शहरं
Join us  
Trending Stories
1
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
2
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
3
तिच्यासोबतच लग्न करायचंय! तरुणाचं शोलेस्टाईल आंदोलन, पण प्रेयसीचं सत्य समजताच पायाखालची वाळू सरकली
4
'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारताची पहिल्यांदाच पाकिस्तानला मदत! दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांशी संपर्क साधला
5
Gold Silver Price 25 August: सोन्याच्या दरात बंपर तेजी, एका दिवसात चांदी २६२७ रुपयांनी महागली; पाहा काय आहेत नवे दर?
6
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
7
'तुमच्या यूट्यूब चॅनेल्सवर माफी मागा', दिव्यांगांची खिल्ली उडवल्याप्रकरणी SC चे समय रैनासह ५ जणांना आदेश
8
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
9
जाऊ डबलसीट रे लांब लांब... पण हे असं?; 'लव्ह बर्ड्स'चा आणखी एक Video तुफान व्हायरल
10
आता फक्त ३ मिनिटांत भरा ITR! 'या' कंपनीने लॉन्च देशातील पहिला AI प्लॅटफॉर्म; अंतिम मुदतही वाढली
11
Nikki Murder Case : "दोन्ही जावई मुलींच्या पार्लरमधून पैसे चोरायचे, काहीच काम करत नव्हते"; ढसाढसा रडले वडील
12
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
13
Ola Electric Share Price: ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
14
गणेश चतुर्थी २०२५: राहु काळ कधी? ‘या’ शुभ मुहूर्तावर स्थापन करा गणपती; पाहा, चंद्रास्त वेळ
15
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
16
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
17
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
18
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
19
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
20
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य

आंबा उत्पादक शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळवून देऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळात आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यांना अधिक भरपाई मिळण्यासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळात आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यांना अधिक भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करण्यासोबत सिंधुरत्न निधीतून त्यांना शाश्वत उत्पन्न मिळण्यासाठी प्रयत्न करु, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.

आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी बैठक झाली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीला अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे तसेच आंबा उत्पादक विवेक भिडे, प्रसन्न पेठे, प्रदीप सावंत आणि कृषी उपसंचालक अजय शेंडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

तौक्ते चक्रीवादळात ५० टक्केपेक्षा अधिक नुकसान झाले असून, याबाबत २०१५प्रमाणे नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी आंबा उत्पादक संघातर्फे करण्यात आली आहे. याबाबत पंचनामे झाले असले तरी प्रत्यक्षात पीक काढणीस आले असताना पाऊस आल्याने आंबा वाया गेला हे लक्षात घेऊन याबाबत सहानुभूतीने तपासणी करुन भरपाई देण्याचा आपण प्रयत्न करु, असे सामंत म्हणाले.

आंबा उत्पादकांना शाश्वत उत्पन्नासाठी नव्या कोल्ड स्टोअरेजची बांधणी व वातानुकूलित वाहतुकीसाठी यंत्रणा उभारण्याचा प्रस्ताव पणन विभागाने २६ ऑगस्टपूर्वी तयार करावा. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी होणाऱ्या चर्चेत मागणी करुन सिंधुरत्न योजनेतून यासाठी निधी दिला जाईल, असेही उदय सामंत यांनी सांगितले.

-------------------------

जैतापूर प्रकल्पाबाबत बैठक

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प कार्यालयात काम करणाऱ्या काही स्थानिकांना नोकरीवरुन काढण्यात आले आहे. याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. स्थानिकांना नोकरीवरुन काढण्यावरुन मंत्री उदय सामंत यांनी व्यवस्थापन प्रतिनिधींना जाब विचारला. तसेच लवकरात लवकर याबाबत निर्णय घ्यावा, असे निर्देशही दिले.