शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

सध्या काय महत्वाचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:20 IST

दुसरीकडे गेल्या दीड वर्षांपासून आरोग्य यंत्रणेची मूठभर माणसे तहान भूक विसरून रात्रंदिवस जागून कोरोनाशी लढा देत रुग्णाला मृत्यूच्या दाढेतून ...

दुसरीकडे गेल्या दीड वर्षांपासून आरोग्य यंत्रणेची मूठभर माणसे तहान भूक विसरून रात्रंदिवस जागून कोरोनाशी लढा देत रुग्णाला मृत्यूच्या दाढेतून परत आणायचा प्रयत्न करत आहेत. प्रशासनाची स्थितीही याहून काही वेगळी नाही. दिवस-रात्र शासनाकडून येणाऱ्या सततच्या नियमावलीची अंमलबजावणी करताना प्रशासनही मेटाकुटीस आले आहे. त्यातूनच नागरिकांच्या अनेक नाराजींना सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाचेही अपुरे मनुष्यबळ, त्यातच एकाएकाच्या पाठीवर अनेक कामांचे ओझे त्यामुळे यंत्रणा थकलेली असूनही या महामारीच्या निवारणासाठी जीवाचे रान करत आहेत. हे करताना यंत्रणेतील अधिकारी आणि कर्मचारी हेही अखेरीस माणसेच आहेत, याचे भान आज प्रत्येक व्यक्तींने बाळगायला हवे. दीड वर्षांपासून कोरोनाशी लढा देताना यंत्रणा थकली आहे. त्यांना काय त्यांच्या कामाचे वेतन मिळते. असे आपण सहजपणे बोलत असलो तरीही सध्या हे अधिकारी, कर्मचारी आपण किती तास काम करत आहोत, याचा लेखाजाेखा न ठेवता अथक बारा ते अठरा तास काम करत आहेत. आरोग्य यंत्रणेची अवस्था तर त्याहूनही अवघड आहे, हे डोळसपणे समजून घ्यायला हवे. एखाद्या व्यक्तीकडून चूक झाली तर आपण तिच्यावरून संपूर्ण यंत्रणेला दोष देतो आणि ते करत असलेल्या कामाकडे दुर्लक्ष करतो. मात्र, यातही राजकारण अधिक असते. सध्या रत्नागिरीत विविध पक्ष तापल्या तव्यावर पोळी भाजण्यापलीकडे काहीही करत नाहीत. कोरोनाच्या संकटात होरपळेतोय तो सामान्य माणूस. प्रशासनालाच केवळ दोष देण्यापलीकडे आणि त्यातील केवळ चुकाच दाखविण्यापलिकडे फारसं काही केलं जात नाही. चुका असतील तर दाखवायलाच हव्यात, पण त्यासाठीही काळ वेळेचे भानही हवेच. आम्हाला लोकांचा किती पुळका, हे केवळ दाखविण्यासाठीच अट्टाहास दिसतो. मात्र, एकत्र येऊन कोरोनाचा लढा देऊया, असे कुणालाच वाटत नाही ही शोकांतिका आहे. म्हणूनच सध्या परिस्थिती गंभीर होत आहे.

यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत, ते विविध सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक. राजकारणापलीकडे आणि प्रसिद्धीच्याही पलीकडे जाऊनही ते खऱ्या तळमळीने काम करत आहेत. त्यांना कुठल्याही पक्षाशी अथवा राजकारणाशी काहीही देणं नाही म्हणूनच हे स्वयंसेवक रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी देवदूत ठरत आहेत. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना जेवण, औषधांचे सहकार्य करण्यापासून तर काहींचा दुर्दैवाने मृत्यू झाला आणि त्याचे नातेवाईक पुढे आले नाहीत तर त्याच्या अंत्यसंस्कारांसाठीही पुढे येत आहे. विविध पक्षांनी यातून काही तरी शिकावं. राजकारणापेक्षा व्यक्तींचे जीव महत्त्वाचे नाहीत का?