शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

रत्नागिरी नगर परिषदेत कोविड सेंटर कधी सुरू होणार : दीपक पटवर्धन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:30 IST

रत्नागिरी : रत्नागिरीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढते आहे. रुग्णांसाठी अधिकची बेड व्यवस्था हवी आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ५००० रुग्ण संख्या ...

रत्नागिरी : रत्नागिरीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढते आहे. रुग्णांसाठी अधिकची बेड

व्यवस्था हवी आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ५००० रुग्ण संख्या होण्याची भीती

व्यक्त केली. वाढत्या रुग्णसंख्येनंतरही रत्नागिरी नगर परिषदेच्या काेविड सेंटर सुरू करण्याच्या आश्वासनाचे काय झाले, असा प्रश्न भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी केला आहे.

ते म्हणाले की, एवढी रुग्ण संख्या लक्षात घेता रत्नागिरीमध्ये अधिक

हॉस्पिटल्स ऑक्सिजन बेडची आवश्यकता आहे. रत्नागिरी नगरपरिषद कोविड

केअर सेंटर सुरू करणार अशी घोषणा झाली. मात्र, अद्यापपर्यंत ते सुरू झाल्याचे

ऐकिवात नाही. रत्नागिरी नगरपरिषदेने शहरवासीयांची काळजी घेण्याच्या

दृष्टीने तत्काळ केअर सेंटर सुरू करावे. या महत्त्वाच्या निर्णयासाठी इतकी

दिरंगाई अपेक्षित नाही. रत्नागिरी नगरपरिषद ही जिल्ह्यातील मोठी नगरपरिषद

असून, अद्याप कोविड हॉस्पिटल सुरु करण्यात मागे आहे, ही बाब खेदजनक आहे, असे पटवर्धन यांनी म्हटले आहे.

नगराध्यक्ष, सर्व नगरसेवकांनी यासंदर्भात तत्काळ कार्यवाही करत कोविड

केअर सेंटर सुरू करावे. कोविड निधी यासाठी उपलब्ध आहे, अशी माहिती मिळत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. वाढती रुग्ण संख्या पाहता आता अधिक वेळ न घालवता कोविड सेंटर तत्काळ सुरू करण्याची कार्यवाही नगरपरिषदेने करावी, अशी

मागणी ॲड. दीपक पटवर्धन यांनी नगराध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी

यांना पत्र लिहून केली आहे.