शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पाणीटंचाईमध्ये जैसे थे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:31 IST

रत्नागिरी : मागील आठवड्यामध्ये जिल्ह्यातील ४ गावांतील ५ वाड्यांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाल्याने, येथील लोकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत ...

रत्नागिरी : मागील आठवड्यामध्ये जिल्ह्यातील ४ गावांतील ५ वाड्यांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाल्याने, येथील लोकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. मात्र, चालू आठवड्यामध्ये या टंचाईग्रस्तांमध्ये एकाही गावातील वाडीची भर न पडल्याने पाणीटंचाई जैसे थे आहे.

खेड तालुक्यातील खवटी गावातील खालची धनगरवाडीमध्ये भीषण पाणीटंचाई उद्भवू लागल्याने, लोकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. खवटी-खालची धनगरवाडीनंतर आता वरची धरनगरवाडी, आंबवली येथील भिंगारा, लांजा तालुक्यातील चिंचुर्टीमधील धावडेवाडी येथे दरवर्षी भीषण पाणीटंचाई उद्भवली आहे. रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील स्वरूपानंदनगर येथील २४ विहिरींचे पाणी दूषित झाल्याने त्यांनाही टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या टंचाईग्रस्तांना ३ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असून, तोही अपुरा पडत असल्याची ओरड ग्रामस्थांमध्ये सुरू आहे.

दरम्यान, उष्म्यामध्ये प्रचंड वाढ झाल्याने पाण्याची पातळीही खालावली आहे. त्यामुळे पाणीटंचाईग्रस्त गावे, वाड्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, चालू आठवड्यात टंचाईग्रस्त गावे, वाड्यांमध्ये भर पडलेली नाही. त्यामुळे पाणीटंचाई सध्या तरी जैसे थे आहे.