शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

चिपळुणातील ९ गावांना एका टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:32 IST

चिपळूण : कडक उन्हाळ्यामुळे पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटल्याने चिपळूण तालुक्यातील ९ गावांमधील १६ वाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ...

चिपळूण : कडक उन्हाळ्यामुळे पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटल्याने चिपळूण तालुक्यातील ९ गावांमधील १६ वाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या गावांच्या मागणीनुसार स्थानिक प्रशासनामार्फत खासगी टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. मात्र, शासकीय टँकरच उपलब्ध नसल्याने या टंचाईग्रस्त गावांना अवघ्या एका टँकरव्दारे पाणी पुरवले जात असल्याने ग्रामस्थांची मोठी गैरसोय होऊ लागली आहे. आणखी एक टँकर अधिग्रहित करण्याची मागणी तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.

तालुक्यातील ग्रामीण भागात दरवर्षी मार्च महिन्यापासून पाणीटंचाईची समस्या भेडसावते. पाण्यासाठी असंख्य कुटुंबांना वणवण करावी लागते. यामध्ये महिलांचे प्रचंड हाल होतात. सध्या कडक उन्हाळा सुरू असून, अनेक गावांमधील नैसर्गिक पाण्याचे स्रोत आटू लागले आहेत. त्यामुळे अशा गावांनी टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्याची मागणी चिपळूण पंचायत समिती प्रशासनाकडे केली होती. अडरे, कामथे खुर्द, कोसबी, नारदखेरकी, रिक्टोली, आकले, ओवळी, गाणे व कादवड आदी ९ गावांमधील १६ वाड्यांचा यात समावेश आहे.

यामध्ये ६ धनगरवाड्या आहेत. शासकीय टँकर उपलब्ध नसल्याने पाणीपुरवठा करण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. अखेर येथील महसूल प्रशासनाने एक खासगी टँकर अधिग्रहित केला. सध्या या टँकरव्दारे या गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, एकच टँकर या सर्व गावांमधील वाड्यांमध्ये धावत असल्याने या गावांना वेळेत पाणीपुरवठा होत नाही. याशिवाय केला जाणारा पाणी पुरवठाही अपुरा पडत आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांमधील ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन चिपळूण पंचायत समिती प्रशासनाने आणखी एक खासगी टँकर अधिग्रहित करण्याची मागणी तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे.