शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी विक्रांत जाधव यांचे नाव आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:29 IST

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी विक्रांत जाधव यांचे नाव आघाडीवर असले तरी आण्णा कदम, बाळ जाधव आणि उदय बने ...

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी विक्रांत जाधव यांचे नाव आघाडीवर असले तरी आण्णा कदम, बाळ जाधव आणि उदय बने यांच्या नावाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. सोमवारी होणाऱ्या अध्यक्ष आणि सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी अनेकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

रत्नागिरी जिल्हा परिषदेवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. या ५५ पैकी ३९ सदस्य शिवसेनेचे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे १५ सदस्य आहेत; मात्र मागील विधानसभा निवडणुकीतील घडामोडींमुळे राष्ट्रवादीचे आमदार भास्कर समर्थक ६ सदस्य आहेत. हे राष्ट्रवादीचे सदस्य शिवसेनेबरोबर आहेत.

जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, शिक्षण सभापती सुनील मोरे, समाजकल्याण सभापती ऋतुजा जाधव, बांधकाम व आरोग्य सभापती महेश म्हाप, महिला व बालकल्याण सभापती रजनी चिंगळे यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिल्यानंतर ही पदाधिकाऱ्यांची निवडणूक होत आहे.

आमदार भास्कर जाधव हे शिवसेनेचे असले तरी त्यांचे समर्थक आजही जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. त्यामध्ये त्यांचे सुपुत्र विक्रांत जाधव हे राष्ट्रवादीचे गटनेते आहेत; मात्र आता जिल्ह्यातील राजकीय गणिते पाहता आमदार जाधव यांच्या शिवसेनेच्या पदार्पणामुळे जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी खिळखिळी झाली आहे. त्यामुळे शिवसेनेला कोणी विरोधकच राहिलेला नाही. आण्णा कदम, बाळ जाधव आणि उदय बने इच्छुक असले तरी यंदा चिपळूण-गुहागर विधानसभा मतदार संघाला अध्यक्षपद जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

गुहागर पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीची सत्ता होती. त्यामुळे यापूर्वी गुहागर तालुक्याचे सभापतीपद राष्ट्रवादीकडे होते; मात्र आमदार भास्कर जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर गुहागरमधील राजकीय गणिते बदलली आहेत. कारण राष्ट्रवादीचे सदस्य जास्त असले तरी तेथे शिवसेनेला सभापतीपद बहाल करण्यात आले. केवळ आमदार भास्कर जाधव यांच्यामुळेच गुहागर पंचायत समिती शिवसेनेकडे आली. त्यामुळे गुहागर पंचायत समितीतील बदलते राजकीय वारे पाहता जिल्हा परिषदेमध्ये तसा बदल होऊ शकतो. त्यामुळे इतर कोणी अध्यक्षपदासाठी इच्छुक असले तरी विक्रांत जाधव यांना अध्यक्षपदाची संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

चौकट

रत्नागिरीला कमी संधी

रत्नागिरी, लांजा आणि संगमेश्वरला यापूर्वी अध्यक्षपद शिवसेनेकडून देण्यात आलेले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदाची संधी रत्नागिरीला मिळण्याची शक्यता कमी आहे, अशी चर्चा शिवसेनेच्या गोटात सुरू आहे; मात्र रत्नागिरीला जिल्हा परिषदेत सभापती पद मिळणार, हे निश्चित आहे.