शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

पर्यटन विकास साधण्यासाठी एकत्रित काम करणे आवश्यक : डाॅ. बी. एन. पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:34 IST

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याचा पर्यटन क्षेत्रात अधिक विकास साधण्यासाठी शासन, प्रशासनासोबत लोकसहभाग यांनी एकत्रित येऊन एकमेकांमध्ये समन्वय साधून ...

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याचा पर्यटन क्षेत्रात अधिक विकास साधण्यासाठी शासन, प्रशासनासोबत लोकसहभाग यांनी एकत्रित येऊन एकमेकांमध्ये समन्वय साधून काम करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह येथे सोमवारी आयोजित जिल्हा पर्यटन आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, उपजिल्हाधिकारी अमिता तळेकर, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळ्ये तसेच संबधित अधिकारी तसेच पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती, संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातूनही जिल्हयातील पर्यटन क्षेत्राशी संबधित व्यक्ती, संस्थेचे प्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.

रत्नागिरी जिल्हा पर्यटन आराखडा संदर्भात प्राथमिक बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी यावेळी पर्यटन क्षेत्रात काम करणारे व्यक्ती तसेच संस्थेंच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. पर्यटन क्षेत्रात काम करीत असताना येत असलेल्या अडचणी जाणून घेतल्या.

जिल्हाधिकारी म्हणाले रत्नागिरी जिल्हा पर्यटन क्षेत्रात विकसीत करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वाव आहे. त्यामुळे जिल्हा पर्यटनदृष्ट्या विकसीत करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रीत येऊन काम करणे गरजेच आहे. प्रत्येकांनी पर्यटनाच्या दृष्टीने आपल्या भागातील क्षेत्राचा ॲक्शन प्लॅन तयार करुन आवश्यकता (रिक्वायरमेंट) सादर कराव्यात, जेणेकरुन पर्यटन आराखडा तयार करताना त्याचा सहभाग घेऊन तो कृतीत आणता येईल. पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्यांशी चर्चा करताना ते म्हणाले की परवानगीसंदर्भात येणाऱ्या अडचणी दूर करण्यात येतील आणि आपल्याला लवकरात लवकर पर्यटनांशी संलग्न परवानग्या देण्याचा प्रयत्न केला जाईल. शासनाकडून आपल्याला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटन अधिक विकसीत करण्याच्या दृष्टीने आवश्यक ती मदत केली जाईल, असे आश्वासन यावेळी दिले.

जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळ्ये यांनी पर्यटनासाठी असलेल्या विविध योजनांची माहिती यावेळी दिली.

............

फोटो मजकूर

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी डाॅ. बी. एन. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली साेमवारी जिल्हा पर्यटन आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, उपजिल्हाधिकारी अमिता तळेकर, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळ्ये तसेच संबधित अधिकारी तसेच पर्यटनक्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती उपस्थित होत्या.