शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

शहरी भागासह आजूबाजूच्या गावांमध्ये जलसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:31 IST

रत्नागिरी तालुक्यातील विविध भागांत पाणीपुरवठा करणाऱ्या काजळी नदीतील पाणीसाठा कमी झाल्याने पुरेशा दाबाने नियमित पाणीपुरवठा करणे अशक्य होत आहे़. ...

रत्नागिरी तालुक्यातील विविध भागांत पाणीपुरवठा करणाऱ्या काजळी नदीतील पाणीसाठा कमी झाल्याने पुरेशा दाबाने नियमित पाणीपुरवठा करणे अशक्य होत आहे़. त्यामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने १५ मे २०२१ पासून २५ टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे रत्नागिरी, मिरजोळे, झाडगाव औद्योगिक क्षेत्र तसेच रत्नागिरी नगर परिषदेचा काही भाग व नजीकच्या ग्रामपंचायती, मिरजोळे, शिरगाव, मिऱ्या, नाचणे, कुवारबांव, पोमेंडी, कर्ला, चिंद्रवली, टिके व इतर काही खासगी ग्राहकांना पाणीपुरवठा करण्यात येतो.

सद्य स्थितीमध्ये काजळी नदीतील पाणीसाठा अतिशय कमी झाला आहे़ त्यामुळे पुरेशा दाबाने नियमित पाणीपुरवठा करणे अशक्य होत आहे. सध्या पावसाचे आगमन अनिश्चित असल्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोरपणे नियोजन करून पाऊस चालू होईपर्यंत पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने महामंडळाने पाणीपुरवठा कालावधीमध्ये कपात करण्याचे धोरण ठरविले आहे. त्याचे गांभीर्य लोकांनी लक्षात घेऊनच पाण्याचा वापर काटकसरीने करावा. तसेच पाऊस लांबणीवर पडल्यास आणखी पाणी कपात करण्यात येणार असल्याचे स्पष्ट सूचना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून देण्यात आल्याने नागरिकांना पाऊस सुरू होईपर्यंत पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

रत्नागिरी शहरवासीयांचे पाण्यासाठी हाल

रत्नागिरी नगर परिषदेकडून शीळ धरणातून शहराला पाणी पुरवठा करण्यात येतो. शीळ धरणाकडून येणारी जलवाहिनी जुनी झाली आहे. त्यामुळे मुख्य जलवाहिनी अनेक ठिकाणी फुटल्याने दररोज हजारो लिटर्स पाणी वाया जाते. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून नगर परिषदेने ही जलवाहिनी बदल्याचे काम सुरू झाले आहे. मात्र, हे काम सुरू झाल्यापासून शहरवासीयांना पाण्याची समस्या भेडसावत आहे. अनेक भागातील लोकांना पाणी टँकरने विकत घ्यावे लागते. त्याचबरोबर या जलवाहिनीचे काम वेळेत पूर्ण न झाल्याने त्याचा फटका शहरवासीयांना बसला आहे. त्यामुळे लोकांच्या रोषाला लोकप्रतिनिधींना सामोरे जावे लागत असल्याने ते हैराण झाले आहेत.