शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी येत नाही अन् बोलणार पण नाही" असं म्हणणाऱ्या भोजपुरी अभिनेता पवन सिंहचा भाजपात प्रवेश
2
फिलीपीन्समध्ये भयानक भूकंप: ६.९ तीव्रतेचा धक्का, ६० जणांचा मृत्यू, इमारती कोसळल्या
3
मी आठ युद्धे थांबवली, नोबेल न मिळाल्यास..; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
4
फेरारी कार नाही, फेरारी कंपनीच्या मालकीवरून आई-मुलगा पुन्हा आमनेसामने; आजोबांचे नवे मृत्यूपत्र समोर आले अन्...
5
आम्हाला अजूनही अटकेच्या आदेशाची प्रत मिळाली नाही; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचा दावा
6
Video - "एक, दोन रुपये तरी द्या..."; इन्फ्लुएन्सर iPhone 17 Pro Max घेण्यासाठी मागतेय डोनेशन
7
कोण आहेत आशीष पांडे आणि कल्याण कुमार? मोदी सरकारनं 'या' पदावर केली नियुक्ती
8
RBI MPC Policy Live: दिवाळीत कर्ज महागच! EMI कमी होण्याची वाट पाहणाऱ्यांचा भ्रमनिरास; रेपो दर 'जैसे थे'
9
मूर्ती लहान पण कीर्ती महान! पुन्हा एकदा वैभव सूर्यवंशीची बॅट तळपली; ऑस्ट्रेलियाविरुद्ध विक्रमी शतक
10
Zubeen Garg : "७ दिवसांत बाहेर येईल मृत्यूमागचं सत्य"; सिंगर झुबीन गर्गच्या पत्नीच्या संशयावरुन मॅनेजरला अटक
11
Asia Cup 2025: ' ट्रॉफी पाहिजे तर...',  बैठकीतील राड्यानंतर एसीसी अध्यक्ष नक्वी तयार, पण आता ठेवली नवीनच अट...
12
७५ वर्षाचा नवरदेव अन् ३५ वर्षाची नवरी; लग्नाच्या रात्रीच वृद्ध पतीचा मृत्यू, घातपाताचा संशय
13
AUS W vs NZ W, ICC Women’s World Cup 2025, Live Streaming : न्यूझीलंडसमोर ऑस्ट्रेलियाचे तगडे आव्हान, कारण...
14
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शेतकऱ्यांकडूनची वसूली, ऊसासाठी प्रतिटन १५ रुपये कपात; राजू शेट्टींचा हल्लाबोल
15
"माझ्या वडिलांचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...", 'बिग बॉस'च्या घरात अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली- "मी त्यांना..."
16
बनावट नोटाचा 'बाजार'; कोणत्या राज्यात सर्वाधिक छपाई, महाराष्ट्र कोणत्या गुन्ह्यांमध्ये पहिला?
17
आजपासून UPI पेमेंटचं महत्त्वाचं फीचर बंद; आता थेट पैसे मागता येणार नाहीत!
18
Sonam Kapoor Pregnant: दुसऱ्यांदा आई होणार सोनम कपूर? 'वायू'च्या जन्मानंतर कुटुंबात पुन्हा चिमुकल्या पाहुण्याची चाहुल
19
अनिल देशमुखांवर झालेला 'तो' हल्ला बनावट; पोलिसांच्या बी समरी रिपोर्टमधून धक्कादायक दावा
20
1 October 2025 Rules Change: रेल्वे तिकीट बुकिंगपासून ते UPI पेमेंट पर्यंत, आजपासून झाले 'हे' महत्त्वाचे ८ बदल

गाव शांतता हेच तंटामुक्त समित्यांचे यश

By admin | Updated: October 13, 2014 23:03 IST

जबाबदारीची जाणीव : १६ हजार गावे तंटामुक्त

मेहरुन नाकाडे - रत्नागिरी गावातील तंटे गावात मिटवण्याबरोबर प्रतिबंधात्मक उपाययोजनांची जबाबदारी तंटामुक्त समित्यांकडे सोपवली आहे. या अभियानात सहभागी झालेल्या समित्या आपापली जबाबदारी चोख बजावत असल्याचे दिसून येत आहे. सध्या विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तप्त असले तरी पोलीस प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली गावातील शांतता अबाधित राहावी, यासाठी तंटामक्त समित्या खबरदारी घेत असल्याचे दिसून येत आहे.प्रलंबित तंट्यांचे प्रमाण व नव्याने निर्माण होणारे तंटे याचा विचार करता दुसरीकडे निकाली निघणाऱ्या तंट्यांचे प्रमाण अल्प आहे. तसेच गावातील शांतता अबाधित राहावी. ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन सामोपचाराने अंतर्गत वादविवादाचा निवाडा करावा व एकोपा राखावा, हाच मूळ उद्देश होता. अभियान राबविण्यात आल्यापासून राज्यात सुमारे १५ लाखांहून अधिक तंटे परस्पर सामोपचाराने मिटले. सुमारे १६ हजारांच्या आसपास गावे तंटामुक्त झाली आहेत. अभियानात प्रतिबंधात्मक उपायांची अंलबजावणी हा महत्वाचा भाग आहे. शासनाने एकूण दहा प्रकार निश्चित केले आहेत. त्यामध्ये उत्सव शांततेत व पोलीस बंदोबस्ताशिवाय साजरे करणे, जातीय व धार्मिक सलोखा राखणे, सार्वजनिक मालमत्तांचे विद्रुपीकरण होऊ न देणे, ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करणे, अवैध धंद्याचा बंदोबस्त, व्यसनमुक्ती, अनिष्ट प्रथा मोडीत काढणे, हुंडाबळी, सामाजिक सुरक्षा, राजकीय सामंजस्य, वैयक्तिक उपक्रम, नाविन्यपूर्ण कार्यक्रमांना समाविष्ट करण्यात आले आहे. गावातील शांततेला धोका निर्माण होऊ नये, शिवाय तंटे उद्भवू नयेत, यासाठी तंटामुक्त समित्या कार्यरत आहेत. सध्या निवडणुकामुळे राजकीय वातावरण तप्त आहे. विविध पक्षांची मंडळी आपापला प्रचार करीत आहेत. प्रत्येक कार्यकर्ता आपापल्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी सभा, कोपरा सभा यांचे आयोजन करीत आहे. परंतु गावातील तंटामुक्त समित्यांमुळे आतापर्यंत वातावरणील शांतता कायम असल्याचे दिसून येत आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनेला प्राधान्य देत तंटामुक्त समित्यांना शासनाने अधिकार दिल्यानेच वादविवादाच्या क्षणी वेळीच हस्तक्षेप करून समितीच्या सदस्यांनी निवडणूक कार्यक्रम निर्विघ्नपणे आणि वादविरहीत कसा पार पडेल, याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. ग्रामस्थांच्या सहकार्याने निवडणुकांचा कार्यक्रम शांततेत पार पाडावा, यासाठी समित्याही आपापल्या पातळीवर खबरदारी घेत आहेत. गावातील वाद मिटवून गावची प्रतिमा उंचावणे, या उदेशाने गावोगावच्या समित्या कार्यरत आहेत.