शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

सध्या काय महत्वाचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:20 IST

दुसरीकडे गेल्या दीड वर्षांपासून आरोग्य यंत्रणेची मूठभर माणसे तहान भूक विसरून रात्रंदिवस जागून कोरोनाशी लढा देत रुग्णाला मृत्यूच्या दाढेतून ...

दुसरीकडे गेल्या दीड वर्षांपासून आरोग्य यंत्रणेची मूठभर माणसे तहान भूक विसरून रात्रंदिवस जागून कोरोनाशी लढा देत रुग्णाला मृत्यूच्या दाढेतून परत आणायचा प्रयत्न करत आहेत. प्रशासनाची स्थितीही याहून काही वेगळी नाही. दिवस-रात्र शासनाकडून येणाऱ्या सततच्या नियमावलीची अंमलबजावणी करताना प्रशासनही मेटाकुटीस आले आहे. त्यातूनच नागरिकांच्या अनेक नाराजींना सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाचेही अपुरे मनुष्यबळ, त्यातच एकाएकाच्या पाठीवर अनेक कामांचे ओझे त्यामुळे यंत्रणा थकलेली असूनही या महामारीच्या निवारणासाठी जीवाचे रान करत आहेत. हे करताना यंत्रणेतील अधिकारी आणि कर्मचारी हेही अखेरीस माणसेच आहेत, याचे भान आज प्रत्येक व्यक्तींने बाळगायला हवे. दीड वर्षांपासून कोरोनाशी लढा देताना यंत्रणा थकली आहे. त्यांना काय त्यांच्या कामाचे वेतन मिळते. असे आपण सहजपणे बोलत असलो तरीही सध्या हे अधिकारी, कर्मचारी आपण किती तास काम करत आहोत, याचा लेखाजाेखा न ठेवता अथक बारा ते अठरा तास काम करत आहेत. आरोग्य यंत्रणेची अवस्था तर त्याहूनही अवघड आहे, हे डोळसपणे समजून घ्यायला हवे. एखाद्या व्यक्तीकडून चूक झाली तर आपण तिच्यावरून संपूर्ण यंत्रणेला दोष देतो आणि ते करत असलेल्या कामाकडे दुर्लक्ष करतो. मात्र, यातही राजकारण अधिक असते. सध्या रत्नागिरीत विविध पक्ष तापल्या तव्यावर पोळी भाजण्यापलीकडे काहीही करत नाहीत. कोरोनाच्या संकटात होरपळेतोय तो सामान्य माणूस. प्रशासनालाच केवळ दोष देण्यापलीकडे आणि त्यातील केवळ चुकाच दाखविण्यापलिकडे फारसं काही केलं जात नाही. चुका असतील तर दाखवायलाच हव्यात, पण त्यासाठीही काळ वेळेचे भानही हवेच. आम्हाला लोकांचा किती पुळका, हे केवळ दाखविण्यासाठीच अट्टाहास दिसतो. मात्र, एकत्र येऊन कोरोनाचा लढा देऊया, असे कुणालाच वाटत नाही ही शोकांतिका आहे. म्हणूनच सध्या परिस्थिती गंभीर होत आहे.

यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत, ते विविध सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक. राजकारणापलीकडे आणि प्रसिद्धीच्याही पलीकडे जाऊनही ते खऱ्या तळमळीने काम करत आहेत. त्यांना कुठल्याही पक्षाशी अथवा राजकारणाशी काहीही देणं नाही म्हणूनच हे स्वयंसेवक रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी देवदूत ठरत आहेत. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना जेवण, औषधांचे सहकार्य करण्यापासून तर काहींचा दुर्दैवाने मृत्यू झाला आणि त्याचे नातेवाईक पुढे आले नाहीत तर त्याच्या अंत्यसंस्कारांसाठीही पुढे येत आहे. विविध पक्षांनी यातून काही तरी शिकावं. राजकारणापेक्षा व्यक्तींचे जीव महत्त्वाचे नाहीत का?