शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

अतिवृष्टीचा इशारा; सतर्कता बाळगण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:38 IST

रत्नागिरी : भारतीय हवामान खात्यातर्फे येत्या चार दिवसांत रत्नागिरी जिल्ह्याच्या अनेक भागांत अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे. ...

रत्नागिरी : भारतीय हवामान खात्यातर्फे येत्या चार दिवसांत रत्नागिरी जिल्ह्याच्या अनेक भागांत अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्कता बाळगावी व सुरक्षित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी केले आहे

याविषयी खबरदारी बाळगण्यासंदर्भात प्रसिद्धिपत्रक जारी करण्यात आले आहे. हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार दिनांक ६ ते ९ सप्टेंबर या कालावधीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या कालावधीमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. याअनुषंगाने जिल्ह्यातील ग्रामस्थांनी पुढीलप्रमाणे खबरदारी घेण्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार दि.१० सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू असल्याने ६ सप्टेंबरपासून रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या काळात नागरिकांनी काळजी घ्यावी. पुलावरून, संरक्षक दगडावरून पाणी वाहत असल्यास प्रवास टाळावा. धाडसाने वाहन पाण्यामध्ये घालू नये. अतिवृष्टीमुळे वाहतूक विस्कळीत झाल्यास सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळावेत. अनावश्यक ओव्हर टेक करून वाहनांच्या ३-३ रांगा करू नयेत. प्रवासात आवश्यक खबरदारी घ्यावी. वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे. अतिवृष्टीमध्ये रस्त्यावर दरड कोसळण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने प्रवास करताना काळजी घ्यावी.

आपले घर सुरक्षित असल्यास व अतिवृष्टीमुळे घरांमध्ये पाणी भरणार नाही याची खात्री असल्यास घरातच सुरक्षित राहावे. आवश्यकता नसेल तर घराच्या बाहेर पडू नये. घरामध्ये पाणी घुसून पाण्याची पातळी वाढत असल्यास तत्काळ घर सोडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. घर मोडकळीस आलेले असेल किंवा कच्च्या स्वरूपाचे असेल, तर तत्काळ उंचावरील ठिकाणी किंवा सुरक्षितस्थळी आवश्यक साधनसामग्री सोबत घेऊन स्थलांतरित व्हावे. घराच्या अवतीभोवती पाऊस व वादळामुळे विजेचे खांब किंवा तारा, झाडे आदी पडण्याची शक्यता असल्यास अशा वस्तूपासून लांब राहावे. आपले पशुधन व अन्य पाळीव प्राणी यांना अगोदरच सुरक्षितस्थळी हलवावे. दैनंदिन लागणारी औषधे, केरोसिनवर चालणारे बंदिस्त दिवे बॅटरी, गॅसबत्ती, काडीपेटी या वस्तू जवळ ठेवाव्यात. मोबाईल फोन बॅटरी चार्ज करून ठेवावेत. अतिवृष्टीचा फटका टाळण्यासाठी दरडप्रवण भागातील समुद्र व खाडी किनारी तसेच नदीकिनारी राहणाऱ्या सखल भागातील लोकांनी सावधगिरी बाळगावी व अतिवृष्टीमुळे पाणी पातळी वाढत असल्यास तत्काळ सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. ग्राम कृती दलांनी सतर्क राहून वेळोवेळी तहसील कार्यालयास माहिती द्यावी. मासेमारीसाठी व पोहायला समुद्रात जाऊ नये. धबधब्याच्या ठिकाणी जाऊ नये. विजा चमकत असताना झाडाखाली थांबू नये. मोबाईलचा वापर करू नये. मदत आवश्यक असल्यास आपल्या ग्रामपंचायत तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा, तसेच जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष ०२३५२-२२२२२२ व जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्षाशी ०२३५२-२२६२४८ / २२२२३३ या क्रमांकावर, तसेच तहसील कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे.