शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

वाडीबेलदार आजही डोलीतच

By admin | Updated: December 2, 2014 00:31 IST

दळणवळणाचे कोणतेही साधन नसलेल्या वाडीबेलदार येथील ग्रामस्थांच्या नशिबी आजही डोलीचा वापर कायम आहे़

खेड : खेड तालुक्यातील वाडीबेलदार येथील ग्रामस्थांची पायपीट आजही सुरूच आहे. पाणी पुरवठ्यासह इतर दैनंदिन मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या या ग्रामस्थांची स्वातंत्र्यानंतर आजही परवड सुरू आहे. बँक, पोस्ट आॅफीस आणि वैद्यकीय सेवेसाठी येथील लोकांना ८ किलोमीटर अंतरावर असलेल्या तळे येथील या सुविधांचा लाभ घ्यावा लागत आहे. दळणवळणाचे कोणतेही साधन नसलेल्या वाडीबेलदार येथील ग्रामस्थांच्या नशिबी आजही डोलीचा वापर कायम आहे़वाडीबेलदार हे सह्याद्रीच्या कपारीत वसलेले गाव आहे. जेमतेम २५० लोकवस्ती असलेले हे गाव़ महिपतगडाच्या पायथ्याशी वसलेले आहे. वाडीबेलदार, सुमारगड आणि महिपतगड हे छत्रपतींच्या पराक्रमांच्या आठवणींना उजाळा देणारे गड इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत़. याच महिपतगडाच्या पायथ्याशी असलेले वाडीबेलदार हे गाव. गावापासून महिपतगड १४०० मीटर उंचीवर आहे़ गुरे-ढोरे नेण्यासाठी डोंगरदऱ्यातूनच १२ किलोमीटरची पायपीट करावी लागते. इतके अंतर पायपीट केल्याशिवाय कोणतीही सुविधा मिळत नाही. वाहतुकीची कोणतीही साधने गावात नसल्याने अनेक आव्हानाना गावकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे. गेली अनेक वर्षे ही स्थिती असून, शासन दरबारी या वस्तीला अद्याप न्याय मिळालेला नाही. तेथील ग्रामस्थांना सहा किलोमीटर अंतरावरील जंगलमय भाग कापून तळे येथे जावे लागते. पाणीदेखील आठ दिवसातून एकदा उपलब्ध होत आहे़ येथील सेवानिवृत्तांना बँकेतील कामांसाठी तळे येथेच जावे लागते. येथे रहदारीसाठी डोली हे एकमेव साधन असून, तीच प्रथा गेले अनेक वर्षे सुरू आहे. या गावातील रस्त्यासाठी तीन कोटी रूपये मंजूर झाले आहेत.वाडीबेलदार गावापासून पारेश्वर (महिपतगड) स्थळापर्यंत १२ किलोमीटरचा रस्ता मंजूर करण्यात आला आहे़ याकरिता सुमारे ३ कोटी रूपये मंजूरही झाले आहेत. हे काम गेल्या आता पावसाळ्यानंतर सुरू होणार होते़ आता दुसरा पावसाळा संपला तरीही रस्त्याचे काम सुरू करण्यात आले नाही. खेड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन उपअभियंता कुयबा यांनी ही माहिती दिली होती़ वाडीबेलदार गावापासून पारेश्वर (महिपतगड) स्थळापर्यंतचा बारा किलोमीटर रस्ता मंजूर करण्यात करण्यात आला आहे़ मात्र, हे काम पावसाळ्यानंतर सुरू होणार असल्याची घोषणा हवेत विरली आहे. गेल्या अनेक वर्षांची मागणी असून, आता काही वर्षांनंतर पुन्हा रस्ता होईल, अशी आशा व्यक्त करण्यात आली होती. सध्या खेड तालुक्यातील अतिदुर्गम भागातील ही सोय महत्त्वाची असतानाही सरकारदरबारी याबाबत गांभिर्याने घेतले जात नाही. आता सरकार बदलले आहे. या ठिकाणी जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांमधून व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)वाडीबेलदारच्या वृध्दांची परवड, रस्ते नाहीत, पाणीही नाही. ८ किलोमीटरची पायपीट.खेड तालुक्याची स्थिती.वाडीबेलदार ग्रामस्थांची पायपीट. दुर्गम भागातील रस्ता दुरूस्तीसाठी निधीची आवश्यकता.