शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

शहरी भागासह आजूबाजूच्या गावांमध्ये जलसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:31 IST

रत्नागिरी तालुक्यातील विविध भागांत पाणीपुरवठा करणाऱ्या काजळी नदीतील पाणीसाठा कमी झाल्याने पुरेशा दाबाने नियमित पाणीपुरवठा करणे अशक्य होत आहे़. ...

रत्नागिरी तालुक्यातील विविध भागांत पाणीपुरवठा करणाऱ्या काजळी नदीतील पाणीसाठा कमी झाल्याने पुरेशा दाबाने नियमित पाणीपुरवठा करणे अशक्य होत आहे़. त्यामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने १५ मे २०२१ पासून २५ टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे रत्नागिरी, मिरजोळे, झाडगाव औद्योगिक क्षेत्र तसेच रत्नागिरी नगर परिषदेचा काही भाग व नजीकच्या ग्रामपंचायती, मिरजोळे, शिरगाव, मिऱ्या, नाचणे, कुवारबांव, पोमेंडी, कर्ला, चिंद्रवली, टिके व इतर काही खासगी ग्राहकांना पाणीपुरवठा करण्यात येतो.

सद्य स्थितीमध्ये काजळी नदीतील पाणीसाठा अतिशय कमी झाला आहे़ त्यामुळे पुरेशा दाबाने नियमित पाणीपुरवठा करणे अशक्य होत आहे. सध्या पावसाचे आगमन अनिश्चित असल्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोरपणे नियोजन करून पाऊस चालू होईपर्यंत पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने महामंडळाने पाणीपुरवठा कालावधीमध्ये कपात करण्याचे धोरण ठरविले आहे. त्याचे गांभीर्य लोकांनी लक्षात घेऊनच पाण्याचा वापर काटकसरीने करावा. तसेच पाऊस लांबणीवर पडल्यास आणखी पाणी कपात करण्यात येणार असल्याचे स्पष्ट सूचना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून देण्यात आल्याने नागरिकांना पाऊस सुरू होईपर्यंत पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

रत्नागिरी शहरवासीयांचे पाण्यासाठी हाल

रत्नागिरी नगर परिषदेकडून शीळ धरणातून शहराला पाणी पुरवठा करण्यात येतो. शीळ धरणाकडून येणारी जलवाहिनी जुनी झाली आहे. त्यामुळे मुख्य जलवाहिनी अनेक ठिकाणी फुटल्याने दररोज हजारो लिटर्स पाणी वाया जाते. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून नगर परिषदेने ही जलवाहिनी बदल्याचे काम सुरू झाले आहे. मात्र, हे काम सुरू झाल्यापासून शहरवासीयांना पाण्याची समस्या भेडसावत आहे. अनेक भागातील लोकांना पाणी टँकरने विकत घ्यावे लागते. त्याचबरोबर या जलवाहिनीचे काम वेळेत पूर्ण न झाल्याने त्याचा फटका शहरवासीयांना बसला आहे. त्यामुळे लोकांच्या रोषाला लोकप्रतिनिधींना सामोरे जावे लागत असल्याने ते हैराण झाले आहेत.