शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
2
"ते मराठीत न बोलल्याने भाषेला भोकं पडणार का?’’, अभिनेत्री केतकी चितळेचं वादग्रस्त विधान
3
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   
4
WTC मध्ये भारताचा टॉपर ठरला रिषभ पंत! हिटमॅन रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला
5
हे सारं मी त्यांच्या सांगण्यावरून केलं, बनावट दूतावास चालवणाऱ्या हर्षवर्धनचा धक्कादायक दावा   
6
IND vs ENG 4th Test Day 2 Stumps: मॅच आधी गिलनं ज्यांना डिवचलं त्या दोघांनीच दमवलं; शेवटी...
7
Asia Cup 2025 : बीसीसीआय UAE च्या मैदानात स्पर्धा घेणार; भारत-पाक हायहोल्टेज मॅचही पाहायला मिळणार?
8
Anshul Kamboj vs Ben Duckett: अंशुल कंबोजची पहिली टेस्ट विकेट! बेन डकेट 'नर्व्हस नाइंटी'चा शिकार
9
"देशासाठी लढणारा मराठी माणूस कधी..., काहींना शिवरायांच्या नावाची ॲलर्जी"; मुख्यमंत्री फडणवीस यांचं जोरदार भाषण
10
Hulk Hogan Death: 'बालपणीचा सुपरहिरो' प्रसिद्ध WWE स्टार हल्क होगनचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
मग मृतांना निवडणुकीत मतदान करायला द्यायचं का? राहुल-तेजस्वींना निवडणूक आयोगाचा सवाल
12
VIDEO: ती आली अन् थेट त्याला बिलगली... चहल-महावशची एकमेकांना घट्ट मिठी, क्लिप व्हायरल
13
चक्क दारूच्या ट्रकवर राज्यामंत्र्याचे नाव, ४० लाखांची विदेशी दारू, सात आराेपींना घेतले ताब्यात
14
'या लोकांचे प्रफुल्ल लोढासोबत काय संबंध आहेत?', गिरीश महाजनांच्या संयमाचा कडेलोट, 'मविआ'ला थेट फोटोच दाखवले
15
दिल्लीतील JNU मधील देवेंद्र फणडवीसांच्या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांचं आंदोलन, महायुती सरकारविरोधात घोषणाबाजी
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी गुप्तचर संस्थेत नोकरी; मुंबई, नागपूरसाठी 'इतक्या' जागा राखीव!
17
Rishabh Pant Fifty : भारताच्या 'जखमी वाघा'ची डरकाळी! लढवय्या पंतनं ठोकली सॉलिड फिफ्टी
18
₹1600 वर पोहोचू शकतो इलेक्ट्रिक बस बनवणाऱ्या कंपनीचा शेअर, खरेदीसाठी उडालीय लोकांची झुंबड; करतोय मालामाल!
19
स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणी राहुल गांधी यांना नाशिकच्या कोर्टात जामीन
20
वाघाच्या काळजाचा! जखमी असूनही इंग्लंडशी भिडला, मँचेस्टरमध्ये पंतची विक्रमी खेळी

पाणी योजनेचे प्रस्ताव धूळखातच

By admin | Updated: May 26, 2014 01:06 IST

ग्रामीण पेयजल : दोन वर्षानंतरही मंजुरी नाही

रहिम दलाल - रत्नागिरी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत १०१९ वाड्यांची तहान भागविण्यासाठी ५५८ पाणीपुरवठ्याच्या योजनांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. मात्र, आचारसंहितेच्या गर्तेत या कार्यक्रमाचा शासनाकडून जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला आलेला १७ कोटी रुपयांचा निधी अडकला आहे. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विविध पाणी पुरवठा योजना राबवून त्याद्वारे वाड्या, वस्त्यांना पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या माध्यमातून उद्भवणारी पाणीटंचाई भविष्यात आटोक्यात येणार आहे. त्यामुळे दरवर्षी शासनाचा होणारा टंचाईग्रस्त वाड्यांवरील खर्च कमी होणार आहे. मात्र हे प्रस्ताव तसेच धूळखात पडल्याने यासाठी आलेला निधी तसाच पडून आहे. जिल्ह्यात १५३४ गावांमध्ये ८९४८ वाड्या आहेत. तर या सर्व गावांचा ८४५ ग्रामपंचायतींमध्ये समावेश आहे. जिल्ह्यातील १५ टक्के वाड्यांमध्ये अजूनही पाणी पुरवठ्याच्या योजना राबविण्यात आलेल्या नाहीत. जिल्ह्यामध्ये पाणीपुरवठ्याच्या विविध योजना राबविण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला शासनाकडून १७ कोटी रुपयांचा निधी पूर्वीच प्राप्त झाला आहे. या निधीतून जिल्ह्याच्या १०१९ वाड्यांमधील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी ५५८ योजना राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी सन २०१४-१५ चा २९७ वाड्यांमध्ये १९२ योजना आणि सन १०१५-१६ चा ७२२ वाड्यांमध्ये ३३६ योजनांचा आराखडा तयार करुन तो प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदेला १७ कोटी रुपयांचा आलेला आहे. हा निधी खर्ची घालण्यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने सन २०१४-१५ आणि सन २०१५-१६ या आर्थिक वर्षाचा आराखडा तयार करुन पाठविलेला प्रस्ताव लोकसभेच्या आंचारसंहितेमुळे मंजूरीविना शासनाकडे धूळखात पडून आहे. त्यामुळे शासनाकडून आलेले १७ कोटी रुपये ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे पडून आहे. या प्रस्तावावर वेळीच विचार झाला असता तर ग्रामीण भागातील पाणीटंचाई बर्‍याच प्रमाणात सुटण्यास मदत झाली असती.