शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

अनलाॅकसाठी चाैथ्या टप्प्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : राज्यात कोविड रुग्णांची परिस्थिती वेगवेगळी आहे. प्रत्येक ठिकाणी पॉझिटिव्हिटी दर आणि ‘रुग्ण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : राज्यात कोविड रुग्णांची परिस्थिती वेगवेगळी आहे. प्रत्येक ठिकाणी पॉझिटिव्हिटी दर आणि ‘रुग्ण असलेले’ ऑक्सिजन बेड यांची संख्या वेगवेगळी असून, येत्या सोमवारपासून निर्बंध उठविण्याची प्रक्रिया सुरू करताना याच निकषांवर विविध पाच स्तरांमध्ये निर्बंध उठविण्यासंबंधी राज्य सरकारने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. त्यानुसार, रत्नागिरी जिल्ह्यात अनलाॅकची प्रक्रिया चौथ्या टप्प्यात सुरू होण्याची शक्यता आहे.

यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांना विविध प्रशासकीय घटकांमध्ये विभाजित करण्यात आले असून, अटी व शर्तींच्या अधिन राहून अनलॉक प्रक्रिया होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याची काेरोनाबाधित होण्याची टक्केवारी १७.८३ टक्के इतकी असून, ऑक्सिजनचे ८०० बेड सध्या भरलेले आहेत. यानुसार रत्नागिरी जिल्ह्यात अनलाॅकची प्रक्रिया चौथ्या टप्प्यात होणे अपेक्षित आहे. मात्र, शासनाने कोरोना परिस्थिती पाहून त्यानुसार जिल्हा प्रशासनाला अनलाॅकचेही अधिकार दिले आहेत. त्यामुळे या चाैथ्या टप्प्यात कुठले निर्बंध उठणार आणि कुठले राहणार, हे जिल्हा प्रशासनाच्या अधिकारानुसार अवलंबून राहणार आहे.

काय सुरु राहील?

आवश्यक वस्तूंची दुकाने, जीम, सलून, कृषी सेवा केवळ दुपारी चार वाजेपर्यंतच सुरू ठेवण्यात येतील.

उपहारगृहांची पार्सल किंवा घरपोच सेवा सुरू ठेवता येईल. आतमध्ये ग्राहकांना बसता येणार नाही.

सार्वजनिक ठिकाणे, पटांगणे, क्रीडा शनिवार, रविवारी बंद तर अन्य दिवशी सकाळी ५ ते ९ पर्यंत सुरू राहतील.

शासकीय, खासगी कार्यालये २५ टक्के तर उद्योग ५० टक्के क्षमतेवर सुरू राहतील.

विवाहासाठी २५ तर अंत्यसंस्कारासाठी २० व्यक्तींची मर्यादा कायम राहील.

काय बंद राहील?

आवश्यक नसलेल्या वस्तूंची दुकाने, आस्थापना, सिनेमागृहे, नाट्यगृहे, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, मनोरंजनाचे कार्यक्रम बंद राहणार आहेत. आठवड्याच्या शेवटी आणि आठवडाभर ये-जा करणे किंवा हालचालींवर पूर्णत: बंदी राहणार आहे. सार्वजनिक वाहतूक करताना उभे राहून प्रवास करण्यास बंदी राहील.

शासनाने पाच स्तरावर अनलाॅक प्रक्रिया होणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार सध्या रत्नागिरीत चौथ्या स्तरावर अनलाॅक हाेणे अपेक्षित आहे. मात्र, कोरोनाच्या अनुंषगाने जी स्थिती असेल त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यात अनलाॅक प्रक्रिया सुरू करावी लागेल.

- लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हाधिकारी, रत्नागिरी

ज्या जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांपेक्षा कमी आणि ऑक्सिजन बेड २५ टक्क्यांपेक्षा कमी भरलेले आहेत तिथे पहिल्या स्तरात अनलाॅक होईल.

ज्या जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांपेक्षा कमी आणि ऑक्सिजन बेड टक्केेवारी २५ ते ४० असेल त्या जिल्ह्यात दुसऱ्या स्तरावर निर्बध उठतील.

पॉझिटिव्हिटी दर पाच ते दहा टक्के असेल आणि ऑक्सिजन बेड ४० टक्क्यांपेक्षा जास्त असेल, अशा जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या स्तराप्रमाणे अनलाॅक होईल.

ज्या जिल्ह्यात पाॅझिटिव्हिटी दर १० ते २० टक्के दरम्यान असेल आणि ६० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त ऑक्सिजन बेड भरलेले असतील तर तिथे ४ थ्या स्तर लागू होईल

२० टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेट आणि ७५ टक्‍क्‍यांहून जास्त ऑक्सिजन बेड भरलेले असतील त्या जिल्ह्यात ५ व्या स्तराप्रमाणे निर्बंध रहातील.