शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

गाव शांतता हेच तंटामुक्त समित्यांचे यश

By admin | Updated: October 13, 2014 23:03 IST

जबाबदारीची जाणीव : १६ हजार गावे तंटामुक्त

मेहरुन नाकाडे - रत्नागिरी गावातील तंटे गावात मिटवण्याबरोबर प्रतिबंधात्मक उपाययोजनांची जबाबदारी तंटामुक्त समित्यांकडे सोपवली आहे. या अभियानात सहभागी झालेल्या समित्या आपापली जबाबदारी चोख बजावत असल्याचे दिसून येत आहे. सध्या विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तप्त असले तरी पोलीस प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली गावातील शांतता अबाधित राहावी, यासाठी तंटामक्त समित्या खबरदारी घेत असल्याचे दिसून येत आहे.प्रलंबित तंट्यांचे प्रमाण व नव्याने निर्माण होणारे तंटे याचा विचार करता दुसरीकडे निकाली निघणाऱ्या तंट्यांचे प्रमाण अल्प आहे. तसेच गावातील शांतता अबाधित राहावी. ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन सामोपचाराने अंतर्गत वादविवादाचा निवाडा करावा व एकोपा राखावा, हाच मूळ उद्देश होता. अभियान राबविण्यात आल्यापासून राज्यात सुमारे १५ लाखांहून अधिक तंटे परस्पर सामोपचाराने मिटले. सुमारे १६ हजारांच्या आसपास गावे तंटामुक्त झाली आहेत. अभियानात प्रतिबंधात्मक उपायांची अंलबजावणी हा महत्वाचा भाग आहे. शासनाने एकूण दहा प्रकार निश्चित केले आहेत. त्यामध्ये उत्सव शांततेत व पोलीस बंदोबस्ताशिवाय साजरे करणे, जातीय व धार्मिक सलोखा राखणे, सार्वजनिक मालमत्तांचे विद्रुपीकरण होऊ न देणे, ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करणे, अवैध धंद्याचा बंदोबस्त, व्यसनमुक्ती, अनिष्ट प्रथा मोडीत काढणे, हुंडाबळी, सामाजिक सुरक्षा, राजकीय सामंजस्य, वैयक्तिक उपक्रम, नाविन्यपूर्ण कार्यक्रमांना समाविष्ट करण्यात आले आहे. गावातील शांततेला धोका निर्माण होऊ नये, शिवाय तंटे उद्भवू नयेत, यासाठी तंटामुक्त समित्या कार्यरत आहेत. सध्या निवडणुकामुळे राजकीय वातावरण तप्त आहे. विविध पक्षांची मंडळी आपापला प्रचार करीत आहेत. प्रत्येक कार्यकर्ता आपापल्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी सभा, कोपरा सभा यांचे आयोजन करीत आहे. परंतु गावातील तंटामुक्त समित्यांमुळे आतापर्यंत वातावरणील शांतता कायम असल्याचे दिसून येत आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनेला प्राधान्य देत तंटामुक्त समित्यांना शासनाने अधिकार दिल्यानेच वादविवादाच्या क्षणी वेळीच हस्तक्षेप करून समितीच्या सदस्यांनी निवडणूक कार्यक्रम निर्विघ्नपणे आणि वादविरहीत कसा पार पडेल, याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. ग्रामस्थांच्या सहकार्याने निवडणुकांचा कार्यक्रम शांततेत पार पाडावा, यासाठी समित्याही आपापल्या पातळीवर खबरदारी घेत आहेत. गावातील वाद मिटवून गावची प्रतिमा उंचावणे, या उदेशाने गावोगावच्या समित्या कार्यरत आहेत.