शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

पाणीटंचाईचा अध्याय यंदाही

By admin | Updated: October 21, 2014 23:39 IST

राजापूर तालुका : अर्जुना नदी महिनाभरातच कोरडी

पाचल : परिसरातील कित्येक गावांसाठी तारणहार ठरलेली अर्जुना नदी गाळामुळे श्वास कोंडल्याने आॅक्टोबर महिन्याच्या सरतेशेवटीच कोरडीठण्ण पडू लागली आहे. सध्या या नदीच्या पात्रात किरकोळ पाणीसाठा उरला असून थोड्याच दिवसात तोही संपण्याची शक्यता आहे. त्यामुळे सभोवतालच्या गावांना यंदाही पाणीटंचाई जाणवणार आहे.राजापूर तालुक्यातील कित्येक गावांसाठी अर्जुना नदी ही तारणहार ठरली आहे. राजापूर तालुक्याच्या पूर्व विभागातील डोंगराळ भागात उगम पावलेल्या अर्जुना नदीचे पात्र जवळपास ९० टक्के गाळाने भरले आहे. या पात्रात पूर्वीइतका पाणीसाठा होण्यासाठी जागाच शिल्लक नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांचा तोकडा अभ्यास, वरिष्ठ प्रशासकीय कार्यालयाची उदासिनता आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष अशा विविध कारणांमध्ये अडकलेली ही नदी भविष्यात या गावांसाठी खरोखरच तारणहार ठरु शकते का? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.सामान्य जनतेच्या हितासाठी दळण-वळणाचे साधन म्हणून निर्माण झालेले कॉजवे गाळ साठण्याला सर्वात मोठे कारण ठरत आहे. अर्जुना नदीचा उगम तीव्र चढावावर असून पावसाळ्यात पाण्याची पातळी वाढते. त्यामुळे कित्येक पाणी वाहुन जाते. हे वाहुन जाणारे पाणी व बांधण्यात आलेल्या कॉजवेचे पाईप याचे समिकरण जुळत नसल्याने मोठ्या गतीने पळणाऱ्या पाण्याला कॉजवेमुळे अचानक लगाम लागतो व कॉजवेच्या वरील बाजूस मोठ्या प्रमाणात गाळ साठतो.टंचाईच्या काळात लाखो रुपये खर्च करुन या परिसरातील गावांना पाण्याचा पुरवठा केला जातो. हे पाणी पुरवले तरी महिलांना दूरच्या गावात जाऊन पाणी आणावे लागते. त्यासाठी सक्षम पर्याय म्हणून या नदीतील गाळ काढणे आवश्यक आहे. मात्र त्याबाबत प्रशासन उदासिन असल्यामुळे वर्षानुवर्षाचा गाळ या नदीच्या पात्रात साठत आहे. त्यामुळे श्वास कोंडलेल्या नदीचा या परिसरातील गावांना उपयोगच होईनासा झाला आहे. (वार्ताहर)