शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

विंधन विहिरी ‘नियोजन’मधून

By admin | Updated: February 2, 2015 00:05 IST

जिल्हा परिषद : टंचाईकृती आराखड्यातून विंधन विहिरींच्या कामांना छेद

रत्नागिरी : दरवर्षी टंचाई कृती आराखड्यामध्ये घेण्यात येणाऱ्या विंधन विहिरींच्या कामांना यंदा छेद देण्यात आला आहे. यापुढे जिल्हा नियोजन समितीतून विंधन विहिरी खोदाईच्या कामांसाठी अनुदान देण्यात येणार आहे. त्यामुळे दरवर्षी विंधन विहिरींच्या मंजुरीबाबत होणारी ओरड कमी होणार आहे. जिल्ह्याच्या संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्याला जिल्हा प्रशासनाकडून मंजुरी देण्यास उशीर होत असल्याने ग्रामीण, डोंगरदऱ्यामध्ये वसलेल्या वाड्या, वस्त्यांसाठी ते त्रासदायक ठरत होते. त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी लवकरच टंचाई कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे जिल्ह्याच्या १९० गावांतील ४७६ वाड्यांना टँकरने पुरवठा करण्याचा संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार करण्यात आला होता. टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी १ कोटी ७६ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. टंचाईग्रस्तांसाठी पावणेतीन कोटी रुपये खर्च करर्णयात येणार आहे.या आराखड्यामध्ये २९ गावांतील ३९ वाड्यांतील नादुरुस्त ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या नळपाणी योजना दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यासाठी १ कोटी १२ लाख रुपये एवढ्या खर्चाची तरतूद करण्यात आली. असा एकूण २ कोटी ७६ लाख रुपयांचा टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. सर्वच ठिकाणी विहीर खोदाई करणे परवडणारे नाही. त्यासाठी विंधन विहिरी खोदाई हा पर्याय शोधून काढण्यात आला आहे. विहिरींच्या खोदाईसाठी मनुष्यबळ तसेच खोदाईचा खर्चही जास्त होतो. त्यासाठी विंधन विहिरी खोदाई करण्यात येत आहे. विहिरींपेक्षा या विंधन विहिरींवर खर्च कमी येत असल्याने अगदी कमी जागेतही त्यांची खोदाई करता येते. त्यामुळे आता जिल्ह्यात विहिरींऐवजी विंधन विहिरी खोदाई करण्यात येत आहेत. गतवर्षीपर्यंत या विंधन विहिरी टंचाई कृती आराखड्यातून घेण्यात येत होत्या. मात्र, यंदा त्या या आराखड्यातून घेण्यात आलेल्या नाहीत. त्या यापुढे जिल्हा नियोजन मंडळातून करण्यात येणार आहेत. त्यामुळे विंधन विहिरींच्या मंजुरीसाठी टंचाई कृती आराखड्याची वाट पाहावी लागणार नाही. गेल्यावर्षी टंचाई कृती आराखड्यात विंधन विहीरींचा समावेश करण्यात आला होता.हा आराखडा उशिरा सादर करण्यात आल्याने त्याला मंजुरी उशिराने मिळाली. त्यामुळे कामे रखडली होती. मात्र नवीन निर्णयामुळे टंचाई कृती आराखड्याची वाट बघावी लागणार नाही. (शहर वार्ताहर)गेल्या वर्षी मंजुरीच नव्हती...गेल्या वर्षी टंचाईग्रस्त वाड्यांमध्ये १६३ विंधन विहिरींच्या खोदाईचा आराखडा तयार करण्यात आला होता. त्या विंधन विहिरींची खोदाई करण्यापूर्वी त्यांचे संरक्षण करण्यात आले. यामध्ये १२६ विंधन विहिरी खोदाई करण्यास योग्य, तर विविध कारणांनी ३७ विंधन विहिरी खोदाई करण्यास अयोग्य असल्याचे स्पष्ट झाले होते. जिल्हा प्रशासनाला ६२ गावांतील ६९ वाड्यांमधील ६९ विंधन विहिरींचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. जिल्ह्यात टंचाई असतानाही त्यांना मंजुरी मिळाली नव्हती.