शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

पंचायत राज समितीचे रिकाम्या हंड्यांनी स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 00:14 IST

चिपळूण : येथील पंचायत समितीच्या आवारात ओवळी, कळकवणे व वालोटी येथील प्रादेशिक नळपाणी योजना बंद असल्याच्या कारणावरून ग्रामस्थांनी शुक्रवारी उपोषण केले. पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर पंचायत राज समितीचे आगमन होताच उपोषणाला बसलेल्या ग्रामस्थांनी रिकामे हंडे, प्लास्टिकच्या कॅनने समितीचे स्वागत केले.महावितरणच्या आडमुठेपणामुळे व बिलातील फरकामुळे ओवळी, कळकवणे व वालोटी येथील प्रादेशिक नळपाणी ...

चिपळूण : येथील पंचायत समितीच्या आवारात ओवळी, कळकवणे व वालोटी येथील प्रादेशिक नळपाणी योजना बंद असल्याच्या कारणावरून ग्रामस्थांनी शुक्रवारी उपोषण केले. पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर पंचायत राज समितीचे आगमन होताच उपोषणाला बसलेल्या ग्रामस्थांनी रिकामे हंडे, प्लास्टिकच्या कॅनने समितीचे स्वागत केले.महावितरणच्या आडमुठेपणामुळे व बिलातील फरकामुळे ओवळी, कळकवणे व वालोटी येथील प्रादेशिक नळपाणी योजना गेले तीन महिने बंद आहे. येथील ग्रामस्थ दर महिन्याला आपली नियोजित पाणीपट्टी भरतात. परंतु, फरकाची रक्कम तशीच राहिली आहे. याबाबत महावितरणने ग्रामस्थांना वेठीस धरले असून, सध्या पाणी बंद आहे. म्हणून शुक्रवारपासून कळकवणेचे सरपंच कविता आंबेडे, उपसरपंच सतीश सुर्वे, वालोटीचे सरपंच संदीप गोटल, ओवळीचे दिनेश शिंदे व स्थानिक ग्रामस्थांनी शुक्रवारी उपोषण सुरू केले.पंचायत समितीच्या सभापती पूजा निकम, माजी सभापती शौकत मुकादम, जिल्हा परिषद माजी विरोधी पक्षनेते अशोकराव कदम, सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष शेखर निकम, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष चित्रा चव्हाण, दशरथ दाभोळकर, जिल्हा परिषद सदस्य दिशा दाभोळकर, पंचायत समिती सदस्य नितीन ठसाळे, बाबू साळवी, पांडुरंग माळी, अ‍ॅड. अमित कदम, आदींनी त्यांची भेट दिली.पंचायत राज समितीचे आमदार बाळाराम पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपोषणाला बसलेल्या ग्रामस्थांशी चर्चा केली. त्यांचा प्रश्न जाणून घेतला व आज, शनिवारी जिल्हा परिषद येथे सांगता समारंभाच्यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन केले. यावेळी टेरव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच किशोर कदम व त्यांच्या सहकाºयांनी तिवरे, आकले, रिक्टोली, कादवड, गाणे, वालोटी, खडपोली, ओवळी, करंबवणे, नांदिवसे, स्वयंदेव, तळसर, पिंपळी बुद्रुक, मुंढे, चिपळूण सती, कान्हे, अडरे, अनारी, टेरव, चिंचघरी या गावांना ग्रॅव्हिटीने पाणी योजना करण्याची शिफारस करावी, अशी मागणी केली. रिक्टोली नळपाणी योजना मंजूर असून, त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. तरी कार्यवाही व्हावी, अशी मागणी रिक्टोली ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आली. नायशी राष्ट्रीय पेयजल योजनेतील ३६ लाख रुपये खर्चाबाबत योग्य ती कार्यवाही व्हावी, याबाबत सरपंच किशोर घाग यांनी मागणी केली. पंचायत समिती सदस्य अनुजा चव्हाण, माजी सदस्य व राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्ष जागृती शिंदे यांनीही आपल्या मागण्यांबाबत निवेदन दिले आहे.