शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

असुर्डे गावाने एकजुटीने नाम फाउंडेशनच्या सहकार्याने केली पाणी समस्येवर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाउंडेशनने जिल्ह्यातील विकासकामासाठी मुहूर्तमेढ रोवली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाउंडेशनने जिल्ह्यातील विकासकामासाठी मुहूर्तमेढ रोवली ती संगमेश्वर तालुक्यातील असुर्डे या गावात. ग्रामस्थांची विकासासाठी एकजूट असेल तर अगदी प्रतिकूल परिस्थितीतही मार्ग निघतो, हे या गावकऱ्यांनी नाम फाउंडेशनच्या सहकार्याने दाखवून दिले आहे. एवढेच नव्हे तर १२० कुटुंबांच्या श्रमदानाने तसेच अगदी मुंबईत नमन, नाटकांचे प्रयोग करून अखेर पाणीप्रश्नावर मात केली आहे.

संगमेश्वर तालुक्यातील मौजे असुर्डे गाव. एप्रिल-मे महिन्यांत येथील १२० कुटुंबांची पाण्यासाठी दरवर्षीच फरफट व्हायची. पाऊस सुरू होईपर्यंत ग्रामस्थांची परवड व्हायची. पाण्यासाठी होणारी पायपीट थांबावी, या उद्देशाने येथील ग्रामस्थांनी नाम फाउंडेशनचे विभागप्रमुख समीर जानवलकर, संगमेश्वर तालुका भगवंतसिंह चुंडावत यांच्याशी संपर्क साधला. नाम फाउंडेशनने या ग्रामस्थांची श्रमदान करण्याची तयारी पाहून लागलीच होकार दिला. ग्रामस्थ आणि नामच्या सहकार्याने गावातील पऱ्याची उंची आणि खोली वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी नाम फाउंडेशनने पाच लाख रुपयांचा आराखडा तयार केला होता.

निधी उभारणे हे मोठे आव्हान या ग्रामस्थांसमोर होते. तरीही उमेद न हरता तत्कालीन सरपंच लावण्या कानसरे, उपसरपंच संतोष पाताडे, सखाराम जोशी, कमलाकर मसूरकर, रामचंद्र कुळ्ये, अनंत लाड, प्रमोद मनवे यांच्यासह सर्वच ग्रामस्थ पाणीप्रश्नासाठी एकवटले. प्रत्येक घराने २०० रुपये वर्गणी काढण्याचा निर्णय घेण्यात आला. या कामासाठी मुंबईत नमन, नाटकाचे प्रयोग लावले. असे एक लाख रुपयांचे शिवधनुष्य पेलले. यासाठी मुंबईच्या महालक्ष्मी ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष वसंत मनवे, मंगेश पाताडे, अशोक तांबे, आदींचे योगदान महत्त्वाचे होते आणि मग नाम फाउंडेशनने उपलब्ध करून दिलेल्या मशिनरीच्या साहाय्याने कामाला सुरुवात झाली. पऱ्यातील गाळ उपसा करण्यासाठी जाणाऱ्या जेसीबी, आदी मशिनरीसाठी रस्त्याची गरज होती. मात्र, रस्ता रुंदीकरणासाठी गावातील शांताराम मनवे, जानू शिवगण, तुकाराम पाताडे, लक्ष्मण मनवे, नथुराम मनवे, आदी ग्रामस्थ आपली जमीन देण्यासाठी पुढे आले. ‘नाम’च्या सहकार्याने आणि ग्रामस्थांच्या श्रमदानाने या पऱ्यातील गाळ उपसा करून खोली व उंची वाढविण्यात आली. या पऱ्यातील अंदाजे १६०० क्युबिक मीटर इतर गाळ उपसा झाला. त्यामुळे साधारण १६ लाख लिटर पाणीसाठा होऊ लागला आहे.

ग्रामस्थांच्या एकजुटीने आणि नाम संस्थेच्या सहकार्याने असुर्डे गावच्या १२० कुटुंबांचा पाण्याचा प्रश्न सोडविला आहे. गावात एकजूट असेल तर कुठलीही समस्या सुटते, याची प्रचिती या गावाने दिली आहे.