शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रभर जे सुरू आहे ते रत्नागिरीतही सुरू झालं पाहिजे : नीलेश राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:32 IST

रत्नागिरी : जिल्हा प्रशासनाने आरोग्य सेवा देण्यात आलेल्या अपयशाचे खापर रत्नागिरीच्या जनतेवर फोडू नये. राज्याने दिलेल्या नियमावलीप्रमाणे ज्या गोष्टी ...

रत्नागिरी : जिल्हा प्रशासनाने आरोग्य सेवा देण्यात आलेल्या अपयशाचे खापर रत्नागिरीच्या जनतेवर फोडू नये. राज्याने दिलेल्या नियमावलीप्रमाणे ज्या गोष्टी सुरू आहेत त्या रत्नागिरीमध्येही सुरू राहिल्या पाहिजेत, असे मत भाजपचे प्रदेश सचिव नीलेश राणे यांनी प्रसारमाध्यमांशी बाेलताना सांगितले.

राज्य शासनाने कोविडच्या प्रतिबंधासाठी नवीन अध्यादेश जाहीर करीत राज्यात संचारबंदी लागू केली आहे. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यात चक्क कर्फ्यू लावला गेला असून, राज्य सरकारच्याच आदेशाची पायमल्ली जिल्हा प्रशासन करीत आहे. या गोष्टीकडे भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा माजी खासदार नीलेश राणे यांनी लक्ष वेधले असून जिल्हा प्रशासनाने त्यांच्या अपयशाचे खापर रत्नागिरीच्या जनतेच्या माथी मारू नये. महाराष्ट्र राज्यात वेगळा नियम आणि फक्त रत्नागिरीसाठी वेगळा नियम असता काम नये. ते म्हणाले, मुंबई येथे रिक्षा, रेल्वे, हॉटेल्स सुरू आहेत. अन्य जिल्ह्यातही सुरू आहेत. राज्याने दिलेल्या निर्देशानुसार ते सुरू आहे. मग, रत्नागिरीमध्ये असे काय झाले की त्या ठिकाणी कर्फ्यू लावला जात आहे, असा प्रश्न राणे यांनी उपस्थित केला आहे. जिल्हा प्रशासनाने आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याकडे आधी लक्ष द्यावे, अशी सूचना त्यांनी केली आहे.

ते पुढे म्हणाले, कोरोनाचे रुग्ण काय, आकाशातून पडत आहेत काय की रत्नागिरीला वेगळे नियम लावले जात आहेत. ज्या गोष्टी राज्यात सुरू आहेत त्या रत्नागिरीत बंद आहेत. रत्नागिरीला काय भिकेला लावायचे ठरविले आहे काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. ज्या गोष्टी महाराष्ट्रभर सुरू आहेत, त्या रत्नागिरीत सुरू झाल्या पाहिजेत, असे त्यांनी स्पष्ट केले. लोकांचा अंत पाहू नका, असेही नीलेश राणे म्हणाले.