शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

वारकरी समाजालाही कलावंत निधीचा सन्मान द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:36 IST

चिपळूण : भजन, कीर्तन आणि प्रवचन या माध्यमातून समाज प्रबोधन करणारा वारकरी समाज आज देशोधडीला लागला आहे. कलावंत आणि ...

चिपळूण : भजन, कीर्तन आणि प्रवचन या माध्यमातून समाज प्रबोधन करणारा वारकरी समाज आज देशोधडीला लागला आहे. कलावंत आणि त्यांची कुटुंब उपासमारीचा सामना करीत आहेत. वारकरी समाजाला जगवण्याचे काम करण्यासाठी कलावंत निधीचा सन्मान मिळवून देण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे वारकरी साहित्य परिषदेतर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात वारकरी समाजाने आपल्या भावनांचे निवेदन तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांना दिले.

कोरोनामुळे गत दीड दोन वर्षे समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम बंद आहेत, तर मंदिरे ही बंद असल्याने धार्मिक कार्यक्रमांवर बंदी आहे. त्यामुळे समाज प्रबोधन करणारा वारकरी समाज बेरोजगारीच्या खाईत लोटला गेला आहे. भजन, कीर्तन, प्रवचन या माध्यमातून कीर्तनकार, प्रवचनकार, विणेकरी, गायनाचार्य, मृदंगमनी असे सारे एकमेकांवर अवलंबून आहेत. मात्र, कोविडच्या नियमामुळे हे सर्व कार्यक्रम बंद आहेत. गावोगावी अशा पद्धतीचे धार्मिक कार्यक्रम सुरू असतात. मात्र, दीड दोन वर्षे हे कार्यक्रम बंद झाल्याने वारकरी समाज आणि त्याच्या कुटुंबांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासनाने कलावंतांसाठी मानधन सुरू केले आहे.

वारकरी समाजाचा कलावंत म्हणून सन्मान करावा आणि त्यांनाही मानधन मिळावे, अशा मागणीचे निवेदन चिपळूण तालुकाध्यक्ष शांताराम नवेले, चिपळूण तालुका सचिव राजेंद्र राजेशिर्के, बळीराम चाळके, दीपक साळवी, विश्वंभर चिले, चंद्रकांत पिळधनकर, प्रथमेश सावंत, राजेंद्र पवार, ज्ञानेश्वर मादगे, अनंत चव्हाण, मंगेश महाडिक, सुरेश बोलाडे, बारकू जावळे, प्रकाश कदम, दत्ताराम आयरे, आदीनाथ खापरे आदींनी तहसीलदार सूर्यवंशी यांना निवेदन दिले आहे.