शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
3
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
4
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
5
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
6
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
7
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
8
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
9
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
10
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
11
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
12
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
13
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
14
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
15
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
16
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
17
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
18
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
19
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
20
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान

गावातील कोरोना रुग्णांपासून ग्राम -वाडी कृती दल अनभिज्ञच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:20 IST

रत्नागिरी : गावात होणाऱ्या कोरोना चाचणीत पाॅझिटिव्ह आलेल्यांची नावे ग्राम कृती दल किंवा वाडी कृती दलाच्या प्रमुखांनाच कळविली जात ...

रत्नागिरी : गावात होणाऱ्या कोरोना चाचणीत पाॅझिटिव्ह आलेल्यांची नावे ग्राम कृती दल किंवा वाडी कृती दलाच्या प्रमुखांनाच कळविली जात नसल्याने गावांमध्ये या रुग्णांना विलगीकरणात किंवा रुग्णालयात दाखल करण्यास विलंब होत आहे. तसेच अहवाल उशिरा येत असल्याने या गावांमध्ये अशा व्यक्तींपासून संसर्ग वाढण्याचे प्रमाण वाढले आहे.

आरोग्य विभागाकडून चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. त्यामुळे आता बाधित समोर येऊ लागले आहेत. परंतु चाचण्या झाल्या तरी त्यांचे अहवाल उशिरा येत असल्याने या कालावधीत चाचणी केलेली व्यक्ती बाधित असेल तरीही तिचा अहवाल येण्यासाठी अनेक दिवस लागत असल्याने या कालावधीत ही व्यक्ती अनेक व्यक्तींच्या संपर्कात येत असल्याने संसर्ग वाढू लागला आहे. त्यातच गावातील बाधितांची नावे ग्राम किंवा वाडी कृती दल यांच्याकडे येतच नसल्याने आपल्या वाडीतील कोण कोण बाधित आहेत, हे त्यांना उशिरा कळते.

शासनाने आरोग्य यंत्रणेला कोरोनाच्या चाचण्यांची संख्या वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. चाचण्यांची संख्या वाढविल्याने बाधित कळू लागले आहेत. मात्र, हा अहवाल येण्यासाठी दोन - चार दिवस, काही वेळा अगदी आठवडाही जातो. कोरोना चाचणी केल्यानंतर ती व्यक्ती अहवाल येईपर्यंत विलगीकरणात राहणे अपेक्षित असते. मात्र, ज्यांच्यात सुरुवातीला लक्षणे दिसत नाहीत, किंवा सौम्य लक्षणे असलेल्या व्यक्तीही ॲंटिजेन किंवा आरटीपीसीआर चाचणी केल्यानंतर घरी विलगीकरणात न राहात अनेक ठिकाणी विनाकारण फिरत बसतात. त्यामुळे अशा व्यक्ती प्रत्यक्षात पाॅझिटिव्ह आल्यास ज्यांच्या संपर्कात या व्यक्ती जातात, त्यांनाही बाधित होण्याचा धोका असतो. अनेक गावांमध्ये सध्या हे प्रकार सुरू आहेत. त्यातच अशा व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल उशिरा आल्यास अशी व्यक्तीचा संपर्क अधिकच वाढतो.

तसेच चाचणीचा अहवाल येण्यास अनेक दिवस जातात. त्यानंतर आलेला अहवालही त्या त्या गावच्या कृती दलाचा प्रमुख असलेला सरपंच किंवा वाडीप्रमुख यांना जाणे गरजेचे आहे. मात्र, बाधितांच्या नावांची यादी ग्रामकृती दलाच्या प्रमुखाकडे जात नसल्याने आपल्या गावात किंवा वाडीत कोण कोण पाॅझिटिव्ह आलेत, याची माहितीच कृती दलाच्या प्रमुखाला नसते. त्यामुळे अशा लोकांच्या वावरण्यावर लक्ष ठेवता येत नाही किंवा विलगीकरणात तातडीने दाखल करता येत नाही. यामुळे ग्राम कृती दलांमध्येही तीव्र नाराजी आहे. सध्या अनेक गावांमध्ये कोेरोनाचा संसर्ग वाढण्यामागे ही महत्त्वाची कारणे आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाकडून प्रत्येक गावांमध्ये पाॅझिटिव्ह येणाऱ्या व्यक्तींच्या नावांची यादी पाठवायला हवी तरच कृती दल याबाबत खबरदारीची उपाययोजना करू शकेल, अशा प्रतिक्रिया गावांमधून व्यक्त होत आहे.

कोरोना चाचणी केल्यानंतर अहवाल लगेच मिळत नाही. तोपर्यंत चाचणी केलेली व्यक्ती गावात, वाडीत अनेक ठिकाणी फिरते. त्यामुळे जर ही व्यक्ती पाॅझिटिव्ह आली तर तिच्यापासून या इतर लोकांनाही बाधित होण्याचा धोका असतो. म्हणूनच गावच्या कृती दलाच्या प्रमुखाकडे यादी आली तर खबरदारीच्या दृष्टीने अशांना विलगीकरणात ठेवता येईल. तसेच चाचणी केल्यानंतर तिचा अहवालही लवकर मिळायला हवा.

- तानाजी कुळ्ये, जिल्हा संपर्क प्रमुख, बहुजन विकास आघाडी, रत्नागिरी