शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
6
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
7
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
8
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
9
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
10
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
11
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
12
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
13
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
14
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
15
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
16
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
17
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
18
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
19
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी

सध्या काय महत्वाचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:20 IST

दुसरीकडे गेल्या दीड वर्षांपासून आरोग्य यंत्रणेची मूठभर माणसे तहान भूक विसरून रात्रंदिवस जागून कोरोनाशी लढा देत रुग्णाला मृत्यूच्या दाढेतून ...

दुसरीकडे गेल्या दीड वर्षांपासून आरोग्य यंत्रणेची मूठभर माणसे तहान भूक विसरून रात्रंदिवस जागून कोरोनाशी लढा देत रुग्णाला मृत्यूच्या दाढेतून परत आणायचा प्रयत्न करत आहेत. प्रशासनाची स्थितीही याहून काही वेगळी नाही. दिवस-रात्र शासनाकडून येणाऱ्या सततच्या नियमावलीची अंमलबजावणी करताना प्रशासनही मेटाकुटीस आले आहे. त्यातूनच नागरिकांच्या अनेक नाराजींना सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाचेही अपुरे मनुष्यबळ, त्यातच एकाएकाच्या पाठीवर अनेक कामांचे ओझे त्यामुळे यंत्रणा थकलेली असूनही या महामारीच्या निवारणासाठी जीवाचे रान करत आहेत. हे करताना यंत्रणेतील अधिकारी आणि कर्मचारी हेही अखेरीस माणसेच आहेत, याचे भान आज प्रत्येक व्यक्तींने बाळगायला हवे. दीड वर्षांपासून कोरोनाशी लढा देताना यंत्रणा थकली आहे. त्यांना काय त्यांच्या कामाचे वेतन मिळते. असे आपण सहजपणे बोलत असलो तरीही सध्या हे अधिकारी, कर्मचारी आपण किती तास काम करत आहोत, याचा लेखाजाेखा न ठेवता अथक बारा ते अठरा तास काम करत आहेत. आरोग्य यंत्रणेची अवस्था तर त्याहूनही अवघड आहे, हे डोळसपणे समजून घ्यायला हवे. एखाद्या व्यक्तीकडून चूक झाली तर आपण तिच्यावरून संपूर्ण यंत्रणेला दोष देतो आणि ते करत असलेल्या कामाकडे दुर्लक्ष करतो. मात्र, यातही राजकारण अधिक असते. सध्या रत्नागिरीत विविध पक्ष तापल्या तव्यावर पोळी भाजण्यापलीकडे काहीही करत नाहीत. कोरोनाच्या संकटात होरपळेतोय तो सामान्य माणूस. प्रशासनालाच केवळ दोष देण्यापलीकडे आणि त्यातील केवळ चुकाच दाखविण्यापलिकडे फारसं काही केलं जात नाही. चुका असतील तर दाखवायलाच हव्यात, पण त्यासाठीही काळ वेळेचे भानही हवेच. आम्हाला लोकांचा किती पुळका, हे केवळ दाखविण्यासाठीच अट्टाहास दिसतो. मात्र, एकत्र येऊन कोरोनाचा लढा देऊया, असे कुणालाच वाटत नाही ही शोकांतिका आहे. म्हणूनच सध्या परिस्थिती गंभीर होत आहे.

यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत, ते विविध सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक. राजकारणापलीकडे आणि प्रसिद्धीच्याही पलीकडे जाऊनही ते खऱ्या तळमळीने काम करत आहेत. त्यांना कुठल्याही पक्षाशी अथवा राजकारणाशी काहीही देणं नाही म्हणूनच हे स्वयंसेवक रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी देवदूत ठरत आहेत. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना जेवण, औषधांचे सहकार्य करण्यापासून तर काहींचा दुर्दैवाने मृत्यू झाला आणि त्याचे नातेवाईक पुढे आले नाहीत तर त्याच्या अंत्यसंस्कारांसाठीही पुढे येत आहे. विविध पक्षांनी यातून काही तरी शिकावं. राजकारणापेक्षा व्यक्तींचे जीव महत्त्वाचे नाहीत का?