शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

विंधन विहिरी ‘नियोजन’मधून

By admin | Updated: February 2, 2015 00:05 IST

जिल्हा परिषद : टंचाईकृती आराखड्यातून विंधन विहिरींच्या कामांना छेद

रत्नागिरी : दरवर्षी टंचाई कृती आराखड्यामध्ये घेण्यात येणाऱ्या विंधन विहिरींच्या कामांना यंदा छेद देण्यात आला आहे. यापुढे जिल्हा नियोजन समितीतून विंधन विहिरी खोदाईच्या कामांसाठी अनुदान देण्यात येणार आहे. त्यामुळे दरवर्षी विंधन विहिरींच्या मंजुरीबाबत होणारी ओरड कमी होणार आहे. जिल्ह्याच्या संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्याला जिल्हा प्रशासनाकडून मंजुरी देण्यास उशीर होत असल्याने ग्रामीण, डोंगरदऱ्यामध्ये वसलेल्या वाड्या, वस्त्यांसाठी ते त्रासदायक ठरत होते. त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी लवकरच टंचाई कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे जिल्ह्याच्या १९० गावांतील ४७६ वाड्यांना टँकरने पुरवठा करण्याचा संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार करण्यात आला होता. टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी १ कोटी ७६ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. टंचाईग्रस्तांसाठी पावणेतीन कोटी रुपये खर्च करर्णयात येणार आहे.या आराखड्यामध्ये २९ गावांतील ३९ वाड्यांतील नादुरुस्त ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या नळपाणी योजना दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यासाठी १ कोटी १२ लाख रुपये एवढ्या खर्चाची तरतूद करण्यात आली. असा एकूण २ कोटी ७६ लाख रुपयांचा टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. सर्वच ठिकाणी विहीर खोदाई करणे परवडणारे नाही. त्यासाठी विंधन विहिरी खोदाई हा पर्याय शोधून काढण्यात आला आहे. विहिरींच्या खोदाईसाठी मनुष्यबळ तसेच खोदाईचा खर्चही जास्त होतो. त्यासाठी विंधन विहिरी खोदाई करण्यात येत आहे. विहिरींपेक्षा या विंधन विहिरींवर खर्च कमी येत असल्याने अगदी कमी जागेतही त्यांची खोदाई करता येते. त्यामुळे आता जिल्ह्यात विहिरींऐवजी विंधन विहिरी खोदाई करण्यात येत आहेत. गतवर्षीपर्यंत या विंधन विहिरी टंचाई कृती आराखड्यातून घेण्यात येत होत्या. मात्र, यंदा त्या या आराखड्यातून घेण्यात आलेल्या नाहीत. त्या यापुढे जिल्हा नियोजन मंडळातून करण्यात येणार आहेत. त्यामुळे विंधन विहिरींच्या मंजुरीसाठी टंचाई कृती आराखड्याची वाट पाहावी लागणार नाही. गेल्यावर्षी टंचाई कृती आराखड्यात विंधन विहीरींचा समावेश करण्यात आला होता.हा आराखडा उशिरा सादर करण्यात आल्याने त्याला मंजुरी उशिराने मिळाली. त्यामुळे कामे रखडली होती. मात्र नवीन निर्णयामुळे टंचाई कृती आराखड्याची वाट बघावी लागणार नाही. (शहर वार्ताहर)गेल्या वर्षी मंजुरीच नव्हती...गेल्या वर्षी टंचाईग्रस्त वाड्यांमध्ये १६३ विंधन विहिरींच्या खोदाईचा आराखडा तयार करण्यात आला होता. त्या विंधन विहिरींची खोदाई करण्यापूर्वी त्यांचे संरक्षण करण्यात आले. यामध्ये १२६ विंधन विहिरी खोदाई करण्यास योग्य, तर विविध कारणांनी ३७ विंधन विहिरी खोदाई करण्यास अयोग्य असल्याचे स्पष्ट झाले होते. जिल्हा प्रशासनाला ६२ गावांतील ६९ वाड्यांमधील ६९ विंधन विहिरींचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. जिल्ह्यात टंचाई असतानाही त्यांना मंजुरी मिळाली नव्हती.