शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

पंचायत राज समितीचे रिकाम्या हंड्यांनी स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 00:14 IST

चिपळूण : येथील पंचायत समितीच्या आवारात ओवळी, कळकवणे व वालोटी येथील प्रादेशिक नळपाणी योजना बंद असल्याच्या कारणावरून ग्रामस्थांनी शुक्रवारी उपोषण केले. पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर पंचायत राज समितीचे आगमन होताच उपोषणाला बसलेल्या ग्रामस्थांनी रिकामे हंडे, प्लास्टिकच्या कॅनने समितीचे स्वागत केले.महावितरणच्या आडमुठेपणामुळे व बिलातील फरकामुळे ओवळी, कळकवणे व वालोटी येथील प्रादेशिक नळपाणी ...

चिपळूण : येथील पंचायत समितीच्या आवारात ओवळी, कळकवणे व वालोटी येथील प्रादेशिक नळपाणी योजना बंद असल्याच्या कारणावरून ग्रामस्थांनी शुक्रवारी उपोषण केले. पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर पंचायत राज समितीचे आगमन होताच उपोषणाला बसलेल्या ग्रामस्थांनी रिकामे हंडे, प्लास्टिकच्या कॅनने समितीचे स्वागत केले.महावितरणच्या आडमुठेपणामुळे व बिलातील फरकामुळे ओवळी, कळकवणे व वालोटी येथील प्रादेशिक नळपाणी योजना गेले तीन महिने बंद आहे. येथील ग्रामस्थ दर महिन्याला आपली नियोजित पाणीपट्टी भरतात. परंतु, फरकाची रक्कम तशीच राहिली आहे. याबाबत महावितरणने ग्रामस्थांना वेठीस धरले असून, सध्या पाणी बंद आहे. म्हणून शुक्रवारपासून कळकवणेचे सरपंच कविता आंबेडे, उपसरपंच सतीश सुर्वे, वालोटीचे सरपंच संदीप गोटल, ओवळीचे दिनेश शिंदे व स्थानिक ग्रामस्थांनी शुक्रवारी उपोषण सुरू केले.पंचायत समितीच्या सभापती पूजा निकम, माजी सभापती शौकत मुकादम, जिल्हा परिषद माजी विरोधी पक्षनेते अशोकराव कदम, सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष शेखर निकम, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष चित्रा चव्हाण, दशरथ दाभोळकर, जिल्हा परिषद सदस्य दिशा दाभोळकर, पंचायत समिती सदस्य नितीन ठसाळे, बाबू साळवी, पांडुरंग माळी, अ‍ॅड. अमित कदम, आदींनी त्यांची भेट दिली.पंचायत राज समितीचे आमदार बाळाराम पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपोषणाला बसलेल्या ग्रामस्थांशी चर्चा केली. त्यांचा प्रश्न जाणून घेतला व आज, शनिवारी जिल्हा परिषद येथे सांगता समारंभाच्यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन केले. यावेळी टेरव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच किशोर कदम व त्यांच्या सहकाºयांनी तिवरे, आकले, रिक्टोली, कादवड, गाणे, वालोटी, खडपोली, ओवळी, करंबवणे, नांदिवसे, स्वयंदेव, तळसर, पिंपळी बुद्रुक, मुंढे, चिपळूण सती, कान्हे, अडरे, अनारी, टेरव, चिंचघरी या गावांना ग्रॅव्हिटीने पाणी योजना करण्याची शिफारस करावी, अशी मागणी केली. रिक्टोली नळपाणी योजना मंजूर असून, त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. तरी कार्यवाही व्हावी, अशी मागणी रिक्टोली ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आली. नायशी राष्ट्रीय पेयजल योजनेतील ३६ लाख रुपये खर्चाबाबत योग्य ती कार्यवाही व्हावी, याबाबत सरपंच किशोर घाग यांनी मागणी केली. पंचायत समिती सदस्य अनुजा चव्हाण, माजी सदस्य व राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्ष जागृती शिंदे यांनीही आपल्या मागण्यांबाबत निवेदन दिले आहे.