शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

अजगराला जाळून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचे आले अंगाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:22 IST

रत्नागिरी : कोंबडीला खाणाऱ्या अजगराला मारून त्याला अर्धवट जाळला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. ही घटना वनविभागाला ...

रत्नागिरी : कोंबडीला खाणाऱ्या अजगराला मारून त्याला अर्धवट जाळला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. ही घटना वनविभागाला कळताच याप्रकरणी नाटे पडवणेवाडी येथील तिघांना वनविभागाने बुधवारी ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली.

नाटे पडवणेवाडी (ता. राजापूर) येथील विजय पारकर (५३ वर्षे), वंदना पारकर (४४ वर्षे) आणि मानसी पारकर (२७ वर्षे) यांनी बुधवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अजगराला कोंबडीला खाताना पाहिले. त्यांनी या अजगराला लोखंडी कावरच्या साहाय्याने मारले. त्यानंतर नारळाच्या झावळाच्या साहाय्याने त्याला जाळले. या घटनेचा त्यांनी व्हिडीओही केला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला. अर्धवट जाळलेल्या या अजगराला आणि कोंबडीला जवळच्या ओढ्याजवळ नेऊन टाकले.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओचा आधार घेत बुधवार, २३ रोजी रत्नागिरी परिक्षेत्राच्या वन अधिकारी प्रियंका लगड यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत नाटे पैकी पडवणेवाडी येथे जाऊन पाहणी करून घटनेचा शहानिशा केला. या आराेपींनी गुन्हा कबूल केला आहे. वनविभागाने अर्धवट जाळलेला अजगर ताब्यात घेऊन राजापूरचे पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून शवविच्छेदन करून घेऊन त्याचे शव नष्ट करण्यात आले. या तीनही आरोपींना वनविभागाने ताब्यात घेतले आहे. पुढील तपास चालू आहे.

ही कार्यवाही मुख्य वनसंरक्षक (प्रा.) कोल्हापूर व्ही क्लेमेट बेन, विभागीय वन अधिकारी (चिपळूण) दीपक खाडे व सहायक वनसंरक्षक (प्रा.) रत्नागिरी (चिपळूण) सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी परिक्षेत्राच्या वन अधिकारी प्रियंका लगड, राजापूर वनपाल सदानंद घाटगे, वनरक्षक सागर गोसावी, वनरक्षक सागर पताडे, वनरक्षक वनउपज तपासणी नाका साखरपा संजय रणधीर यांनी कार्यवाही पार पाडली.

वन्यजीव अधिनियम १९७२ अंतर्गत अजगर किंवा वन्यजीवांची शिकार किंवा मारणे कायद्याने गुन्हा आहे. या कायद्याअंतर्गत ३ वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा किंवा २५००० रुपये. दंड किंवा दोन्ही अशी तरतूद आहे. त्यामुळे वन्यप्राणी मनुष्यवस्तीनजीक आल्यास किंवा संकटात सापडल्यास त्यासंबंधी वनविभागास तत्काळ कळविणेत यावे, असे आवाहन वनविभाग रत्नागिरी (चिपळूण) यांनी केले आहे.