शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

वारकरी समाजालाही कलावंत निधीचा सन्मान द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:36 IST

चिपळूण : भजन, कीर्तन आणि प्रवचन या माध्यमातून समाज प्रबोधन करणारा वारकरी समाज आज देशोधडीला लागला आहे. कलावंत आणि ...

चिपळूण : भजन, कीर्तन आणि प्रवचन या माध्यमातून समाज प्रबोधन करणारा वारकरी समाज आज देशोधडीला लागला आहे. कलावंत आणि त्यांची कुटुंब उपासमारीचा सामना करीत आहेत. वारकरी समाजाला जगवण्याचे काम करण्यासाठी कलावंत निधीचा सन्मान मिळवून देण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे वारकरी साहित्य परिषदेतर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात वारकरी समाजाने आपल्या भावनांचे निवेदन तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांना दिले.

कोरोनामुळे गत दीड दोन वर्षे समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम बंद आहेत, तर मंदिरे ही बंद असल्याने धार्मिक कार्यक्रमांवर बंदी आहे. त्यामुळे समाज प्रबोधन करणारा वारकरी समाज बेरोजगारीच्या खाईत लोटला गेला आहे. भजन, कीर्तन, प्रवचन या माध्यमातून कीर्तनकार, प्रवचनकार, विणेकरी, गायनाचार्य, मृदंगमनी असे सारे एकमेकांवर अवलंबून आहेत. मात्र, कोविडच्या नियमामुळे हे सर्व कार्यक्रम बंद आहेत. गावोगावी अशा पद्धतीचे धार्मिक कार्यक्रम सुरू असतात. मात्र, दीड दोन वर्षे हे कार्यक्रम बंद झाल्याने वारकरी समाज आणि त्याच्या कुटुंबांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासनाने कलावंतांसाठी मानधन सुरू केले आहे.

वारकरी समाजाचा कलावंत म्हणून सन्मान करावा आणि त्यांनाही मानधन मिळावे, अशा मागणीचे निवेदन चिपळूण तालुकाध्यक्ष शांताराम नवेले, चिपळूण तालुका सचिव राजेंद्र राजेशिर्के, बळीराम चाळके, दीपक साळवी, विश्वंभर चिले, चंद्रकांत पिळधनकर, प्रथमेश सावंत, राजेंद्र पवार, ज्ञानेश्वर मादगे, अनंत चव्हाण, मंगेश महाडिक, सुरेश बोलाडे, बारकू जावळे, प्रकाश कदम, दत्ताराम आयरे, आदीनाथ खापरे आदींनी तहसीलदार सूर्यवंशी यांना निवेदन दिले आहे.