचे, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोरोना महामारीमध्ये आलेल्या महापुराने सर्वांनाच उद्ध्वस्त केले आहे. या महापुरामध्ये काही दिवस लोक अन्नपाण्यावाचून तडफडत होते. डोक्यावर नैसर्गिक संकट असतानाच पोटात काहीही नसल्याने अनेकांचा जीव कासावीस झाला होता. यामध्ये काहींचे नातेवाईकही दगावले. जनावरे तर कुठे बेपत्ता झाली, हेच समजले नाही. अशा परिस्थितीमध्ये कोण कोणासाठी धावून आला, हे कोणालाही माहीत नाही. कोणाचा कोणी जीव वाचवला, हेही कोणाच्या ध्यानीमनी नाही. जे पूरग्रस्त भागात मदतकार्यासाठी पुढे सरसावले त्यांना जात-धर्म नव्हता. मग आम्ही जातीयतेचे ओझे घेऊन एखाद्याच्या सांगण्यावरून तसेच चिथावण्यावरून का म्हणून धावून जायचे, असा प्रश्न उपस्थित केल्यास तो चुकीचा ठरणार नाही. त्यासाठी प्रत्येकाने माणुसकीपेक्षा दुसरे काही नाही, असा विचार केल्यास तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना चांगलीच चपराक बसेल.