शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

महाराष्ट्रभर जे सुरू आहे ते रत्नागिरीतही सुरू झालं पाहिजे : नीलेश राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:32 IST

रत्नागिरी : जिल्हा प्रशासनाने आरोग्य सेवा देण्यात आलेल्या अपयशाचे खापर रत्नागिरीच्या जनतेवर फोडू नये. राज्याने दिलेल्या नियमावलीप्रमाणे ज्या गोष्टी ...

रत्नागिरी : जिल्हा प्रशासनाने आरोग्य सेवा देण्यात आलेल्या अपयशाचे खापर रत्नागिरीच्या जनतेवर फोडू नये. राज्याने दिलेल्या नियमावलीप्रमाणे ज्या गोष्टी सुरू आहेत त्या रत्नागिरीमध्येही सुरू राहिल्या पाहिजेत, असे मत भाजपचे प्रदेश सचिव नीलेश राणे यांनी प्रसारमाध्यमांशी बाेलताना सांगितले.

राज्य शासनाने कोविडच्या प्रतिबंधासाठी नवीन अध्यादेश जाहीर करीत राज्यात संचारबंदी लागू केली आहे. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यात चक्क कर्फ्यू लावला गेला असून, राज्य सरकारच्याच आदेशाची पायमल्ली जिल्हा प्रशासन करीत आहे. या गोष्टीकडे भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा माजी खासदार नीलेश राणे यांनी लक्ष वेधले असून जिल्हा प्रशासनाने त्यांच्या अपयशाचे खापर रत्नागिरीच्या जनतेच्या माथी मारू नये. महाराष्ट्र राज्यात वेगळा नियम आणि फक्त रत्नागिरीसाठी वेगळा नियम असता काम नये. ते म्हणाले, मुंबई येथे रिक्षा, रेल्वे, हॉटेल्स सुरू आहेत. अन्य जिल्ह्यातही सुरू आहेत. राज्याने दिलेल्या निर्देशानुसार ते सुरू आहे. मग, रत्नागिरीमध्ये असे काय झाले की त्या ठिकाणी कर्फ्यू लावला जात आहे, असा प्रश्न राणे यांनी उपस्थित केला आहे. जिल्हा प्रशासनाने आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याकडे आधी लक्ष द्यावे, अशी सूचना त्यांनी केली आहे.

ते पुढे म्हणाले, कोरोनाचे रुग्ण काय, आकाशातून पडत आहेत काय की रत्नागिरीला वेगळे नियम लावले जात आहेत. ज्या गोष्टी राज्यात सुरू आहेत त्या रत्नागिरीत बंद आहेत. रत्नागिरीला काय भिकेला लावायचे ठरविले आहे काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. ज्या गोष्टी महाराष्ट्रभर सुरू आहेत, त्या रत्नागिरीत सुरू झाल्या पाहिजेत, असे त्यांनी स्पष्ट केले. लोकांचा अंत पाहू नका, असेही नीलेश राणे म्हणाले.