शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

पाणीटंचाईचा अध्याय यंदाही

By admin | Updated: October 21, 2014 23:39 IST

राजापूर तालुका : अर्जुना नदी महिनाभरातच कोरडी

पाचल : परिसरातील कित्येक गावांसाठी तारणहार ठरलेली अर्जुना नदी गाळामुळे श्वास कोंडल्याने आॅक्टोबर महिन्याच्या सरतेशेवटीच कोरडीठण्ण पडू लागली आहे. सध्या या नदीच्या पात्रात किरकोळ पाणीसाठा उरला असून थोड्याच दिवसात तोही संपण्याची शक्यता आहे. त्यामुळे सभोवतालच्या गावांना यंदाही पाणीटंचाई जाणवणार आहे.राजापूर तालुक्यातील कित्येक गावांसाठी अर्जुना नदी ही तारणहार ठरली आहे. राजापूर तालुक्याच्या पूर्व विभागातील डोंगराळ भागात उगम पावलेल्या अर्जुना नदीचे पात्र जवळपास ९० टक्के गाळाने भरले आहे. या पात्रात पूर्वीइतका पाणीसाठा होण्यासाठी जागाच शिल्लक नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांचा तोकडा अभ्यास, वरिष्ठ प्रशासकीय कार्यालयाची उदासिनता आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष अशा विविध कारणांमध्ये अडकलेली ही नदी भविष्यात या गावांसाठी खरोखरच तारणहार ठरु शकते का? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.सामान्य जनतेच्या हितासाठी दळण-वळणाचे साधन म्हणून निर्माण झालेले कॉजवे गाळ साठण्याला सर्वात मोठे कारण ठरत आहे. अर्जुना नदीचा उगम तीव्र चढावावर असून पावसाळ्यात पाण्याची पातळी वाढते. त्यामुळे कित्येक पाणी वाहुन जाते. हे वाहुन जाणारे पाणी व बांधण्यात आलेल्या कॉजवेचे पाईप याचे समिकरण जुळत नसल्याने मोठ्या गतीने पळणाऱ्या पाण्याला कॉजवेमुळे अचानक लगाम लागतो व कॉजवेच्या वरील बाजूस मोठ्या प्रमाणात गाळ साठतो.टंचाईच्या काळात लाखो रुपये खर्च करुन या परिसरातील गावांना पाण्याचा पुरवठा केला जातो. हे पाणी पुरवले तरी महिलांना दूरच्या गावात जाऊन पाणी आणावे लागते. त्यासाठी सक्षम पर्याय म्हणून या नदीतील गाळ काढणे आवश्यक आहे. मात्र त्याबाबत प्रशासन उदासिन असल्यामुळे वर्षानुवर्षाचा गाळ या नदीच्या पात्रात साठत आहे. त्यामुळे श्वास कोंडलेल्या नदीचा या परिसरातील गावांना उपयोगच होईनासा झाला आहे. (वार्ताहर)