शहरं
Join us  
Trending Stories
1
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
2
एखाद्याला खासदार करायचं म्हटल्यावर करतो अन् पाडायचं म्हटलं तर पाडतोच' अजित पवारांची टोलेबाजी
3
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
4
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
5
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
6
ग्रावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी
7
"छोट्या गाडीतून आले म्हणून मला फिल्मफेअर सोहळ्यात अडवलं"; प्रसिद्ध अभिनेत्रीने केली बॉलिवूडची पोलखोल
8
जुळ्या बहिणींचे जुळे गुण! दहावीमध्ये मिळवले सेम टू सेम ९६ टक्के, अनुष्का-तनुष्काचे दैदिप्यमान यश
9
5 महिन्यात 3 बैठका; भारत-अफगाणिस्तानची वाढती जवळीक, पाक सरकारची डोकेदुखी वाढणार
10
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीचा उपास सोडताना 'या' चुका टाळा नाहीतर उपासना जाईल वाया!
11
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
12
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न
13
आम्ही भारतात गुंतवणूक करतच राहू; भारत सरकारला.., Apple चा ट्रम्पना मोठा झटका
14
सैन्याला मिळणार ₹50,000 कोटींचा बुस्टर डोस; ऑपरेशन सिंदूरनंतर सरकार तिजोरी उघडणार
15
Sankashthi Chaturthi 2025: मन अस्थिर, अशांत असेल त्याक्षणी म्हणा किंवा ऐका 'हे' गणेशस्तोत्र!
16
मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यानंतर मेहता नरमले; गेल्या दोन वर्षांपासून बंद पडलेले काशिगाव मेट्रो स्थानकाच्या जिन्याचे काम सुरु झाले
17
घर आणि गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! RBI रेपो रेट ०.७५% ने कमी करू शकते; किती येईल EMI
18
भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठी अपडेट; १८ मेपर्यंत मुदतवाढ, पुन्हा डीजीएमओ चर्चेला बसणार... 
19
म्हणे, व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिवांना कतारमध्ये काश्मिरी वेटर भेटला; 'ट्रम्पना थँक्यू सांगा' म्हणाला...
20
अमेरिकेचा दुटप्पीपणा; पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्कीला अत्याधुनिक क्षेपणास्त्रे पुरवणार...

नवानगरच्या पाच विहिरींचे पाणी दूषित

By admin | Updated: December 24, 2015 00:57 IST

दापोलीतील प्रकार : स्वच्छ भारत मिशनला गालबोट लावण्याचा प्रयत्न; पाण्यामुळे रहिवाशांचे आरोग्य धोक्यात

शिवाजी गोरे - दापोली ,देशभरात स्वच्छ भारत मोहीम जोरदार सुरु आहे. या मोहिमेला सर्वत्र सकारात्मक प्रतिसाद मिळू लागला आहे. दापोली नगरपंचायतीने स्वच्छ भारत मिशन शहरात प्रभावीपणे राबविण्यास सुरुवात केली आहे. दापोली नगरपंचायतीला स्वच्छ भारत मिशन हागणदारीमुक्तचा सन्मान मिळाला आहे. मात्र, असे असले तरीही काही ठिकाणी स्वच्छ भारत मोहिमेला गालबोट लागल्याच्या घटना घडत असून, नवानगर पऱ्याशेजारील पाच कुटुंबाच्या विहिरीचे पाणी दूषित झाल्याची तक्रार तानाजी पोवार यांनी प्रशासनाकडे केली आहे. या घटनेमुळे दापोली नगरपंचायतीच्या स्वच्छ भारत मोहिमेला गालबोट लागण्याची शक्यता आहे.दापोली नगरपंचायत हद्दीतील जोगळे-नवानगर सरकारी झोपडपट्टी पुनर्वसन वसाहतीतील १० शौचालयांच्या आऊटलेटचे अशुद्ध पाणी थेट ओढ्यात सोडल्याने ओढ्यातील पाणी अशुद्ध होऊन परिसरात दुर्गंधी पसरली आहे. तसेच यामुळे ओढ्याशेजारी असणाऱ्या जालगाव ग्रामपंचायत हद्दीतील महालक्ष्मीनगरमधील पाच विहिरींचे पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे या कुटुंबियांवर विकत पाणी घेण्याची वेळ आली आहे. ओढ्यातील पाणी अशुद्ध झाल्याने आजुबाजूच्या विहिरींचे पाणीदेखील दूषित झाले आहे.विहिरींमध्ये ओढ्यातील अशुद्ध तसेच शौचालयाचे दूषित पाणी याचा निचरा होत असल्याने सदर विहिरींचे पाणी पिण्यायोग्य नाही. त्यामुळे विहीर आहे, मुबलक पाणीसुद्धा आहे. परंतु, विहिरीचे पाणी दूषित झाल्याने ते पिण्यायोग्य नाही. गेली अनेक महिने विकतचे पाणी पिण्याची वेळ या कुटुंबांवर आली आहे. त्याचबरोबर नवानगर वसाहतीतील संडासच्या टाकीसाठी करण्यात आलेल्या खोदकामातील दगड व माती ओढ्यात टाकण्यात आल्याने या ओढ्याचा प्रवाह बदलून वाहणारे पाणी एकाच ठिकाणी साठले आहे. ओढ्यातील पाण्यात शौचालयाचे पाणी थेट सोडण्यात आल्याने ओढ्यातील या पाण्यावर डासांचा प्रादूर्भाव होऊन ओढ्याशेजारील कुटुंबांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नवानगर वसाहतीतील लोक कचऱ्याची विल्हेवाट न लावता थेट ओढ्यात आणून टाकत असल्याने ओढ्यात मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य पसरले असून, परिसरात दूर्गंधी पसरल्याची तक्रार तानाजी पोवार यांनी केली आहे.