शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

नादुरुस्त पंपामुळे पालीमध्ये पाणीबाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 03:01 IST

पालीकरांना गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

- विनोद भोईर राबगाव/पाली : पालीकरांना गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. वारंवार बंद पडणाऱ्या पंपांमुळे पालीत पाणीटंचाईचे सावट आले आहे. लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून ग्रामपंचायतीमार्फत काही ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असला तरी तो पुरेसा नाही.पाली शहराला पाणीपुरवठा करणारे अंबा नदीवरील दोन पंप बिघडले आहेत. त्यामुळे टंचाईसदृश स्थिती निर्माण झाली आहे. पाणी येत नसल्याने नागरिकांचे पुरते हाल झाले आहेत. ज्यांच्याकडे किंवा जवळपास एखादी बोअरवेल किंवा विहिरी आहे त्यांना तेथून पाणी भरावे लागते. मात्र या दोन्हींची सोय जिथे नाही तेथील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करण्याची अथवा पाणी विकत घ्यावे लागत आहे.अष्टविनायकांपैकी एक, बल्लाळेश्वराचे स्थान असलेल्या पालीत मागील अनेक वर्षांपासून वारंवार कृत्रिम पाणीटंचाईची समस्या उद्भवत आहे. येथील अंबा नदीतून पालीकरांना पाणीपुरवठा होतो. उन्हाळ्यात सुद्धा नदीत मुबलक व पुरेसे पाणी असते. येथून चार पंपांद्वारे ते सरसगडाच्या पायथ्याशी असलेल्या चार साठवण टाक्यांमध्ये सोडले जाते. त्यानंतर सर्व पालीत पाणीपुरवठा केला जातो. मात्र या दरम्यानचे मोठे अंतर, वाहिन्यांचा छोटा आकार, वारंवार फुटणाºया वाहिन्या, जुन्या व जीर्ण जलवाहिन्यांमुळे पाणीपुरवठ्यात अडचणी येत आहेत.याशिवाय साठवण टाक्यांची दुरवस्था, सतत बिघडणारे व अपुºया क्षमतेचे पंप, जॅकवेलमध्ये गाळ साठणे, जुने वॉल फुटणे, मुख्य जल वाहिनीला जोडलेल्या इतर वाहीन्या, वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा व अपुरे कर्मचारी अशा असंख्य कारणांमुळे पालीत नेहमी पाणी टंचाईभेडसावते.>नळ पाणी योजना २० वर्षांपासून प्रलंबितपालीत शुद्ध नळ पाणीपुरवठा योजना १५ ते २० वर्षांपासून प्रलंबित आहे. योजनेसाठी कोट्यवधी रु पयांचा निधी मंजूर होऊन देखील आजतागायत योजना कार्यान्वित झालेली नाही. सर्वच राजकीय पक्षांकडून या योजनेचे निवडणुकीपुरते भांडवल करण्यात आले आहे, मात्र प्रत्यक्षात योजना कार्यान्वित झालेली नाही.शासनाने केलेल्या २००८-०९ च्या सर्व्हेनुसार पालीची लोकसंख्या व पालीत दररोज येणाºया भाविक व पर्यटकांच्या संख्येनुसार, शुद्ध नळपाणी पुरवठा योजनेचे नियोजन केले होते. एकूण ७ कोटी ७९ लाखांचा निधी व १० टक्के लोकवर्गणीद्वारा नळयोजना उभी राहणार होती. परंतु राजकीय श्रेयवादामध्ये ही योजना रखडली. त्याबरोबर १० टक्के लोकवर्गणीचा प्रश्न देखील होता.>अंबा नदीवर असलेल्या पाणीपुरवठा करणाºया मशिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. मात्र लोकांची कुठल्याही प्रकारे गैरसोय होऊ नये याची पुरेपूर दक्षता घेत आहोत. ग्रामपंचायतीमार्फत पालीकरांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. लवकरच पाणीपुरवठा करणाºया मोटारची दुरुस्ती होऊन पाणीपुरवठा सुरळीत व पूर्ववत होणार आहे.- गणेश बालके, सरपंच,ग्रामपंचायत, पाली>गेल्या काही दिवसांपासून पाणी येत नाही. अपुºया पाण्यामुळे मोठी गैरसोय होते. ग्रामपंचायतीने टँकरने पाणीपुरवठा होतोय, मात्र तो पुरेसा नाही.- छाया म्हात्रे, रहिवासी, पाली>आम्हाला काम करण्यासाठी फार कमी वेळ मिळाला आहे. विविध कामांसाठी फंड मिळण्यासाठी प्रयत्न करत आहोत. सर्व सदस्य सरपंच व उपसरपंच व सदस्य मिळून पडेल ते काम करु न पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. त्यासाठी पदरचे पैसे देखील खर्च करत आहोत. लोकांच्या विश्वासाला तडा जावू देणार नाही. यावर कोणीही राजकारण करु नये.- अमित निंबाळकर, सदस्य, ग्रामपंचायत, पाली