शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

नादुरुस्त पंपामुळे पालीमध्ये पाणीबाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 03:01 IST

पालीकरांना गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

- विनोद भोईर राबगाव/पाली : पालीकरांना गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. वारंवार बंद पडणाऱ्या पंपांमुळे पालीत पाणीटंचाईचे सावट आले आहे. लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून ग्रामपंचायतीमार्फत काही ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असला तरी तो पुरेसा नाही.पाली शहराला पाणीपुरवठा करणारे अंबा नदीवरील दोन पंप बिघडले आहेत. त्यामुळे टंचाईसदृश स्थिती निर्माण झाली आहे. पाणी येत नसल्याने नागरिकांचे पुरते हाल झाले आहेत. ज्यांच्याकडे किंवा जवळपास एखादी बोअरवेल किंवा विहिरी आहे त्यांना तेथून पाणी भरावे लागते. मात्र या दोन्हींची सोय जिथे नाही तेथील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करण्याची अथवा पाणी विकत घ्यावे लागत आहे.अष्टविनायकांपैकी एक, बल्लाळेश्वराचे स्थान असलेल्या पालीत मागील अनेक वर्षांपासून वारंवार कृत्रिम पाणीटंचाईची समस्या उद्भवत आहे. येथील अंबा नदीतून पालीकरांना पाणीपुरवठा होतो. उन्हाळ्यात सुद्धा नदीत मुबलक व पुरेसे पाणी असते. येथून चार पंपांद्वारे ते सरसगडाच्या पायथ्याशी असलेल्या चार साठवण टाक्यांमध्ये सोडले जाते. त्यानंतर सर्व पालीत पाणीपुरवठा केला जातो. मात्र या दरम्यानचे मोठे अंतर, वाहिन्यांचा छोटा आकार, वारंवार फुटणाºया वाहिन्या, जुन्या व जीर्ण जलवाहिन्यांमुळे पाणीपुरवठ्यात अडचणी येत आहेत.याशिवाय साठवण टाक्यांची दुरवस्था, सतत बिघडणारे व अपुºया क्षमतेचे पंप, जॅकवेलमध्ये गाळ साठणे, जुने वॉल फुटणे, मुख्य जल वाहिनीला जोडलेल्या इतर वाहीन्या, वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा व अपुरे कर्मचारी अशा असंख्य कारणांमुळे पालीत नेहमी पाणी टंचाईभेडसावते.>नळ पाणी योजना २० वर्षांपासून प्रलंबितपालीत शुद्ध नळ पाणीपुरवठा योजना १५ ते २० वर्षांपासून प्रलंबित आहे. योजनेसाठी कोट्यवधी रु पयांचा निधी मंजूर होऊन देखील आजतागायत योजना कार्यान्वित झालेली नाही. सर्वच राजकीय पक्षांकडून या योजनेचे निवडणुकीपुरते भांडवल करण्यात आले आहे, मात्र प्रत्यक्षात योजना कार्यान्वित झालेली नाही.शासनाने केलेल्या २००८-०९ च्या सर्व्हेनुसार पालीची लोकसंख्या व पालीत दररोज येणाºया भाविक व पर्यटकांच्या संख्येनुसार, शुद्ध नळपाणी पुरवठा योजनेचे नियोजन केले होते. एकूण ७ कोटी ७९ लाखांचा निधी व १० टक्के लोकवर्गणीद्वारा नळयोजना उभी राहणार होती. परंतु राजकीय श्रेयवादामध्ये ही योजना रखडली. त्याबरोबर १० टक्के लोकवर्गणीचा प्रश्न देखील होता.>अंबा नदीवर असलेल्या पाणीपुरवठा करणाºया मशिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. मात्र लोकांची कुठल्याही प्रकारे गैरसोय होऊ नये याची पुरेपूर दक्षता घेत आहोत. ग्रामपंचायतीमार्फत पालीकरांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. लवकरच पाणीपुरवठा करणाºया मोटारची दुरुस्ती होऊन पाणीपुरवठा सुरळीत व पूर्ववत होणार आहे.- गणेश बालके, सरपंच,ग्रामपंचायत, पाली>गेल्या काही दिवसांपासून पाणी येत नाही. अपुºया पाण्यामुळे मोठी गैरसोय होते. ग्रामपंचायतीने टँकरने पाणीपुरवठा होतोय, मात्र तो पुरेसा नाही.- छाया म्हात्रे, रहिवासी, पाली>आम्हाला काम करण्यासाठी फार कमी वेळ मिळाला आहे. विविध कामांसाठी फंड मिळण्यासाठी प्रयत्न करत आहोत. सर्व सदस्य सरपंच व उपसरपंच व सदस्य मिळून पडेल ते काम करु न पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. त्यासाठी पदरचे पैसे देखील खर्च करत आहोत. लोकांच्या विश्वासाला तडा जावू देणार नाही. यावर कोणीही राजकारण करु नये.- अमित निंबाळकर, सदस्य, ग्रामपंचायत, पाली