शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाई असूनही टॅँकरची प्रतीक्षा

By admin | Updated: May 9, 2016 00:48 IST

रत्नागिरी तालुका : विहिरी, तलाव, नद्या, बंधाऱ्यातील पाणी आटले; काजळी नदीचे पात्र कोरडे

रहिम दलाल --रत्नागिरीतालुक्यातील विहिरी, तलाव आणि बंधाऱ्यांमधील पाणी आटल्याने पाण्यावाचून ग्रामस्थांचे हाल सुरू झाले आहेत. हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत असून, अनेक गावांमधील ग्रामस्थांवर टाहो फोडण्याची वेळ आली आहे. मात्र, प्रशासनाच्या टंचाईच्या व्याख्येमुळे टंचाई असताना ग्रामस्थांना पाण्याचा टँकर मिळत नसल्याची वस्तुस्थिती गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी तालुक्यात पाहावयास मिळत आहे. पावसाळ्याच्या दिवसात कितीही पाऊस पडला तरी उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. येथील जमिनीमध्ये पाणी धरुन ठेवण्याची क्षमता नाही. कारण येथील जमिनी जांभ्या दगडाची बनलेली असल्याने पावसाचे पाणी जमिनीवाटे नद्या, नाले, समुद्राला जाऊन मिळते. त्यामुळे पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होणे आवश्यक आहे. गेल्यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने यंदा तालुक्यात पाणीटंचाई उद्भवणार हे निश्चित होते. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही पंचायत समितीकडून तालुक्याचा टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला, तो शासनाकडून मंजूरही झालेला आहे. मात्र, हा आराखडा तयार करताना त्यामध्ये विंधन विहिरींचा समावेश करण्यात आलेला नाही. कारण या विहिरींची कामे जिल्हा नियोजन मंडळाकडून घेण्यात येणार आहेत. आराखड्यामध्ये पाणीटंचाई उद्भवणाऱ्या संभाव्य १७ गावांतील ३५ वाड्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये केवळ टंचाईग्रस्तांना टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी खर्च करण्यात येणार आहे. मात्र, नळपाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्तीचे एकही काम आराखड्यामध्ये घेण्यात आलेले नाही. त्यामुळे तालुक्यात एकही नळपाणी पुरवठा योजना नादुरुस्त नाही, हे विशेष आहे. रत्नागिरी शहरासह तालुक्यामध्ये अद्याप पाणीटंचाई सुरु झालेली नसल्याचे प्रशासनाकडून शासनाच्या टंचाईच्या निकषानुसार सांगण्यात येत आहे. मात्र, वस्तुस्थिती फार वेगळी आहे. आज अनेक गावांतील लोकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. तालुक्यात साखरतर, खेडशी, फणसोप, टिके, तरवळ बौध्दवाडी या गावांतील लोकांनी पंचायत समितीकडे पाण्याच्या टँकरची मागणी केलेली आहे. मात्र, प्रशासनाकडून टँकरने पाणी पुरवठा करण्यात आलेला नसल्याने लोकांवर पाणी, पाणी करण्याची वेळ आली आहे. प्रशासनाने तालुक्यातील टंचाईग्रस्तांसाठी दोन टँकर अधिग्रहण केले आहेत.हरचिरी मार्गावर असलेल्या टिके गावात पाणीटंचाई सुरू झाली आहे. त्यामुळे पाण्यासाठी लोकांचे हाल होत आहेत. येथील विहिरी भरण्यासाठी ग्रामस्थांना आठवडाभर प्रतीक्षा करावी लागत आहे. आठवडाभराच्या कालावधीमध्ये विहीर पाण्याने भरल्यानंतर लोकांना पाणी मिळते. टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा, अशी मागणी येथील लोकांनी १५ दिवसांपूर्वीच पंचायत समितीकडे केली आहे. मात्र, टंचाईच्या कक्षेत हे गाव बसत नसल्याने जिल्हा प्रशासन या गावाला टँकरच्या पाण्याचा पुरवठा करु शकत नसल्याने लोकांच्या डोळ्यातून पाणी येण्याची वेळ आली आहे.शहराजवळ असलेल्या साखरतर गावात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत असल्याने लोकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून येथे नळपाणी योजना राबवूनही आज तेथील लोकांना पाणी मिळत नसल्याने त्यांचे हाल होत आहेत. लोकांना टेम्पो, टँकरने पाणी मागवावे लागत आहे. त्यासाठी हजारो रुपये मोजावे लागतात. पाणी विकत घ्यावे लागत असले तरी हे किती दिवस चालणार, असा प्रश्न लोकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. निरूळ गावातील ठीकवाडी आणि लावगणवाडीला पाण्याची मोठी समस्या जाणवत आहे. या गावातून काजळी नदी जाते. मात्र, ही नदीही आटली आहे. या नदीवर लोकांनी बंधारे घातले होते. काजळी नदीचे पाणी आटल्याने संपूर्ण भाग ओसाड असल्याचे चित्र दिसत आहे. या नदीचे पाणी आटल्याने जनावरानाही पाणी मिळत नसल्याने त्यांची तडफड सुरु आहे. या वाड्यांमधील लोकांनी पिण्याच्या पाण्यासाठी आटलेल्या नदीतील झऱ्यालगत खड्डे खणून पाणी साठवले जाते. हे पाणी वाडग्याने खरवडून कळशी, हंडे भरून घरी आणले जाते. या हंडाभर पाण्यासाठीही महिलांची गर्दी केलेली असते. लावगणवाडीला विहीर मंजूर करुन ती खोदाईही करण्यात आली होती. मंजूर असलेल्या अनुदानातून विहिरीची खोदाई करण्यात आली होती. या विहिरीला पाणी लागलेले नाही. ही विहीर आणखी खोल खोदली असती तर पाणीही लागले असते. मात्र, मंजूर खर्चापेक्षा जास्त खर्च करू शकत नसल्याने या विहिरीचे काम बंद करण्यात आले. त्यानंतर ही विहीर पावसाळ्यात येणाऱ्या नदीच्या गाळाने ती बुजून गेली.