शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

गावातील कोरोना रुग्णांपासून ग्राम -वाडी कृती दल अनभिज्ञच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:20 IST

रत्नागिरी : गावात होणाऱ्या कोरोना चाचणीत पाॅझिटिव्ह आलेल्यांची नावे ग्राम कृती दल किंवा वाडी कृती दलाच्या प्रमुखांनाच कळविली जात ...

रत्नागिरी : गावात होणाऱ्या कोरोना चाचणीत पाॅझिटिव्ह आलेल्यांची नावे ग्राम कृती दल किंवा वाडी कृती दलाच्या प्रमुखांनाच कळविली जात नसल्याने गावांमध्ये या रुग्णांना विलगीकरणात किंवा रुग्णालयात दाखल करण्यास विलंब होत आहे. तसेच अहवाल उशिरा येत असल्याने या गावांमध्ये अशा व्यक्तींपासून संसर्ग वाढण्याचे प्रमाण वाढले आहे.

आरोग्य विभागाकडून चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. त्यामुळे आता बाधित समोर येऊ लागले आहेत. परंतु चाचण्या झाल्या तरी त्यांचे अहवाल उशिरा येत असल्याने या कालावधीत चाचणी केलेली व्यक्ती बाधित असेल तरीही तिचा अहवाल येण्यासाठी अनेक दिवस लागत असल्याने या कालावधीत ही व्यक्ती अनेक व्यक्तींच्या संपर्कात येत असल्याने संसर्ग वाढू लागला आहे. त्यातच गावातील बाधितांची नावे ग्राम किंवा वाडी कृती दल यांच्याकडे येतच नसल्याने आपल्या वाडीतील कोण कोण बाधित आहेत, हे त्यांना उशिरा कळते.

शासनाने आरोग्य यंत्रणेला कोरोनाच्या चाचण्यांची संख्या वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. चाचण्यांची संख्या वाढविल्याने बाधित कळू लागले आहेत. मात्र, हा अहवाल येण्यासाठी दोन - चार दिवस, काही वेळा अगदी आठवडाही जातो. कोरोना चाचणी केल्यानंतर ती व्यक्ती अहवाल येईपर्यंत विलगीकरणात राहणे अपेक्षित असते. मात्र, ज्यांच्यात सुरुवातीला लक्षणे दिसत नाहीत, किंवा सौम्य लक्षणे असलेल्या व्यक्तीही ॲंटिजेन किंवा आरटीपीसीआर चाचणी केल्यानंतर घरी विलगीकरणात न राहात अनेक ठिकाणी विनाकारण फिरत बसतात. त्यामुळे अशा व्यक्ती प्रत्यक्षात पाॅझिटिव्ह आल्यास ज्यांच्या संपर्कात या व्यक्ती जातात, त्यांनाही बाधित होण्याचा धोका असतो. अनेक गावांमध्ये सध्या हे प्रकार सुरू आहेत. त्यातच अशा व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल उशिरा आल्यास अशी व्यक्तीचा संपर्क अधिकच वाढतो.

तसेच चाचणीचा अहवाल येण्यास अनेक दिवस जातात. त्यानंतर आलेला अहवालही त्या त्या गावच्या कृती दलाचा प्रमुख असलेला सरपंच किंवा वाडीप्रमुख यांना जाणे गरजेचे आहे. मात्र, बाधितांच्या नावांची यादी ग्रामकृती दलाच्या प्रमुखाकडे जात नसल्याने आपल्या गावात किंवा वाडीत कोण कोण पाॅझिटिव्ह आलेत, याची माहितीच कृती दलाच्या प्रमुखाला नसते. त्यामुळे अशा लोकांच्या वावरण्यावर लक्ष ठेवता येत नाही किंवा विलगीकरणात तातडीने दाखल करता येत नाही. यामुळे ग्राम कृती दलांमध्येही तीव्र नाराजी आहे. सध्या अनेक गावांमध्ये कोेरोनाचा संसर्ग वाढण्यामागे ही महत्त्वाची कारणे आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाकडून प्रत्येक गावांमध्ये पाॅझिटिव्ह येणाऱ्या व्यक्तींच्या नावांची यादी पाठवायला हवी तरच कृती दल याबाबत खबरदारीची उपाययोजना करू शकेल, अशा प्रतिक्रिया गावांमधून व्यक्त होत आहे.

कोरोना चाचणी केल्यानंतर अहवाल लगेच मिळत नाही. तोपर्यंत चाचणी केलेली व्यक्ती गावात, वाडीत अनेक ठिकाणी फिरते. त्यामुळे जर ही व्यक्ती पाॅझिटिव्ह आली तर तिच्यापासून या इतर लोकांनाही बाधित होण्याचा धोका असतो. म्हणूनच गावच्या कृती दलाच्या प्रमुखाकडे यादी आली तर खबरदारीच्या दृष्टीने अशांना विलगीकरणात ठेवता येईल. तसेच चाचणी केल्यानंतर तिचा अहवालही लवकर मिळायला हवा.

- तानाजी कुळ्ये, जिल्हा संपर्क प्रमुख, बहुजन विकास आघाडी, रत्नागिरी