शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

विहिरींतील गाळ उपसा रखडलेलाच

By admin | Updated: November 21, 2014 00:32 IST

विपरित परिणाम : खेडमध्ये ९७ विहिरी

खेड : जिल्ह्यातील विहिरींतील गाळ उपसा गेली अनेक वर्षे रखडला आहे. यामुळे विहिरीतील पाण्याचे झरे बंद झाले आहेत. याचा परिणाम थेट पाणीपुरवठ्यावर होत आहे़ खेड तालुक्यात यापेक्षा वेगळी अवस्था नाही. खेड तालुक्यातील जवळपास ९७ विहिरीतील गाळ उपसा करणे आवश्यक आहे. याकरिता आता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून हे काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम मार्च महिन्यापर्यंत पूर्ण करण्यात येणार असून, शेकडो मजुरांना काम मिळणार आहे. गाळ उपसा झाल्याने या विहिरीत पाणी साठण्याचे प्रमाण वाढणार आहे़ यामुळे उन्हाळ्यातील पाणीटंचाई काही प्रमाणात कमी होणार आहे़ जिल्ह्यातील सुमारे १०४२ विहिरी गाळाने भरल्या आहेत़ यामध्ये खेड तालुक्यातील ९७ विहिरींचा सामावेश आहे. गाळ उपसा करण्याच्या कामाकरिता जिल्ह्यातील हजारो मजुरांना काम मिळणार आहे. तर खेड तालुक्यात शेकडो मजुरांना काम मिळणार आहे़ हे काम अंगमेहनतीचे आहे़ मात्र, अनेक कुटुंबांना वर्षातील १०० दिवस रोजगार मिळणार आहे. तालुक्यातील जमीन जांभ्या दगडाची असल्याने पावसाचे प्रमाण जास्त असूनही उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत पाणीटंचाईच्या काळात सिंचन विहिरींचा फायदा तालुक्यातील ग्रामीण भागातील लोकांना होतो़ मात्र, सर्वच विहिरींतील गाळ गेली अनेक वर्षे काढला नसल्याने विहिरीत पाण्याचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे़ डिसेंबर महिन्यापर्यंत जेमतेम पाणी या विहिरीत असते. त्यानंतर सर्व विहिरी कोरड्या पडतात. गाळ न काढल्याने अनेक विहिरीतील पाण्याचे जुने झरे बंद झाले आहेत. कालांतराने या विहिरीच गाळाने भरून त्या बुजल्या जाण्याची भीती व्यक्त होत आहे़ त्यामुळे पाणीटंचाईच्या काळात याचा या विहिरींचा काहीच उपयोग होत नाही. गाळ उपसा केल्याने पाणीटंचाईवर मात करणे शक्य होणार आहे. त्यासाठी अशा विहिरींमधून गाळ काढला जावा, अशी मागणी केली जात आहे. (प्रतिनिधी)कायमस्वरूपी उपाय आवश्यक