शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
4
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
5
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
6
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
7
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
8
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
9
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
10
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
11
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
12
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
13
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
14
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
15
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
16
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
17
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
18
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
19
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
20
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण

पाश्चात्त्यांनी कौतुक केल्यावर वाढतंय योगाचे

By admin | Updated: June 21, 2016 01:18 IST

महत्त्व...!--योगदिन विशेष

मेहरुन नाकाडे ल्ल रत्नागिरीयोग ही व्याधीमुक्त जीवनाची पहिली पायरी आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. योगाची व्याप्ती, महत्व इतके मोठे आहे की, शब्दश: त्याची व्याख्या करणे शक्य नाही. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात किंबहुना तणावपूर्ण जीवनाचा योग अविभाज्य भाग बनला आहे. जगाला योगाचे महत्व पटले आहे. त्यामुळे जगभरातून योग शिकणाऱ्यांची संख्या वाढत आहे. वास्तविक योग हा भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासून आहे. मात्र आता पाश्चात्त्य देशांनी योगाचा स्वीकार केल्यानंतर त्याची भारतातील महती वाढू लागली आहे, अशी खंत या क्षेत्रात काम करणाऱ्यांच्या मनात आहे.पाश्चात्य देशांना, तेथील नागरिकांना योग, प्राणायाम या विज्ञानानिष्ठीत ज्ञानाची माहिती पटली आहे. त्याचे फायदे कळल्यामुळे योगाकडे वळणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आपल्या प्राचीन संस्कृतीचे अनुकरण पाश्चात्यांनी केल्यावर आपण त्याकडे आकर्षित झालो आहोत. २१ जून हा ‘जागतिक योग दिन’ म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येत असून, यानिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ३६५ दिवसांपैकी एक दिवस योगाला विशेष महत्व देण्यापेक्षा उर्वरित ३६४ दिवसांमधील काही मिनिटे अथवा तास हे योगासनासाठी देणे आवश्यक आहे. जेणेकरून भविष्यात आपण आजारापासून स्वत:ला दूर ठेवू शकू. तसेच यामुळे जिवनाचा खराखुरा आनंदही अनुभवता येईल.शासनाने देखील योगासनाला विशेष प्राध्यान्य देत शालेयस्तरावर विद्यार्थ्यांना योगासाठी प्रवृत्त केले आहे. मात्र, काही शाळांमध्ये आधीपासूनच योगासने शिकविली जात आहेत. काही विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय तसेच आॅलिंपियाडसारख्या स्पर्धेत सहभागी होऊन यश संपादन केले आहे. जिल्ह््याच्या रत्नकन्या पूर्वा व प्राप्ती किनरे, अवंती काळे या विद्यार्थिनींनी देखील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊन रत्नागिरीचे नाव उंचावले आहे.