शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
4
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
5
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
6
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
7
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
8
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
9
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
10
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
11
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
12
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
13
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
14
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
15
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
16
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
17
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
18
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
19
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
20
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?

जलसुरक्षा कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:33 IST

सभा तहकूब राजापूर : राजापूर पंचायत समितीची दि. २३ रोजी होणारी मासिक सभा कोरोनाच्या वाढत्या उद्रेकामुळे तहकूब करण्यात आली ...

सभा तहकूब

राजापूर : राजापूर पंचायत समितीची दि. २३ रोजी होणारी मासिक सभा कोरोनाच्या वाढत्या उद्रेकामुळे तहकूब करण्यात आली आहे. तालुक्यात सध्या तीव्र पाणी टंचाई जाणवू लागली आहे. मोसम गावात टॅंकरची मागणी करण्यात आली आहे. राजापूर पंचायत समितीचा टॅंकर लांजा पंचायत समितीकडे असून संभाव्य पाणीटंचाई पाहता तो परत मिळणे गरजेचे आहे.

निर्जंतुकीकरणाची मागणी

रत्नागिरी : जिल्ह्यातील विविध ठिकाणी असणाऱ्या एटीएममध्येही निर्जंतुकीकरण करण्याची मागणी ग्राहकांमधून होत आहे. सोडियम हायपोप्लोराईडची फवारणी करण्यात यावी. एटीएममुळे कोरोना संसर्ग फैलावण्याचा धोका आहे.

गतिरोधक न बसवण्याची मागणी

रत्नागिरी : रत्नागिरी ते पावस या सागरी महामार्गाचे अनेक ठिकाणी डांबरीकरण पूर्ण झाले असून या मार्गावर पूर्वी असणारे गतिरोधक पुन्हा बसविले जाऊ नयेत, अशी मागणी जनतेतून करण्यात येत आहे. यापूर्वी या रस्त्यावर १२ गतिरोधक होते.

रस्त्याच्या कामाला सुरुवात

रत्नागिरी : तालुक्यातील काजरघाटी, टिके, हरचेरी, ओशी देवधे रस्ता वाहतुकीसाठी निकृष्ट बनला होता. याबाबत ग्रामस्थांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे रस्ता दुरुस्तीबाबत मागणी केली होती. त्यानुसार रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली असून निधी मंजूर झाला असून कामाला सुरुवात झाली आहे. लवकरच रस्त्याचे काम मार्गी लागणार आहे.

बदलीचे प्रस्ताव

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागात ग्रामसेवकांनी जिल्हा बदलीचे प्रस्ताव दिले असून त्याची छाननी सुरू झाली आहे. जिल्ह्यात नऊ तालुक्यामध्ये असणाऱ्या विविध ग्रामपंचायतीमध्ये अनेक ग्रामसेवक काम करतात. ५० ग्रामसेवकांनी जिल्हा बदलीचे प्रस्ताव सादर केले आहेत.

काॅल सेंटर सुरू

रत्नागिरी : रत्नागिरीत होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या रुग्णांसाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे सुरू करण्यात आले आहे. यामधून रुग्णांना आहाराची तसेच औषधे कशा प्रकारे घ्यावीत, आदीची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. आहार कसा असावा, व्यायाम आदीची माहिती दिली जाणार आहे.

बॅंकांना सुटी

रत्नागिरी : खासगी व सार्वजनिक बॅंका मे महिन्यात एकूण नऊ दिवस बंद राहणार आहेत. बॅंकांच्या विविध सुट्यांमुळे पाच दिवस बॅंका बंद राहणार आहेत.या सुटीशिवाय दुसरा व चाैथा शनिवार जोडल्यास मे महिन्यात एकूण नऊ दिवस बॅंकांना सुटी मिळणार आहे.

फळांचे दरात वाढ

रत्नागिरी : कोरोना रुग्णांची वाढती संख्या शिवाय फळांची होणारी आवक घटली आहे. कोरोना रुग्णांसाठी किवी, सफरचंद, कलिंगड, संत्री, मोसंबी यांना विशेष मागणी होत आहे. लाॅकडाऊनमुळे फळांची आवक मंदावली असल्याने दरात वाढ झाली असल्याचे विक्रेते सांगत आहेत.

साईडपट्टी बुजवण्याची मागणी

रत्नागिरी : शहरातील कोकणनगर येथे पाण्याच्या वाहिनीसाठी साईडपट्टी खोदण्यात आली होती. नगर परिषदेकडून साईटपट्टी बुजविण्यात आली आहे. रस्त्याला जोडूनच खडीकरण करण्यात आल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. शहरातील रस्ते अशाच पद्धतीने बुजविण्याची मागणी होत आहे.