शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
2
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
3
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
4
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
5
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
6
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
7
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
8
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
9
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
10
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
11
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
12
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
13
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
14
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
15
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
16
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
17
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
18
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
19
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
20
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?

चिपळुणातील ९ गावांना एका टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:32 IST

चिपळूण : कडक उन्हाळ्यामुळे पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटल्याने चिपळूण तालुक्यातील ९ गावांमधील १६ वाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ...

चिपळूण : कडक उन्हाळ्यामुळे पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटल्याने चिपळूण तालुक्यातील ९ गावांमधील १६ वाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या गावांच्या मागणीनुसार स्थानिक प्रशासनामार्फत खासगी टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. मात्र, शासकीय टँकरच उपलब्ध नसल्याने या टंचाईग्रस्त गावांना अवघ्या एका टँकरव्दारे पाणी पुरवले जात असल्याने ग्रामस्थांची मोठी गैरसोय होऊ लागली आहे. आणखी एक टँकर अधिग्रहित करण्याची मागणी तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.

तालुक्यातील ग्रामीण भागात दरवर्षी मार्च महिन्यापासून पाणीटंचाईची समस्या भेडसावते. पाण्यासाठी असंख्य कुटुंबांना वणवण करावी लागते. यामध्ये महिलांचे प्रचंड हाल होतात. सध्या कडक उन्हाळा सुरू असून, अनेक गावांमधील नैसर्गिक पाण्याचे स्रोत आटू लागले आहेत. त्यामुळे अशा गावांनी टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्याची मागणी चिपळूण पंचायत समिती प्रशासनाकडे केली होती. अडरे, कामथे खुर्द, कोसबी, नारदखेरकी, रिक्टोली, आकले, ओवळी, गाणे व कादवड आदी ९ गावांमधील १६ वाड्यांचा यात समावेश आहे.

यामध्ये ६ धनगरवाड्या आहेत. शासकीय टँकर उपलब्ध नसल्याने पाणीपुरवठा करण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. अखेर येथील महसूल प्रशासनाने एक खासगी टँकर अधिग्रहित केला. सध्या या टँकरव्दारे या गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, एकच टँकर या सर्व गावांमधील वाड्यांमध्ये धावत असल्याने या गावांना वेळेत पाणीपुरवठा होत नाही. याशिवाय केला जाणारा पाणी पुरवठाही अपुरा पडत आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांमधील ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन चिपळूण पंचायत समिती प्रशासनाने आणखी एक खासगी टँकर अधिग्रहित करण्याची मागणी तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे.