शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत रात्र वैऱ्याची! आधीच यमुनेच्या पुराचे पाणी, त्यात भूकंप, अफगाणिस्तानात केंद्र
2
इथे खरा पेच...! दुकानदार २२ सप्टेंबरपासून आधीचा माल कसा विकणार? GST कमी करून की...
3
स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय, काँग्रेसच्या काळात...; जीएसटी बदलावर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया
4
अजित पवारांना नडलेल्या IPS अधिकारी अंजना कृष्णा कोण आहेत?
5
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
6
नेपाळमध्ये फेसबुक, एक्ससह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी, युट्यूब अन् व्हॉट्सअ‍ॅपवरही बंदी
7
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
8
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
9
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
10
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
11
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
12
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
13
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
14
Happy Teachers Day 2025: शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
15
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
16
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
17
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
18
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
20
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना

विहिरींतील गाळ उपसा रखडलेलाच

By admin | Updated: November 21, 2014 00:32 IST

विपरित परिणाम : खेडमध्ये ९७ विहिरी

खेड : जिल्ह्यातील विहिरींतील गाळ उपसा गेली अनेक वर्षे रखडला आहे. यामुळे विहिरीतील पाण्याचे झरे बंद झाले आहेत. याचा परिणाम थेट पाणीपुरवठ्यावर होत आहे़ खेड तालुक्यात यापेक्षा वेगळी अवस्था नाही. खेड तालुक्यातील जवळपास ९७ विहिरीतील गाळ उपसा करणे आवश्यक आहे. याकरिता आता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून हे काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम मार्च महिन्यापर्यंत पूर्ण करण्यात येणार असून, शेकडो मजुरांना काम मिळणार आहे. गाळ उपसा झाल्याने या विहिरीत पाणी साठण्याचे प्रमाण वाढणार आहे़ यामुळे उन्हाळ्यातील पाणीटंचाई काही प्रमाणात कमी होणार आहे़ जिल्ह्यातील सुमारे १०४२ विहिरी गाळाने भरल्या आहेत़ यामध्ये खेड तालुक्यातील ९७ विहिरींचा सामावेश आहे. गाळ उपसा करण्याच्या कामाकरिता जिल्ह्यातील हजारो मजुरांना काम मिळणार आहे. तर खेड तालुक्यात शेकडो मजुरांना काम मिळणार आहे़ हे काम अंगमेहनतीचे आहे़ मात्र, अनेक कुटुंबांना वर्षातील १०० दिवस रोजगार मिळणार आहे. तालुक्यातील जमीन जांभ्या दगडाची असल्याने पावसाचे प्रमाण जास्त असूनही उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत पाणीटंचाईच्या काळात सिंचन विहिरींचा फायदा तालुक्यातील ग्रामीण भागातील लोकांना होतो़ मात्र, सर्वच विहिरींतील गाळ गेली अनेक वर्षे काढला नसल्याने विहिरीत पाण्याचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे़ डिसेंबर महिन्यापर्यंत जेमतेम पाणी या विहिरीत असते. त्यानंतर सर्व विहिरी कोरड्या पडतात. गाळ न काढल्याने अनेक विहिरीतील पाण्याचे जुने झरे बंद झाले आहेत. कालांतराने या विहिरीच गाळाने भरून त्या बुजल्या जाण्याची भीती व्यक्त होत आहे़ त्यामुळे पाणीटंचाईच्या काळात याचा या विहिरींचा काहीच उपयोग होत नाही. गाळ उपसा केल्याने पाणीटंचाईवर मात करणे शक्य होणार आहे. त्यासाठी अशा विहिरींमधून गाळ काढला जावा, अशी मागणी केली जात आहे. (प्रतिनिधी)कायमस्वरूपी उपाय आवश्यक