शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पाचे म्हणणे काय आहे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:35 IST

कोणताही व्यवसाय करताना त्यातून पैसा कमविणे हेच व्यावसायिकाचे मुख्य ध्येय असते. सुरूवातीला नवनिर्मितीचा आनंद असतो पण जसजसा पैसा मिळत ...

कोणताही व्यवसाय करताना त्यातून पैसा कमविणे हेच व्यावसायिकाचे मुख्य ध्येय असते. सुरूवातीला नवनिर्मितीचा आनंद असतो पण जसजसा पैसा मिळत जातो, तसतशी निर्मितीच्या आनंदाची जागा पैशातून मिळणारा आनंद घेतो. ह्या वाढत्या व्यवसायामुळे निसर्गाची होणारी हानी दुर्लक्षित केली जाते. आपण गणपतीच्या मूर्ती निर्मितीच्याच व्यवसायाचे उदाहरण घेऊया. टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. सुरुवातीला थोड्या प्रमाणात होणाऱ्या या गणेशोत्सवाने हळूहळू आपले हातपाय पसरायला सुरुवात केली. उंचच उंच मूर्ती, त्यातसुद्धा स्पर्धा लागू लागली. वेगवेगळे देखावे व ते बघण्यासाठी लागणाऱ्या लांबच लांब रांगा, कुटुंब विभक्त होत गेली तसतशी मूर्तींची संख्या वाढू लागली तसतसे कारखाने वाढू लागले. सार्वजनिक गणेशोत्सवात तर राजकारणही घुसले. नवसाला पावणारा गणपती, हा इकडचा राजा तो तिकडचा राजा अशा निरनिराळ्या बिरुदावली लावून लोकांना आपल्याकडे वळवून घेण्याची स्पर्धा वाढली.

सार्वजनिक गणपती वाढण्यामागचे कारण त्याच्याविषयीची भक्ती नव्हती तर होता वर्गणी मागचा पैसा तसेच नवसाला येणारे दागिने व इतर गोष्टी. आता तर गणपती परदेशातसुद्धा जाऊ लागले, त्यांची निर्यात होऊ लागली. जूनपूर्वीच मूर्तीने भरलेले कंटेनर जहाजाने परदेशी रवाना होतात. हा सर्व पैशांसाठी होणारा खेळ आहे. त्या बाप्पाच्या मूर्तींना आपण एक ‘विक्रेय वस्तू’ नफा मिळवून देणारे उत्पादन बनवलं आहे हे चूक आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात गणपती बनविण्यासाठी कोठून तरी परप्रांतातून शाडूची माती आणली जाते, तिच्या मूर्ती बनवून त्या जगभर विकल्या जातात हा पर्यावरणीक अपराध आहे. या व्यापारातून निसर्गाची प्रचंड हानी होते आहे आणि त्याबद्दल कोणालाच काही वाटत नाही. मुंबईतील मोठे, छोटे गणपती समुद्रात बुडवूनही अखंड राहतात. त्यांना दुसऱ्या दिवशी महानगरपालिका गोळा करून क्रशरमध्ये टाकून बारीक करते. केवढी ही विटंबना त्या गणेशाची. पण दरवर्षी हे होतच असते व त्याचे सुखदुःख कोणालाच नसते. सध्याच्या महागाईत कितीतरी जण केवळ नाईलाज म्हणून बाप्पा आणतात, कारण खर्च करण्याची त्यांची ऐपत नसते. एकदा आणला की कायमचा आणला पाहिजे, ही अंधश्रद्धा त्यांना तसे करायला भाग पाडते. चराचरात ईश्वराचे अस्तित्त्व आहे. असे असताना घरात गणपती आणला तरच त्याचे अस्तित्व आहे हे मानणे किती योग्य आहे? टिळकांनी गणपती आणला तोच मुळी राजकारणाच्या दृष्टिकोनातून शिवजयंतीला ‘काऊंटर ॲटॅक’ म्हणून.

बाप्पाचे विसर्जन करण्याचा मन उद्विग्न करणारा एक प्रकार मला मध्यप्रदेश व धुळे येथे बघायला मिळाला. जयपूरवरून आम्ही पुण्याला येत होतो. रात्री दीड वाजता आम्ही शिरपूर गावात पोहोचलो. त्या गावातून दुभाषी नदी वाहते, नदीवर पूल आहे पण नदीवर जाण्यासाठी मार्ग नाही. आम्ही जेव्हा पुलावर आलो तेव्हा तेथे दोन मोठे गणपती ‘लॉरी’मधून पोलीस बंदोबस्तात आणले होते. त्यांच्याबरोबर एक क्रेनसुद्धा होती. पुढे काय होतंय ते पाहण्यासाठी आम्ही पुढे जाऊन थांबलो, दोन लॉऱ्यांपैकी एक पुलाच्या एका बाजूला तर दुसरी पुलाच्या दुसऱ्या बाजूला खेटून उभी राहिली, बाप्पाची उंची पुलाच्या रेलिंगच्या वरती होती. बाप्पाच्या नावाचा गजर झाला, क्रेन पुढे सरकली व तिच्या हुकाने मागच्या बाजूने बाप्पाला जोरकस धक्का दिला आणि बाप्पा नदीत पडला. दोन्ही बाप्पांचे असेच विसर्जन झाले याला विसर्जन म्हणावे का? एवढ्या उंचीवरून बाप्पाला अक्षरशः फेकून दिले होते. लहान, मोठ्या सगळ्याच बाप्पांचे विसर्जन असेच होते. या सगळ्या प्रकारात त्या गजाननाविषयी श्रद्धा कोठेच दिसून येत नाही. सगळीकडे नुसता व्यापार. गणेशमूर्तीला क्रय-विक्रेय वस्तू बनवून टाकली आहे. मूर्ती बनविणारे व मूर्ती घेणारे निर्बुद्धपणे या व्यवस्थेचा भाग बनले आहेत.

गणेशमूर्तीचा उद्योग गोत्यात आणून गणपती हेच सांगायचा प्रयत्न करतोय मातीशी नातं जोडा, स्थानिकतेला जोपासा, निसर्गाला जपा आणि हे जेव्हा कोणाला ऐकू येत नाही त्यावेळी शेवटचा उपाय म्हणून ही परिस्थिती निर्माण करून त्याने ह्यांच्या पाठीत सणसणीत रट्टा दिला आहे. तेव्हा अजूनही वेळ गेलेली नाही, भानावर या आणि बदल करा.

- डॉ. मीनल कुष्टे, लांजा