शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
7
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
8
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
9
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
10
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
11
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
12
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
13
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
14
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
16
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
17
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
18
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
19
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
20
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी

जिल्ह्यात पाणीटंचाईमध्ये जैसे थे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:31 IST

रत्नागिरी : मागील आठवड्यामध्ये जिल्ह्यातील ४ गावांतील ५ वाड्यांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाल्याने, येथील लोकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत ...

रत्नागिरी : मागील आठवड्यामध्ये जिल्ह्यातील ४ गावांतील ५ वाड्यांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाल्याने, येथील लोकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. मात्र, चालू आठवड्यामध्ये या टंचाईग्रस्तांमध्ये एकाही गावातील वाडीची भर न पडल्याने पाणीटंचाई जैसे थे आहे.

खेड तालुक्यातील खवटी गावातील खालची धनगरवाडीमध्ये भीषण पाणीटंचाई उद्भवू लागल्याने, लोकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. खवटी-खालची धनगरवाडीनंतर आता वरची धरनगरवाडी, आंबवली येथील भिंगारा, लांजा तालुक्यातील चिंचुर्टीमधील धावडेवाडी येथे दरवर्षी भीषण पाणीटंचाई उद्भवली आहे. रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील स्वरूपानंदनगर येथील २४ विहिरींचे पाणी दूषित झाल्याने त्यांनाही टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या टंचाईग्रस्तांना ३ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असून, तोही अपुरा पडत असल्याची ओरड ग्रामस्थांमध्ये सुरू आहे.

दरम्यान, उष्म्यामध्ये प्रचंड वाढ झाल्याने पाण्याची पातळीही खालावली आहे. त्यामुळे पाणीटंचाईग्रस्त गावे, वाड्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, चालू आठवड्यात टंचाईग्रस्त गावे, वाड्यांमध्ये भर पडलेली नाही. त्यामुळे पाणीटंचाई सध्या तरी जैसे थे आहे.