शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

वीकेंड लाॅकडलाऊनमुळे दिवसभरात अवघ्या ६५ फेऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने शासनाने दोन दिवस वीकेंड लॉकडाऊन घोषित केले. शासनाच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने शासनाने दोन दिवस वीकेंड लॉकडाऊन घोषित केले. शासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले. प्रवाशांअभावी रत्नागिरी विभागाच्या वाहतुकीवर सलग दुसऱ्या दिवशी चांगलाच परिणाम झाला. रविवारी दिवसभरात अवघ्या ६५ फेऱ्या सोडण्यात आल्या.

लाॅकडाऊननंतर एसटीची गाडी हळूहळू रुळावर येऊ लागली असतानाच पुन्हा लाॅकडाऊनचा सामना करावा लागला आहे. मात्र, एस.टी.ला लाॅकडाऊनमधून वगळण्यात आले असले तरी प्रवासी नसल्यामुळे उत्पन्नावर परिणाम होत आहे.

रत्नागिरी विभागात ६०० गाड्यांद्वारे दैनंदिन ४२०० फेऱ्या सोडण्यात येतात. एक लाख ८० हजार किलोमीटर प्रवासातून एस.टी.ला ५० लाखांचे उत्पन्न प्राप्त होत आहे. जेमतेम डिझेल खर्च भागत असला तरी स्पेअर पार्टस् व अन्य खर्चासाठी महामंडळाकडून आर्थिक मदत घ्यावी लागत आहे. वीकेंडमुळे शनिवारी दिवसभरात अवघ्या १६० फेऱ्या संपूर्ण विभागातून सोडण्यात आल्या होत्या. १९ हजार ५०१ किलोमीटर इतकाच प्रवास झाला. एस.टी.ला पूर्ण क्षमतेने वाहतुकीला परवानगी दिली असली तरी प्रवासी स्वत:च घराबाहेर पडणे टाळू लागले असल्याने प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस घटू लागली आहे. रविवारी मात्र ६५ फेऱ्या दिवसभरात सोडण्यात आल्या. त्यामुळे १३ हजार ७०० किलोमीटर इतका प्रवास झाला आहे. दोन दिवसांत फेऱ्यांवर परिणाम झाल्याने एसटीच्या उत्पन्नात घट झाली आहे.