शहरं
Join us  
Trending Stories
1
संतापजनक...! IAS अधिकाऱ्याची गाडी तपासली; गोव्याच्या एसपींनी पोलिसांनाच दिली उठाबशांची शिक्षा...
2
१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा
3
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
4
टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले...
5
Crime: बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
6
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
7
उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक
8
सरकार आणखी एका बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत; खात्यात येणार २१०० कोटी, सध्या आहे ९५% हिस्सा
9
'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
10
"महापालिका निवडणूक लुटण्याचे वाटे केले गेले"; अंजली दमानियांचा निशाणा, महायुतीवर भडकल्या
11
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक
12
निवडणुका जाहीर होताच तापले युती अन् आघाडीचे राजकारण; महाराष्ट्रात काही ठिकाणी गणित बिघडणार
13
अमेरिकन शेअर बाजारात मोठा बदल! नॅस्डॅक २४ तास ट्रेडिंग सुरू करण्याच्या तयारीत; भारतीय गुंतवणूकदारांवर काय होणार परिणाम?
14
अमेरिकेत पॅलेस्टिनसह इतर ७ देशांतील नागरिकांना प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
15
Stock Market Today: सुस्त सुरुवातीनंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये किंचित वाढ; ICICI Bank, Nestle, HDFC Bank मध्ये घसरण
16
महालक्ष्मी व्रत उद्यापन: ४ गुरुवार नेटाने केलेल्या महालक्ष्मी व्रताचे १८ डिसेंबर रोजी उद्यापन कसे करावे? वाचा विधी
17
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
18
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
19
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
20
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
Daily Top 2Weekly Top 5

अशा लाॅकडाऊनचा उपयोग तरी काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:34 IST

रत्नागिरी :कोरोनाची साखळी तुटण्यासाठी शासनाने १ जूनपर्यंत राज्यात लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्याचबरोबर ज्यांना सौम्य लक्षणे आहेत, किंवा अजिबातच ...

रत्नागिरी :कोरोनाची साखळी तुटण्यासाठी शासनाने १ जूनपर्यंत राज्यात लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्याचबरोबर ज्यांना सौम्य लक्षणे आहेत, किंवा अजिबातच लक्षणे नाहीत, अशा रुग्णांना होम आयसोलशेनमध्ये ठेवण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, ज्या घरांमध्ये किंवा फ्लॅटमध्ये स्वतंत्र स्वच्छतागृहाची सोय नाही, अशा ठिकाणी रुग्णाच्या संसगार्मुळे घरातील बाधित होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे बाहेर लॉकडाऊन असले तरी घरात रहाणाऱ्या रुग्णांमुळेच कोरोना संसर्ग वाढत आहे.

सध्या होम आयसोलशेनमध्ये असणाऱ्यांची संख्या जवळपास बाराशेपर्यंत आहे. या रुग्णांमध्ये लक्षणे नसली अथवा सौम्य लक्षणे असली तरी हे रुग्ण आपल्या संपर्कातील ३० व्यक्तींना बाधित करू शकतात. शासकीय रुग्णालयांमधील बेडची अपुरी असलेली क्षमता लक्षात घेऊन शासनाने ही नियमावली जाहीर केली आहे. त्यामुळे सध्या रुग्णालयांवरील ताण कमी होऊन घरी आयसोलेशनमध्ये रहाणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे.

स्वतंत्र संडास बाथरूमची सोय असलेली वेगळी खोली असणाऱ्या घरांची संख्या कमी आहे. त्यामुळे अशा घरांमध्ये किंवा वन रूम किचनमध्ये रहाणाऱ्या फ्लॅटमध्ये अशा रुग्णांना अलगीकरणात ठेवणे अशक्य आहे. मात्र, शासनाच्या नियमामुळे आता सरसकट रुग्ण होम आयसोलेशनमध्ये राहू लागले आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग खंडित न होता घरातील माणसांमध्ये अधिकच वाढत आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेचा संसर्ग झपाट्याने होत असल्याने घरातील लहान मुले, वृद्ध यांच्याबरोबरच आजुबाजूच्या लोकांमध्ये हा प्रभाव अधिक वाढत आहे. त्यामुळेच कोरोना रुग्णसंख्या कमी होण्यापेक्षा वाढत आहे.

शासनाच्या आदेशानुसार कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात आता १ जूनपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे. मात्र, सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत दूध, भाजीपाला आदी अत्यावश्यक मानल्या जाणाऱ्या वस्तूंची दुकाने सुरू आहेत. दूध हे काही किराणा दुकानातही मिळत आहे. त्यामुळे या वेळेत किराणांची खरेदीही सुरू आहे. काही दुकानदार शटर अर्ध्यावर पाडून माल विकत आहेत. त्यामुळे या वेळेत असलेली वर्दळ पाहाता, कोरोनाची साखळी तुटण्याऐवजी वाढतच आहे.

सध्या बाहेर फिरणाऱ्यांकडून कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी लॉकडाऊन अधिक कडक करून सर्व उद्योग - व्यवसाय बंद ठेवले आहेत. त्यामुळे आर्थिक गणिते विस्कळीत झाली आहे. परंतु कोरोना साखळी तुटण्यासाठी जी महत्त्वाची कारणे आहेत, त्याकडेच दुर्लक्ष होत असल्याने कोरोनाचा संसर्ग कमी करण्यात आरोग्य यंत्रणेला तसेच प्रशासनाला अपयश येत आहे. त्यामुळे लाॅकडाऊन केवळ नावापुरतेच ठरत आहे.

कोरोनाची साखळी ब्रेक करण्यासाठी पूर्णपणे लाॅकडाऊन झाले असते तरच कोरोना साखळी तुटण्यास मदत झाली असती. तसेच ज्या घरांमध्ये अलगीकरण करण्यासाठीच्या सुविधा नाहीत, अशा रुग्णांना घरी न ठेवता त्यांना कोविड सेंटरमध्ये ठेवणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.