शहरं
Join us  
Trending Stories
1
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
2
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
3
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
4
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
5
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
6
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
7
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
8
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
9
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
10
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
11
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
12
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
13
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
14
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
15
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
16
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
17
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
18
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
19
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
20
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत

मतदारांच्या दारी, सुरू इच्छुकांची वारी

By admin | Updated: November 1, 2016 23:44 IST

जिल्हा परिषद, पंचायत समिती : सेना, भाजप, मनसेचे उमेदवार जोमात, दोन्ही काँग्रेस थंड

लांजा : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर शिवसेनेतील इच्छुकांनी आपले अर्ज पक्षाकडे दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. भाजप व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी गावागावात जाऊन मतदारांशी हितगूज साधत आहेत. मात्र, काँग्रेस - राष्ट्रवादीमध्ये वातावरण थंड असल्याने काँग्रेस, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रामवस्था निर्माण झाली आहे. पंचायत समिती व जिल्हा परिषदेवर सत्ता असणाऱ्या शिवसेनेकडे इच्छुकांची मोठ्या संख्येने गर्दी झाली आहे. काही कार्यकर्त्यांनी आपण इच्छुक असल्याचे अर्ज काही दिवसांपूर्वीच दिले आहेत. शिवसेनेत इच्छुकांची गर्दी होत असल्याने उमेदवारी कोणाला द्यायची आणि कोणाला डावलायचे याबाबतचा निर्णय घेताना मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे हा निर्णय केवळ पक्षप्रमुखच घेऊ शकतात. शिवसेनेत पक्षाचा ‘आदेश’ पाळला जातो. त्यामुळे उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडेल, हे आता सांगणे कठीण असले तरी इच्छुक उमेदवार आपल्याला संधी मिळण्याच्या दृष्टीने वरिष्ठांची मनधरणी करत आहेत. त्यामुळे इच्छुकांमध्ये चढाओढ लागलेली आहे. भाजप व मनसे यांनीही या निवडणुकीत आपली ताकद आजमावण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष यशवंत वाकडे, अनुसूचित सेलचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर तथा भाई जाधव यांनी लांजा तालुक्यात दौरे करून आपले मतदार वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातच कुणबी समाजाचे नेते सीताराम सांडम यांनीही भाजपमध्ये प्रवेश केल्याने भाजपला याचा मोठा फायदा होणार आहे. सध्यातरी भाजप नेते सर्व जागांवर निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने हालचाल करत आहे. मात्र, युती झाली तर आपला गण व गटामध्ये मोठी ताकद असलेल्या भागातच उमेदवारीची मागणी करणार असल्याचे कळते. कोणत्याही प्रकारे दगा फटका होऊ नये, यासाठी भाजप सर्वच जागांवर उमेदवार देणार असल्याचे समजते. लांजात मनसेची ताकद कमी आहे. मात्र, आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर मनसेचे तालुकाध्यक्ष प्रभाकर टाळे, जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ देवधेकर यांनी गावागावातील मनसेच्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन जनसंपर्क वाढवण्याकडे अधिक लक्ष दिले आहे. कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ दूर करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात आहे. मोजक्याच ठिकाणी उमेदवार देऊन त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न मनसेतर्फे केला जाणार आहे. काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होणार हे निश्चित असल्याचे आपल्या वाट्याला कोणता गण वा गट येतो, याकडे इच्छुकांचे लक्ष आहे. मात्र, दोन्ही पक्षांकडून अद्याप कोणतीही हालचाल सुरू नसल्याने कार्यकर्ते नाराज झालेले दिसून येतात. इंदिरा काँग्रेसचे तालुका नेतृत्व अग्रेसर नसल्याने कार्यकर्तेही थंड आहेत. गेल्या निवडणुकीत इंदिरा काँग्रेसने शिवसेनेला चांगलीच टक्कर दिली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी नसल्याने अवघ्या काही मतांनी सत्ता गमवावी लागली होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांची आघाडी असती तर आघाडीला चांगले यश मिळाले असते. मात्र, दोन्ही पक्षांची ताकद आजमावण्याच्या नादात झालेल्या पराभवाचे शल्य काँग्रेस - राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागले आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीत झालेली चूक सुधारण्याची एक संधी दोन्ही पक्षांकडे आली आहे. आरक्षण पडल्यानंतर निवडणुकीची गणिते सुरु झाली आहेत. परंतु काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसने आपले उमेदवार कोण, याची चाचपणी केली नसल्याने ऐनवेळी उमेदवार जाहीर केले तर घोळ होण्याची शक्यता आहे. उमेदवार प्रचारासाठी आपल्या गणात व गटात एवढ्या कमी कालावधीत कधी पोहोचणार, याचाही विचार होणे गरजेचे आहे. सध्या तरी दोन्ही काँग्रेसकडे संभाव्य उमेदवारांची यादी व निवडणुकीची व्यूहरचना केलेली नसल्याने दोन्ही काँग्रेसमध्ये वातावरण शांत आहे. (प्रतिनिधी) भास्कर जाधवांना डावलल्याने कार्यकर्ते बुचकाळ्यात निवडणुकीत शिवसेनेला टक्कर देणाऱ्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये कोणतीही राजकीय हालचाल अद्याप सुरु झालेली दिसून येत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित यशवंतराव हे लांजा तालुका राष्ट्रवादीचा कारभार मुंबईहून हाकत असल्याने कार्यकर्त्यांना वेळोवेळी मिळणारे मार्गदर्शन मिळत नाही. त्यामध्ये कोकणचे नेते म्हणून ज्यांची ओळख आहे, ते राष्ट्रवादीचे नेते, आमदार भास्कर जाधव यांना पक्षाने डावलल्याने अनेक कार्यकर्ते संभ्रमात आहेत.