शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

पाणी मुबलक, पण पुरवठ्यात व्यत्यय

By admin | Updated: April 22, 2015 00:24 IST

रत्नागिरीतील विहिरी : शीळ धरण भागविणार रत्नागिरीकरांची तहान

प्रकाश वराडकर - रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणात यंदाही मुबलक पाणी आहे. हे पाणी आॅगस्ट २०१५ पर्यंत पुरेल, असे पालिका सुत्रांकडून सांगण्यात आले. मात्र, साठा मुबलक असूनही पाणी वितरण वाहिन्या जुनाट असून, कुचकामी ठरत असल्याने पाणी पुरवठ्यात व्यत्यय येत आहे. पाणी वितरण व्यवस्थेचे उपग्रहाद्वारे जीआयएस मॅपिंग झाले असून, सुधारणा व दुरुस्तीसाठी ५७ कोटींचा निधी सुजल योजनेतून नगरपरिषदेला मिळणार आहे.शहराला १९६५ पासून पानवल धरणातून पाणीपुरवठा केला जातो. त्यानंतर चिपळूण पाटबंधारेच्या ताब्यातील शीळ धरणातून शहराला सर्वाधिक पाणीपुरवठा केला जात आहे. नाचणे तलावातून काही प्रमाणात पाणी उपलब्ध होते. एमआयडीसीकडूनही १००० घनमीटर पाणी घेतले जाते. मात्र, पानवल धरणातून फेबु्रवारीअखेरपर्यंतच पाणी उपलब्ध होते. त्यानंतर हे धरण आटत असल्याने अधिकचे पाणी शीळ धरणातून घेतले जाते. सध्या रत्नागिरी शहराला १४.२ दशलक्ष घनलीटर पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यापैकी १३००० घनमीटर पाणी हे केवळ शीळ धरणातून विद्युत पंपाद्वारे लिफ्ट करून साळवी स्टॉप येथील जलशुध्दिकरण केंद्रात आणले जाते, तर १००० घनमीटर पाणी एमआयडीसीकडून घेतले जाते. नाचणे तलावातून केवळ ०.०५ घनमीटर पाणी मिळते.गेल्या काही वर्षांत रत्नागिरीच्या पाणीपुरवठा व्यवस्थेवर ताण पडताना दिसत आहे. शहरातील अपार्टमेंट्सची संख्या वाढत आहे. शहराची लोकसंख्याही काही प्रमाणात वाढली आहे. रत्नागिरी हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने जिल्हाभरातून कामाच्या निमित्ताने हजारो लोक दररोज शहरात येतात. तसेच शासकीय कार्यालयांमध्ये काम करणारे परंतु शहराच्या बाहेर राहणारे असंख्य कर्मचारीही आहेत. या सर्व लोकसंख्येचा शहरातील अन्य सुविधांबरोबरच पाणी पुरवठा सुविधेवर परिणाम होतो. त्यामुळेच शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करण्याची आवश्यकता आहे.सद्यस्थितीत रत्नागिरी शहरात ९,२०२ नळजोडण्या असून, त्यासाठीचे संपूर्ण वितरण जाळे मात्र खूप जुने आहे. अनेक ठिकाणी जलवाहिन्यांचे जाळे कुचकामी झाले आहे. जीआयएस मॅपिंगच्यावेळी शहरातील या पाणी वितरण करणाऱ्या वाहिन्यांचे सर्वेक्षण करण्यात आले असून, जलवाहिन्या पूर्णपणे बदलण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शासनाच्या सुजल योजनेतून शहरातील जलवाहिन्यांची दुरुस्ती, आवश्यक तेथे नवीन जलवाहिन्या टाकणे, शीळ धरणापासून पुढे ५०० मीटर्सपर्यंतची मोठी जलवाहिनी जागोजागी गंजल्याने सातत्याने जलवाहिनी फुटण्याचे प्रकार होतात. त्यातून पाणीही मोठ्या प्रमाणात वाया जाते. पाणीपुरवठ्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो. यामुळे काही दिवस पाणीपुरवठा ठप्प होतो. ही जलवाहिनी बदलण्याबाबतचा प्रस्ताव आहे. एकूणच सुजल योजनेतून ५७ कोटीच्या दुरुस्तीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. त्यामुळे शासन दरबारी या प्रस्तावाबाबत सातत्याने पाठपुरावा करुन रत्नागिरी शहरातील पाणी व्यवस्थेची दुरुस्ती, नूतनीकरण लवकरात लवकर कसे होईल, याकडे सत्ताधाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. पुरेसे पाणी असूनही ते लोकांपर्यंत पोहोचत नाही, ही स्थिती बदलण्याची मागणी होत आहे. पाणीसाठवण टाक्या व क्षमता रत्नागिरीतील विहिरीखासगीसार्वजनिक३५१८पाणीपट्टी कर३ कोटीनळजोडण्या९,२०२दरडोई पाणीपुरवठा१३५ ली.आवश्यक दरडोई पाणीपुरवठा७० लीटरवितरण जलवाहिन्यांची लांबी१४० कि. मी.जलशुद्धीकरण प्रकल्पसाळवी स्टॉप, नाचणेपाणी वितरणासाठी येणारा खर्च (महिना)वीजबिलासह१९ लाखशहरातील विभागवार पाणीमोजणी मीटर्स९पाणी व्यवस्था कर्मचारीनियमीत२२कंत्राटी४०पाणीसाठवण टाक्या व क्षमता