शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
4
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
5
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
6
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
7
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
8
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
9
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
10
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
11
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
12
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
13
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
14
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
15
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
16
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
17
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
18
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
19
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
20
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?

बाप्पाचे म्हणणे काय आहे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:35 IST

कोणताही व्यवसाय करताना त्यातून पैसा कमविणे हेच व्यावसायिकाचे मुख्य ध्येय असते. सुरूवातीला नवनिर्मितीचा आनंद असतो पण जसजसा पैसा मिळत ...

कोणताही व्यवसाय करताना त्यातून पैसा कमविणे हेच व्यावसायिकाचे मुख्य ध्येय असते. सुरूवातीला नवनिर्मितीचा आनंद असतो पण जसजसा पैसा मिळत जातो, तसतशी निर्मितीच्या आनंदाची जागा पैशातून मिळणारा आनंद घेतो. ह्या वाढत्या व्यवसायामुळे निसर्गाची होणारी हानी दुर्लक्षित केली जाते. आपण गणपतीच्या मूर्ती निर्मितीच्याच व्यवसायाचे उदाहरण घेऊया. टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. सुरुवातीला थोड्या प्रमाणात होणाऱ्या या गणेशोत्सवाने हळूहळू आपले हातपाय पसरायला सुरुवात केली. उंचच उंच मूर्ती, त्यातसुद्धा स्पर्धा लागू लागली. वेगवेगळे देखावे व ते बघण्यासाठी लागणाऱ्या लांबच लांब रांगा, कुटुंब विभक्त होत गेली तसतशी मूर्तींची संख्या वाढू लागली तसतसे कारखाने वाढू लागले. सार्वजनिक गणेशोत्सवात तर राजकारणही घुसले. नवसाला पावणारा गणपती, हा इकडचा राजा तो तिकडचा राजा अशा निरनिराळ्या बिरुदावली लावून लोकांना आपल्याकडे वळवून घेण्याची स्पर्धा वाढली.

सार्वजनिक गणपती वाढण्यामागचे कारण त्याच्याविषयीची भक्ती नव्हती तर होता वर्गणी मागचा पैसा तसेच नवसाला येणारे दागिने व इतर गोष्टी. आता तर गणपती परदेशातसुद्धा जाऊ लागले, त्यांची निर्यात होऊ लागली. जूनपूर्वीच मूर्तीने भरलेले कंटेनर जहाजाने परदेशी रवाना होतात. हा सर्व पैशांसाठी होणारा खेळ आहे. त्या बाप्पाच्या मूर्तींना आपण एक ‘विक्रेय वस्तू’ नफा मिळवून देणारे उत्पादन बनवलं आहे हे चूक आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात गणपती बनविण्यासाठी कोठून तरी परप्रांतातून शाडूची माती आणली जाते, तिच्या मूर्ती बनवून त्या जगभर विकल्या जातात हा पर्यावरणीक अपराध आहे. या व्यापारातून निसर्गाची प्रचंड हानी होते आहे आणि त्याबद्दल कोणालाच काही वाटत नाही. मुंबईतील मोठे, छोटे गणपती समुद्रात बुडवूनही अखंड राहतात. त्यांना दुसऱ्या दिवशी महानगरपालिका गोळा करून क्रशरमध्ये टाकून बारीक करते. केवढी ही विटंबना त्या गणेशाची. पण दरवर्षी हे होतच असते व त्याचे सुखदुःख कोणालाच नसते. सध्याच्या महागाईत कितीतरी जण केवळ नाईलाज म्हणून बाप्पा आणतात, कारण खर्च करण्याची त्यांची ऐपत नसते. एकदा आणला की कायमचा आणला पाहिजे, ही अंधश्रद्धा त्यांना तसे करायला भाग पाडते. चराचरात ईश्वराचे अस्तित्त्व आहे. असे असताना घरात गणपती आणला तरच त्याचे अस्तित्व आहे हे मानणे किती योग्य आहे? टिळकांनी गणपती आणला तोच मुळी राजकारणाच्या दृष्टिकोनातून शिवजयंतीला ‘काऊंटर ॲटॅक’ म्हणून.

बाप्पाचे विसर्जन करण्याचा मन उद्विग्न करणारा एक प्रकार मला मध्यप्रदेश व धुळे येथे बघायला मिळाला. जयपूरवरून आम्ही पुण्याला येत होतो. रात्री दीड वाजता आम्ही शिरपूर गावात पोहोचलो. त्या गावातून दुभाषी नदी वाहते, नदीवर पूल आहे पण नदीवर जाण्यासाठी मार्ग नाही. आम्ही जेव्हा पुलावर आलो तेव्हा तेथे दोन मोठे गणपती ‘लॉरी’मधून पोलीस बंदोबस्तात आणले होते. त्यांच्याबरोबर एक क्रेनसुद्धा होती. पुढे काय होतंय ते पाहण्यासाठी आम्ही पुढे जाऊन थांबलो, दोन लॉऱ्यांपैकी एक पुलाच्या एका बाजूला तर दुसरी पुलाच्या दुसऱ्या बाजूला खेटून उभी राहिली, बाप्पाची उंची पुलाच्या रेलिंगच्या वरती होती. बाप्पाच्या नावाचा गजर झाला, क्रेन पुढे सरकली व तिच्या हुकाने मागच्या बाजूने बाप्पाला जोरकस धक्का दिला आणि बाप्पा नदीत पडला. दोन्ही बाप्पांचे असेच विसर्जन झाले याला विसर्जन म्हणावे का? एवढ्या उंचीवरून बाप्पाला अक्षरशः फेकून दिले होते. लहान, मोठ्या सगळ्याच बाप्पांचे विसर्जन असेच होते. या सगळ्या प्रकारात त्या गजाननाविषयी श्रद्धा कोठेच दिसून येत नाही. सगळीकडे नुसता व्यापार. गणेशमूर्तीला क्रय-विक्रेय वस्तू बनवून टाकली आहे. मूर्ती बनविणारे व मूर्ती घेणारे निर्बुद्धपणे या व्यवस्थेचा भाग बनले आहेत.

गणेशमूर्तीचा उद्योग गोत्यात आणून गणपती हेच सांगायचा प्रयत्न करतोय मातीशी नातं जोडा, स्थानिकतेला जोपासा, निसर्गाला जपा आणि हे जेव्हा कोणाला ऐकू येत नाही त्यावेळी शेवटचा उपाय म्हणून ही परिस्थिती निर्माण करून त्याने ह्यांच्या पाठीत सणसणीत रट्टा दिला आहे. तेव्हा अजूनही वेळ गेलेली नाही, भानावर या आणि बदल करा.

- डॉ. मीनल कुष्टे, लांजा