शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

विहिरींतील गाळ उपसा रखडलेलाच

By admin | Updated: November 21, 2014 00:32 IST

विपरित परिणाम : खेडमध्ये ९७ विहिरी

खेड : जिल्ह्यातील विहिरींतील गाळ उपसा गेली अनेक वर्षे रखडला आहे. यामुळे विहिरीतील पाण्याचे झरे बंद झाले आहेत. याचा परिणाम थेट पाणीपुरवठ्यावर होत आहे़ खेड तालुक्यात यापेक्षा वेगळी अवस्था नाही. खेड तालुक्यातील जवळपास ९७ विहिरीतील गाळ उपसा करणे आवश्यक आहे. याकरिता आता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून हे काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम मार्च महिन्यापर्यंत पूर्ण करण्यात येणार असून, शेकडो मजुरांना काम मिळणार आहे. गाळ उपसा झाल्याने या विहिरीत पाणी साठण्याचे प्रमाण वाढणार आहे़ यामुळे उन्हाळ्यातील पाणीटंचाई काही प्रमाणात कमी होणार आहे़ जिल्ह्यातील सुमारे १०४२ विहिरी गाळाने भरल्या आहेत़ यामध्ये खेड तालुक्यातील ९७ विहिरींचा सामावेश आहे. गाळ उपसा करण्याच्या कामाकरिता जिल्ह्यातील हजारो मजुरांना काम मिळणार आहे. तर खेड तालुक्यात शेकडो मजुरांना काम मिळणार आहे़ हे काम अंगमेहनतीचे आहे़ मात्र, अनेक कुटुंबांना वर्षातील १०० दिवस रोजगार मिळणार आहे. तालुक्यातील जमीन जांभ्या दगडाची असल्याने पावसाचे प्रमाण जास्त असूनही उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत पाणीटंचाईच्या काळात सिंचन विहिरींचा फायदा तालुक्यातील ग्रामीण भागातील लोकांना होतो़ मात्र, सर्वच विहिरींतील गाळ गेली अनेक वर्षे काढला नसल्याने विहिरीत पाण्याचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे़ डिसेंबर महिन्यापर्यंत जेमतेम पाणी या विहिरीत असते. त्यानंतर सर्व विहिरी कोरड्या पडतात. गाळ न काढल्याने अनेक विहिरीतील पाण्याचे जुने झरे बंद झाले आहेत. कालांतराने या विहिरीच गाळाने भरून त्या बुजल्या जाण्याची भीती व्यक्त होत आहे़ त्यामुळे पाणीटंचाईच्या काळात याचा या विहिरींचा काहीच उपयोग होत नाही. गाळ उपसा केल्याने पाणीटंचाईवर मात करणे शक्य होणार आहे. त्यासाठी अशा विहिरींमधून गाळ काढला जावा, अशी मागणी केली जात आहे. (प्रतिनिधी)कायमस्वरूपी उपाय आवश्यक