शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

गाव शांतता हेच तंटामुक्त समित्यांचे यश

By admin | Updated: October 13, 2014 23:03 IST

जबाबदारीची जाणीव : १६ हजार गावे तंटामुक्त

मेहरुन नाकाडे - रत्नागिरी गावातील तंटे गावात मिटवण्याबरोबर प्रतिबंधात्मक उपाययोजनांची जबाबदारी तंटामुक्त समित्यांकडे सोपवली आहे. या अभियानात सहभागी झालेल्या समित्या आपापली जबाबदारी चोख बजावत असल्याचे दिसून येत आहे. सध्या विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तप्त असले तरी पोलीस प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली गावातील शांतता अबाधित राहावी, यासाठी तंटामक्त समित्या खबरदारी घेत असल्याचे दिसून येत आहे.प्रलंबित तंट्यांचे प्रमाण व नव्याने निर्माण होणारे तंटे याचा विचार करता दुसरीकडे निकाली निघणाऱ्या तंट्यांचे प्रमाण अल्प आहे. तसेच गावातील शांतता अबाधित राहावी. ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन सामोपचाराने अंतर्गत वादविवादाचा निवाडा करावा व एकोपा राखावा, हाच मूळ उद्देश होता. अभियान राबविण्यात आल्यापासून राज्यात सुमारे १५ लाखांहून अधिक तंटे परस्पर सामोपचाराने मिटले. सुमारे १६ हजारांच्या आसपास गावे तंटामुक्त झाली आहेत. अभियानात प्रतिबंधात्मक उपायांची अंलबजावणी हा महत्वाचा भाग आहे. शासनाने एकूण दहा प्रकार निश्चित केले आहेत. त्यामध्ये उत्सव शांततेत व पोलीस बंदोबस्ताशिवाय साजरे करणे, जातीय व धार्मिक सलोखा राखणे, सार्वजनिक मालमत्तांचे विद्रुपीकरण होऊ न देणे, ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करणे, अवैध धंद्याचा बंदोबस्त, व्यसनमुक्ती, अनिष्ट प्रथा मोडीत काढणे, हुंडाबळी, सामाजिक सुरक्षा, राजकीय सामंजस्य, वैयक्तिक उपक्रम, नाविन्यपूर्ण कार्यक्रमांना समाविष्ट करण्यात आले आहे. गावातील शांततेला धोका निर्माण होऊ नये, शिवाय तंटे उद्भवू नयेत, यासाठी तंटामुक्त समित्या कार्यरत आहेत. सध्या निवडणुकामुळे राजकीय वातावरण तप्त आहे. विविध पक्षांची मंडळी आपापला प्रचार करीत आहेत. प्रत्येक कार्यकर्ता आपापल्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी सभा, कोपरा सभा यांचे आयोजन करीत आहे. परंतु गावातील तंटामुक्त समित्यांमुळे आतापर्यंत वातावरणील शांतता कायम असल्याचे दिसून येत आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनेला प्राधान्य देत तंटामुक्त समित्यांना शासनाने अधिकार दिल्यानेच वादविवादाच्या क्षणी वेळीच हस्तक्षेप करून समितीच्या सदस्यांनी निवडणूक कार्यक्रम निर्विघ्नपणे आणि वादविरहीत कसा पार पडेल, याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. ग्रामस्थांच्या सहकार्याने निवडणुकांचा कार्यक्रम शांततेत पार पाडावा, यासाठी समित्याही आपापल्या पातळीवर खबरदारी घेत आहेत. गावातील वाद मिटवून गावची प्रतिमा उंचावणे, या उदेशाने गावोगावच्या समित्या कार्यरत आहेत.