शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

याेजनांबाबत ग्रामस्थांनी जागरूक व्हावे : अजय पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:37 IST

आरवली : ग्रामीण भाग हा देशाचा मुख्य कणा आहे. ग्रामीण भागात गाव विकासासाठी येणाऱ्या सरकारी योजना आणि आर्थिक निधीच्या ...

आरवली : ग्रामीण भाग हा देशाचा मुख्य कणा आहे. ग्रामीण भागात गाव विकासासाठी येणाऱ्या सरकारी योजना आणि आर्थिक निधीच्या नियोजनाबाबत गावातील ग्रामस्थांनी जागरूक व्हावे, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित व विधि कक्ष विभागाचे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष ॲड. अजय पाटील यांनी व्यक्त केले.

संगमेश्वर तालुक्यातील कोळंबे-सोनगिरी समन्वय युवा सामाजिक संघटनेतर्फे कोळंबे येथे मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. या शिबिरात मनसेचे जनहित व विधि कक्ष विभागाचे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष ॲड. अजय पाटील यांनी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.

हे शिबिर प्रशासकीय आणि ७/१२ वाचन, फेरफार आणि ग्रामपंचायत अधिनियम या विषयावर आयोजित करण्यात आले होते. अजय पाटील यांनी ग्रामपंचायत अधिनियमाबाबत मार्गदर्शन केले.

तसेच शेत जमिनीबाबत असणाऱ्या अनेक समस्या, कूळ कायदा, तलाठी व तहसीलदार यांच्यातर्फे लोकांची होणारी फसवणूक, त्यासाठी ७/१२ वाचन आणि फेरफार याबाबतही मार्गदर्शन केले. या शिबिरासाठी नावडी विभागातील ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.