शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

अनलाॅकसाठी चाैथ्या टप्प्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : राज्यात कोविड रुग्णांची परिस्थिती वेगवेगळी आहे. प्रत्येक ठिकाणी पॉझिटिव्हिटी दर आणि ‘रुग्ण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : राज्यात कोविड रुग्णांची परिस्थिती वेगवेगळी आहे. प्रत्येक ठिकाणी पॉझिटिव्हिटी दर आणि ‘रुग्ण असलेले’ ऑक्सिजन बेड यांची संख्या वेगवेगळी असून, येत्या सोमवारपासून निर्बंध उठविण्याची प्रक्रिया सुरू करताना याच निकषांवर विविध पाच स्तरांमध्ये निर्बंध उठविण्यासंबंधी राज्य सरकारने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. त्यानुसार, रत्नागिरी जिल्ह्यात अनलाॅकची प्रक्रिया चौथ्या टप्प्यात सुरू होण्याची शक्यता आहे.

यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांना विविध प्रशासकीय घटकांमध्ये विभाजित करण्यात आले असून, अटी व शर्तींच्या अधिन राहून अनलॉक प्रक्रिया होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याची काेरोनाबाधित होण्याची टक्केवारी १७.८३ टक्के इतकी असून, ऑक्सिजनचे ८०० बेड सध्या भरलेले आहेत. यानुसार रत्नागिरी जिल्ह्यात अनलाॅकची प्रक्रिया चौथ्या टप्प्यात होणे अपेक्षित आहे. मात्र, शासनाने कोरोना परिस्थिती पाहून त्यानुसार जिल्हा प्रशासनाला अनलाॅकचेही अधिकार दिले आहेत. त्यामुळे या चाैथ्या टप्प्यात कुठले निर्बंध उठणार आणि कुठले राहणार, हे जिल्हा प्रशासनाच्या अधिकारानुसार अवलंबून राहणार आहे.

काय सुरु राहील?

आवश्यक वस्तूंची दुकाने, जीम, सलून, कृषी सेवा केवळ दुपारी चार वाजेपर्यंतच सुरू ठेवण्यात येतील.

उपहारगृहांची पार्सल किंवा घरपोच सेवा सुरू ठेवता येईल. आतमध्ये ग्राहकांना बसता येणार नाही.

सार्वजनिक ठिकाणे, पटांगणे, क्रीडा शनिवार, रविवारी बंद तर अन्य दिवशी सकाळी ५ ते ९ पर्यंत सुरू राहतील.

शासकीय, खासगी कार्यालये २५ टक्के तर उद्योग ५० टक्के क्षमतेवर सुरू राहतील.

विवाहासाठी २५ तर अंत्यसंस्कारासाठी २० व्यक्तींची मर्यादा कायम राहील.

काय बंद राहील?

आवश्यक नसलेल्या वस्तूंची दुकाने, आस्थापना, सिनेमागृहे, नाट्यगृहे, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, मनोरंजनाचे कार्यक्रम बंद राहणार आहेत. आठवड्याच्या शेवटी आणि आठवडाभर ये-जा करणे किंवा हालचालींवर पूर्णत: बंदी राहणार आहे. सार्वजनिक वाहतूक करताना उभे राहून प्रवास करण्यास बंदी राहील.

शासनाने पाच स्तरावर अनलाॅक प्रक्रिया होणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार सध्या रत्नागिरीत चौथ्या स्तरावर अनलाॅक हाेणे अपेक्षित आहे. मात्र, कोरोनाच्या अनुंषगाने जी स्थिती असेल त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यात अनलाॅक प्रक्रिया सुरू करावी लागेल.

- लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हाधिकारी, रत्नागिरी

ज्या जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांपेक्षा कमी आणि ऑक्सिजन बेड २५ टक्क्यांपेक्षा कमी भरलेले आहेत तिथे पहिल्या स्तरात अनलाॅक होईल.

ज्या जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांपेक्षा कमी आणि ऑक्सिजन बेड टक्केेवारी २५ ते ४० असेल त्या जिल्ह्यात दुसऱ्या स्तरावर निर्बध उठतील.

पॉझिटिव्हिटी दर पाच ते दहा टक्के असेल आणि ऑक्सिजन बेड ४० टक्क्यांपेक्षा जास्त असेल, अशा जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या स्तराप्रमाणे अनलाॅक होईल.

ज्या जिल्ह्यात पाॅझिटिव्हिटी दर १० ते २० टक्के दरम्यान असेल आणि ६० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त ऑक्सिजन बेड भरलेले असतील तर तिथे ४ थ्या स्तर लागू होईल

२० टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेट आणि ७५ टक्‍क्‍यांहून जास्त ऑक्सिजन बेड भरलेले असतील त्या जिल्ह्यात ५ व्या स्तराप्रमाणे निर्बंध रहातील.