शहरं
Join us  
Trending Stories
1
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
2
शुभांशू शुक्ला परतले, पंतप्रधान मोदींनी स्वागत केले; गगनयान मोहिमेचा उल्लेख करत म्हणाले...
3
"तुमच्यापेक्षा जास्त बोलता येते..."; विधानसभेत ठाकरेंचे आमदार आणि शिंदेसेनेचे मंत्री भिडले
4
Pune Porsche Accident Update: दोघांना उडवणाऱ्या आरोपीला दिलासा, पोलिसांना मोठा झटका; न्याय मंडळाचा निर्णय काय?
5
विकली जाणार ५४ वर्ष जुनी 'ही' कंपनी, तुम्ही नक्कीच नाव ऐकलं असणार; ४५ देशांत आहे ६,४८२ कोटींचा व्यवसाय 
6
सरकार नेमके कोणाला, कशाला 'अर्बन नक्षलवाद' ठरवणार आहे?; जनसुरक्षा कायद्यावरून प्रकाश आंबेडकरांचा सवाल
7
'कुठल्या दलित व्यक्तीला का पाठवलं नाही?', शुभांशू शुक्ला यांच्या अंतराळ यात्रेवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका!
8
चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाखाली 'प्रोजेक्ट' धर्मांतर सुरू होते, काम करणाऱ्या मुलींना पैसे दिले जात होते
9
डाएटिंग, व्यायाम... सर्व करुन दमलात पण वजन कमीच होईना; रोजच्या 'या' ६ सवयी जबाबदार
10
Ritual: स्त्रियांनी साष्टांग नमस्कार घालू नये असे म्हणतात; पण का? जाणून घ्या शास्त्रार्थ!
11
जुन्या घरात सापडला सांगाडा, नोकियाच्या फोनने असं उघड केलं १० वर्षांपूर्वी झालेल्या मृत्यूचं गुपित, पोलिसही अवाक्
12
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१५,११४ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
13
Manglagauri 2025: यंदा मंगळागौर कधी? ही घ्या तारखांची यादी, 'अशी' करा सुंदर तयारी लवकर..
14
५० व्या वर्षी निवृत्त व्हायचंय? 'या' स्मार्ट प्लॅनने मिळवा दरमहा १ लाख रुपये पगार! मासिक ५००० गुंतवणूक
15
ठाकरे बंधूंची युती होणार की नाही? संभ्रम वाढला; मनसे नेते म्हणतात, “एकटे लढू, तयारी आहे”
16
भाजप प्रवेशाचा मार्ग झाला मोकळा; ठाकरेंच्या शिवसेनेचे बागुल, राजवाडे प्रकरणात नवा 'द्विस्ट'
17
बापरे! रुग्णालयाचं बिल भरण्यासाठी दागिने विकले, गहाण ठेवली शेती; ICUमध्ये मृत मुलावर उपचार
18
भारत-रशिया-चीन त्रिकुट..; पुतिन यांचे स्वप्न अमेरिका अन् डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणार
19
मोठी बातमी : केरळमधील नर्स निमिषा प्रिया हिला होणारी फाशी टळली, भारताच्या मुत्सद्देगिरीला यश, पडद्यामागे घडल्या अशा घडामोडी 
20
चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्याच्या किंमतीतही झाला बदल; १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार

बाप्पाचे म्हणणे काय आहे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:35 IST

कोणताही व्यवसाय करताना त्यातून पैसा कमविणे हेच व्यावसायिकाचे मुख्य ध्येय असते. सुरूवातीला नवनिर्मितीचा आनंद असतो पण जसजसा पैसा मिळत ...

कोणताही व्यवसाय करताना त्यातून पैसा कमविणे हेच व्यावसायिकाचे मुख्य ध्येय असते. सुरूवातीला नवनिर्मितीचा आनंद असतो पण जसजसा पैसा मिळत जातो, तसतशी निर्मितीच्या आनंदाची जागा पैशातून मिळणारा आनंद घेतो. ह्या वाढत्या व्यवसायामुळे निसर्गाची होणारी हानी दुर्लक्षित केली जाते. आपण गणपतीच्या मूर्ती निर्मितीच्याच व्यवसायाचे उदाहरण घेऊया. टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. सुरुवातीला थोड्या प्रमाणात होणाऱ्या या गणेशोत्सवाने हळूहळू आपले हातपाय पसरायला सुरुवात केली. उंचच उंच मूर्ती, त्यातसुद्धा स्पर्धा लागू लागली. वेगवेगळे देखावे व ते बघण्यासाठी लागणाऱ्या लांबच लांब रांगा, कुटुंब विभक्त होत गेली तसतशी मूर्तींची संख्या वाढू लागली तसतसे कारखाने वाढू लागले. सार्वजनिक गणेशोत्सवात तर राजकारणही घुसले. नवसाला पावणारा गणपती, हा इकडचा राजा तो तिकडचा राजा अशा निरनिराळ्या बिरुदावली लावून लोकांना आपल्याकडे वळवून घेण्याची स्पर्धा वाढली.

सार्वजनिक गणपती वाढण्यामागचे कारण त्याच्याविषयीची भक्ती नव्हती तर होता वर्गणी मागचा पैसा तसेच नवसाला येणारे दागिने व इतर गोष्टी. आता तर गणपती परदेशातसुद्धा जाऊ लागले, त्यांची निर्यात होऊ लागली. जूनपूर्वीच मूर्तीने भरलेले कंटेनर जहाजाने परदेशी रवाना होतात. हा सर्व पैशांसाठी होणारा खेळ आहे. त्या बाप्पाच्या मूर्तींना आपण एक ‘विक्रेय वस्तू’ नफा मिळवून देणारे उत्पादन बनवलं आहे हे चूक आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात गणपती बनविण्यासाठी कोठून तरी परप्रांतातून शाडूची माती आणली जाते, तिच्या मूर्ती बनवून त्या जगभर विकल्या जातात हा पर्यावरणीक अपराध आहे. या व्यापारातून निसर्गाची प्रचंड हानी होते आहे आणि त्याबद्दल कोणालाच काही वाटत नाही. मुंबईतील मोठे, छोटे गणपती समुद्रात बुडवूनही अखंड राहतात. त्यांना दुसऱ्या दिवशी महानगरपालिका गोळा करून क्रशरमध्ये टाकून बारीक करते. केवढी ही विटंबना त्या गणेशाची. पण दरवर्षी हे होतच असते व त्याचे सुखदुःख कोणालाच नसते. सध्याच्या महागाईत कितीतरी जण केवळ नाईलाज म्हणून बाप्पा आणतात, कारण खर्च करण्याची त्यांची ऐपत नसते. एकदा आणला की कायमचा आणला पाहिजे, ही अंधश्रद्धा त्यांना तसे करायला भाग पाडते. चराचरात ईश्वराचे अस्तित्त्व आहे. असे असताना घरात गणपती आणला तरच त्याचे अस्तित्व आहे हे मानणे किती योग्य आहे? टिळकांनी गणपती आणला तोच मुळी राजकारणाच्या दृष्टिकोनातून शिवजयंतीला ‘काऊंटर ॲटॅक’ म्हणून.

बाप्पाचे विसर्जन करण्याचा मन उद्विग्न करणारा एक प्रकार मला मध्यप्रदेश व धुळे येथे बघायला मिळाला. जयपूरवरून आम्ही पुण्याला येत होतो. रात्री दीड वाजता आम्ही शिरपूर गावात पोहोचलो. त्या गावातून दुभाषी नदी वाहते, नदीवर पूल आहे पण नदीवर जाण्यासाठी मार्ग नाही. आम्ही जेव्हा पुलावर आलो तेव्हा तेथे दोन मोठे गणपती ‘लॉरी’मधून पोलीस बंदोबस्तात आणले होते. त्यांच्याबरोबर एक क्रेनसुद्धा होती. पुढे काय होतंय ते पाहण्यासाठी आम्ही पुढे जाऊन थांबलो, दोन लॉऱ्यांपैकी एक पुलाच्या एका बाजूला तर दुसरी पुलाच्या दुसऱ्या बाजूला खेटून उभी राहिली, बाप्पाची उंची पुलाच्या रेलिंगच्या वरती होती. बाप्पाच्या नावाचा गजर झाला, क्रेन पुढे सरकली व तिच्या हुकाने मागच्या बाजूने बाप्पाला जोरकस धक्का दिला आणि बाप्पा नदीत पडला. दोन्ही बाप्पांचे असेच विसर्जन झाले याला विसर्जन म्हणावे का? एवढ्या उंचीवरून बाप्पाला अक्षरशः फेकून दिले होते. लहान, मोठ्या सगळ्याच बाप्पांचे विसर्जन असेच होते. या सगळ्या प्रकारात त्या गजाननाविषयी श्रद्धा कोठेच दिसून येत नाही. सगळीकडे नुसता व्यापार. गणेशमूर्तीला क्रय-विक्रेय वस्तू बनवून टाकली आहे. मूर्ती बनविणारे व मूर्ती घेणारे निर्बुद्धपणे या व्यवस्थेचा भाग बनले आहेत.

गणेशमूर्तीचा उद्योग गोत्यात आणून गणपती हेच सांगायचा प्रयत्न करतोय मातीशी नातं जोडा, स्थानिकतेला जोपासा, निसर्गाला जपा आणि हे जेव्हा कोणाला ऐकू येत नाही त्यावेळी शेवटचा उपाय म्हणून ही परिस्थिती निर्माण करून त्याने ह्यांच्या पाठीत सणसणीत रट्टा दिला आहे. तेव्हा अजूनही वेळ गेलेली नाही, भानावर या आणि बदल करा.

- डॉ. मीनल कुष्टे, लांजा