शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
2
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
3
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
4
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
5
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
6
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
7
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
8
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
9
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
10
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
11
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
12
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
13
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
14
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
15
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
16
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
17
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
18
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
19
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
20
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?

कामे पूर्ण होऊनही उद्घाटनाची प्रतीक्षाच

By admin | Updated: August 29, 2014 23:10 IST

सुविधा नाहीत : ३० अंगणवाड्यांच्या इमारती नामधारी

रहिम दलाल  रत्नागिरी/ जिल्ह्यातील ३० अंगणवाड्यांच्या इमारतींची कामे पूर्ण होऊनही त्या उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत. वीज कनेक्शन व पाणी कनेक्शन नसल्याने या अंगणवाड्यांच्या इमारती उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत़ जिल्ह्यात २२६२ अंगणवाड्या मंजूर आहेत़ त्यापैकी १३१२ अंगणवाड्यांना स्वत:च्या इमारती आहेत़, तर ९५० अंगणवाड्यांसाठी स्वत:च्या मालकीच्या इमारती नाहीत़ ग्रामीण भागामध्ये अंगणवाड्यांना गावकऱ्यांकडून जमीन मिळणे फार कठीण झाले आहे़ ग्रामीण भागातही जमिनीचे भाव वधारले आहेत़ त्यामुळे कोणीही जमीनमालक मोफत जागा देण्यास तयार होत नाही़ या अंगणवाड्यांतील मुले शाळा, मंदिरे आणि घरांच्या ओटीचा आसरा घेतात़ त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत तर इमारती नसल्याने त्या अंगणवाडी सेविकांना बालकांसाठी कसरत करावी लागते़  जिल्हा नियोजन मंडळाकडून अंगणवाड्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी देण्यात येतो़ मात्र, अंगणवाड्यांसाठी जागा मिळत नसल्याने हा निधी खर्चाविना पडून राहात असल्याने प्रशासनासमोर मोठा प्रश्न निर्माण होत आहे़ जिल्हा वार्षिक योजनेतून ३ कोटी ८२ लाख ५ हजार रुपये देण्यात आले. त्यातून ४० अंगणवाड्यांची बांधकामे करण्यात आली़ त्यानंतर अंगणवाड्यांच्या इमारतीसाठी ६० प्रस्ताव जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाकडे आले होते़ त्यापैकी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी ४१ अंगणवाड्यांसाठी २ कोटी ७६ लाख रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे़ ग्रामीण भागातील ४० अंगणवाड्यांच्या इमारतींची बांधकामे पूर्ण झाली आहेत़ मात्र, ही बांधकामे पूर्ण असतानाही त्यामध्ये अंगणवाड्या अजूनही सुरु करण्यात आलेल्या नाहीत़ कारण इमारती पूर्ण असल्या तरी त्यामध्ये आवश्यक असलेली बाब म्हणजे वीज आणि पाण्याची सोय अजूनही करण्यात आलेली नाही़ या इमारतींना वीजजोडणी आणि नळ कनेक्शन जोडण्याची आवश्यकता आहे़ त्यामुळे या अंगणवाड्यांच्या इमारती उद्घाटनाविना बंद ठेवण्यात आल्या आहेत़ त्याबाबत मागील स्थायी समितीच्या सभेतही या विषयी जोरदार चर्चा करण्यात आली होती़ या इमारती डिसेंबर, २०१४ पूर्वी महिला व बालकल्याण विभागाकडे हस्तांतरित कराव्या, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बांधकाम विभागाला दिल्या आहेत़