शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
2
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
3
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
4
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
5
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
6
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
7
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
8
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
9
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
10
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
11
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
12
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
13
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
14
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
15
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
16
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
17
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
18
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
19
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
20
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले

सलग दोन दिवस जोरदार पावसाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:30 IST

रत्नागिरी : गेले दोन दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने रविवारपासून पुन्हा हजेरी लावली आहे. दिवसभरात ३१६.२० मिलिमीटर इतकी पावसाची नोंद ...

रत्नागिरी : गेले दोन दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने रविवारपासून पुन्हा हजेरी लावली आहे. दिवसभरात ३१६.२० मिलिमीटर इतकी पावसाची नोंद झाली आहे. चिपळूण तालुक्यात घर व गोठ्याचे नुकसान वगळता अन्य तालुक्यात नुकसानाची नोंद झालेली नाही. मात्र, जिल्ह्यात १३ व १४ सप्टेंबर राेजी काेकणासह कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

रविवारी सकाळपासूनच पावसाने सुरुवात केली आहे. दुपारी काही वेळ विश्रांती घेतली असली तरी सरीवर पाऊस कोसळत होता. त्यामुळे सायंकाळी गाैरी आणण्यासाठी जाणाऱ्या महिलांना भिजतच जावे लागले. मंडणगड तालुक्यात ४०.२०, दापोली ४६.४०, खेड ५४.४०, गुहागर २९.८०, चिपळूण ४०.८०, संगमेश्वर २७.७०, रत्नागिरी १६.१०, लांजा २६.१० तर राजापूर तालुक्यात ३४.७० मिलिमीटर पावसाची नाेंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३१७७०.२० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस खेड तालुक्यात तर सर्वांत कमी पाऊस रत्नागिरी तालुक्यात झाला आहे. चिपळूण तालुक्यातील माैजे कोसळी येथे राजेंद्र सावंत यांच्या घराचे तर माैजे कटरे येथील राजाराम जाधव यांच्या गोठ्याचेही नुकसान झाले आहे.