शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
3
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
5
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
6
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
7
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
8
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
9
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
10
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
11
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
12
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
13
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
14
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
15
आयफोन १७ सिरीजमध्ये 'या' गोष्टी मिळणार नाहीत; खरेदी करत असाल तर...
16
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
17
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
18
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
19
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
20
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण

पाणी योजनेचे प्रस्ताव धूळखातच

By admin | Updated: May 26, 2014 01:06 IST

ग्रामीण पेयजल : दोन वर्षानंतरही मंजुरी नाही

रहिम दलाल - रत्नागिरी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत १०१९ वाड्यांची तहान भागविण्यासाठी ५५८ पाणीपुरवठ्याच्या योजनांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. मात्र, आचारसंहितेच्या गर्तेत या कार्यक्रमाचा शासनाकडून जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला आलेला १७ कोटी रुपयांचा निधी अडकला आहे. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विविध पाणी पुरवठा योजना राबवून त्याद्वारे वाड्या, वस्त्यांना पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या माध्यमातून उद्भवणारी पाणीटंचाई भविष्यात आटोक्यात येणार आहे. त्यामुळे दरवर्षी शासनाचा होणारा टंचाईग्रस्त वाड्यांवरील खर्च कमी होणार आहे. मात्र हे प्रस्ताव तसेच धूळखात पडल्याने यासाठी आलेला निधी तसाच पडून आहे. जिल्ह्यात १५३४ गावांमध्ये ८९४८ वाड्या आहेत. तर या सर्व गावांचा ८४५ ग्रामपंचायतींमध्ये समावेश आहे. जिल्ह्यातील १५ टक्के वाड्यांमध्ये अजूनही पाणी पुरवठ्याच्या योजना राबविण्यात आलेल्या नाहीत. जिल्ह्यामध्ये पाणीपुरवठ्याच्या विविध योजना राबविण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला शासनाकडून १७ कोटी रुपयांचा निधी पूर्वीच प्राप्त झाला आहे. या निधीतून जिल्ह्याच्या १०१९ वाड्यांमधील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी ५५८ योजना राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी सन २०१४-१५ चा २९७ वाड्यांमध्ये १९२ योजना आणि सन १०१५-१६ चा ७२२ वाड्यांमध्ये ३३६ योजनांचा आराखडा तयार करुन तो प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदेला १७ कोटी रुपयांचा आलेला आहे. हा निधी खर्ची घालण्यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने सन २०१४-१५ आणि सन २०१५-१६ या आर्थिक वर्षाचा आराखडा तयार करुन पाठविलेला प्रस्ताव लोकसभेच्या आंचारसंहितेमुळे मंजूरीविना शासनाकडे धूळखात पडून आहे. त्यामुळे शासनाकडून आलेले १७ कोटी रुपये ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे पडून आहे. या प्रस्तावावर वेळीच विचार झाला असता तर ग्रामीण भागातील पाणीटंचाई बर्‍याच प्रमाणात सुटण्यास मदत झाली असती.