शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
3
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
4
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांचा महायुतीला मोठा धक्का; एका क्लिकवर वाचा निकाल
5
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
6
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
7
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
8
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
10
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
11
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
12
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
13
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
14
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
15
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
16
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
17
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
18
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
19
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
20
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
Daily Top 2Weekly Top 5

शहरी भागासह आजूबाजूच्या गावांमध्ये जलसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:31 IST

रत्नागिरी तालुक्यातील विविध भागांत पाणीपुरवठा करणाऱ्या काजळी नदीतील पाणीसाठा कमी झाल्याने पुरेशा दाबाने नियमित पाणीपुरवठा करणे अशक्य होत आहे़. ...

रत्नागिरी तालुक्यातील विविध भागांत पाणीपुरवठा करणाऱ्या काजळी नदीतील पाणीसाठा कमी झाल्याने पुरेशा दाबाने नियमित पाणीपुरवठा करणे अशक्य होत आहे़. त्यामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने १५ मे २०२१ पासून २५ टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे रत्नागिरी, मिरजोळे, झाडगाव औद्योगिक क्षेत्र तसेच रत्नागिरी नगर परिषदेचा काही भाग व नजीकच्या ग्रामपंचायती, मिरजोळे, शिरगाव, मिऱ्या, नाचणे, कुवारबांव, पोमेंडी, कर्ला, चिंद्रवली, टिके व इतर काही खासगी ग्राहकांना पाणीपुरवठा करण्यात येतो.

सद्य स्थितीमध्ये काजळी नदीतील पाणीसाठा अतिशय कमी झाला आहे़ त्यामुळे पुरेशा दाबाने नियमित पाणीपुरवठा करणे अशक्य होत आहे. सध्या पावसाचे आगमन अनिश्चित असल्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोरपणे नियोजन करून पाऊस चालू होईपर्यंत पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने महामंडळाने पाणीपुरवठा कालावधीमध्ये कपात करण्याचे धोरण ठरविले आहे. त्याचे गांभीर्य लोकांनी लक्षात घेऊनच पाण्याचा वापर काटकसरीने करावा. तसेच पाऊस लांबणीवर पडल्यास आणखी पाणी कपात करण्यात येणार असल्याचे स्पष्ट सूचना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून देण्यात आल्याने नागरिकांना पाऊस सुरू होईपर्यंत पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

रत्नागिरी शहरवासीयांचे पाण्यासाठी हाल

रत्नागिरी नगर परिषदेकडून शीळ धरणातून शहराला पाणी पुरवठा करण्यात येतो. शीळ धरणाकडून येणारी जलवाहिनी जुनी झाली आहे. त्यामुळे मुख्य जलवाहिनी अनेक ठिकाणी फुटल्याने दररोज हजारो लिटर्स पाणी वाया जाते. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून नगर परिषदेने ही जलवाहिनी बदल्याचे काम सुरू झाले आहे. मात्र, हे काम सुरू झाल्यापासून शहरवासीयांना पाण्याची समस्या भेडसावत आहे. अनेक भागातील लोकांना पाणी टँकरने विकत घ्यावे लागते. त्याचबरोबर या जलवाहिनीचे काम वेळेत पूर्ण न झाल्याने त्याचा फटका शहरवासीयांना बसला आहे. त्यामुळे लोकांच्या रोषाला लोकप्रतिनिधींना सामोरे जावे लागत असल्याने ते हैराण झाले आहेत.