शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

वाडीबेलदार आजही डोलीतच

By admin | Updated: December 2, 2014 00:31 IST

दळणवळणाचे कोणतेही साधन नसलेल्या वाडीबेलदार येथील ग्रामस्थांच्या नशिबी आजही डोलीचा वापर कायम आहे़

खेड : खेड तालुक्यातील वाडीबेलदार येथील ग्रामस्थांची पायपीट आजही सुरूच आहे. पाणी पुरवठ्यासह इतर दैनंदिन मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या या ग्रामस्थांची स्वातंत्र्यानंतर आजही परवड सुरू आहे. बँक, पोस्ट आॅफीस आणि वैद्यकीय सेवेसाठी येथील लोकांना ८ किलोमीटर अंतरावर असलेल्या तळे येथील या सुविधांचा लाभ घ्यावा लागत आहे. दळणवळणाचे कोणतेही साधन नसलेल्या वाडीबेलदार येथील ग्रामस्थांच्या नशिबी आजही डोलीचा वापर कायम आहे़वाडीबेलदार हे सह्याद्रीच्या कपारीत वसलेले गाव आहे. जेमतेम २५० लोकवस्ती असलेले हे गाव़ महिपतगडाच्या पायथ्याशी वसलेले आहे. वाडीबेलदार, सुमारगड आणि महिपतगड हे छत्रपतींच्या पराक्रमांच्या आठवणींना उजाळा देणारे गड इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत़. याच महिपतगडाच्या पायथ्याशी असलेले वाडीबेलदार हे गाव. गावापासून महिपतगड १४०० मीटर उंचीवर आहे़ गुरे-ढोरे नेण्यासाठी डोंगरदऱ्यातूनच १२ किलोमीटरची पायपीट करावी लागते. इतके अंतर पायपीट केल्याशिवाय कोणतीही सुविधा मिळत नाही. वाहतुकीची कोणतीही साधने गावात नसल्याने अनेक आव्हानाना गावकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे. गेली अनेक वर्षे ही स्थिती असून, शासन दरबारी या वस्तीला अद्याप न्याय मिळालेला नाही. तेथील ग्रामस्थांना सहा किलोमीटर अंतरावरील जंगलमय भाग कापून तळे येथे जावे लागते. पाणीदेखील आठ दिवसातून एकदा उपलब्ध होत आहे़ येथील सेवानिवृत्तांना बँकेतील कामांसाठी तळे येथेच जावे लागते. येथे रहदारीसाठी डोली हे एकमेव साधन असून, तीच प्रथा गेले अनेक वर्षे सुरू आहे. या गावातील रस्त्यासाठी तीन कोटी रूपये मंजूर झाले आहेत.वाडीबेलदार गावापासून पारेश्वर (महिपतगड) स्थळापर्यंत १२ किलोमीटरचा रस्ता मंजूर करण्यात आला आहे़ याकरिता सुमारे ३ कोटी रूपये मंजूरही झाले आहेत. हे काम गेल्या आता पावसाळ्यानंतर सुरू होणार होते़ आता दुसरा पावसाळा संपला तरीही रस्त्याचे काम सुरू करण्यात आले नाही. खेड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन उपअभियंता कुयबा यांनी ही माहिती दिली होती़ वाडीबेलदार गावापासून पारेश्वर (महिपतगड) स्थळापर्यंतचा बारा किलोमीटर रस्ता मंजूर करण्यात करण्यात आला आहे़ मात्र, हे काम पावसाळ्यानंतर सुरू होणार असल्याची घोषणा हवेत विरली आहे. गेल्या अनेक वर्षांची मागणी असून, आता काही वर्षांनंतर पुन्हा रस्ता होईल, अशी आशा व्यक्त करण्यात आली होती. सध्या खेड तालुक्यातील अतिदुर्गम भागातील ही सोय महत्त्वाची असतानाही सरकारदरबारी याबाबत गांभिर्याने घेतले जात नाही. आता सरकार बदलले आहे. या ठिकाणी जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांमधून व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)वाडीबेलदारच्या वृध्दांची परवड, रस्ते नाहीत, पाणीही नाही. ८ किलोमीटरची पायपीट.खेड तालुक्याची स्थिती.वाडीबेलदार ग्रामस्थांची पायपीट. दुर्गम भागातील रस्ता दुरूस्तीसाठी निधीची आवश्यकता.