शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

वेतोशीत तीन दिवस एस. टी.ची पाठ

By admin | Updated: July 23, 2014 21:54 IST

महामंडळाचा मुजोरपणा : विद्यार्थ्यांची शाळेला दांडी

रत्नागिरी : गेल्या तीन - चार दिवसांपासून वेतोशी गावात एस. टी. येत नसल्याने येथील ग्रामस्थांचे हाल होत आहेत. एस. टी. आली नसल्याने शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दांडी मारावी लागली. एस. टी. प्रशासनाच्या गलथान कारभाराचा फटका विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना बसला आहे. रत्नागिरी बसस्थानकातून मजगावमार्गे दररोज सकाळी ६.३० वाजता वेतोशी गाडी सोडण्यात येते. त्यामुळे वेतोशीतून रत्नागिरीकडे येणाऱ्या विद्यार्थी, नोकरदारांना या गाडीचा फायदा होतो. मात्र, गेले तीन दिवस ही एस. टी. सोडण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थी व नोकरदारवर्गाचे पुरते हाल झाले आहेत. एस. टी. न आल्यामुळे प्रवाशांकडून एस. टी. स्थानकात दूरध्वनीवरून संपर्क साधण्यात आला असता, उत्तर न देता फोन उचलून चक्क बाजूल ठेवण्यात येतो. समर्पक उत्तर देण्यात येत नसल्यामुळे प्रवासीवर्गातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. वेतोशीमधून शाळा, महाविद्यालयाला येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ४५ ते ५० इतकी आहे. शिवाय सकाळी कामावर येणारा नोकरवर्गही अधिक आहे. सकाळी एस. टी. फुल्ल भरून धावत असते. गाडी न आल्यामुळे बस मिळवण्यासाठी कोतवडेपर्यंत पाच किलोमीटर अंतर पायी तुडवावे लागते. किंवा करबुडे गाडीसाठी वेतोशी धारेपर्यंत चालत जावे लागते. त्यामुळे विद्यार्थी शाळा, महाविद्यालयांत पोहोचू शकत नाहीत. तसेच कर्मचाऱ्यांना कामावर वेळेत पोहोचता येत नसल्यामुळे ‘लेट मार्क’ पडत आहे.वेतोशी ग्रामस्थांतर्फे वेळोवेळी एस. टी. प्रशासनाकडे निवेदन देऊन गाडी वेळेवर सोडविण्याची मागणी करण्यात आली आहे. त्याला एस. टी. प्रशासन वाटाण्याच्या अक्षता दाखवत असल्याचे निदर्शनास येत आहे. (प्रतिनिधी)-एस. टी. महामंडळाच्या गलथान कारभाराचा विद्यार्थी, ग्रामस्थांना फटका.-ग्रामस्थांच्या मागणीला एस. टी.कडून वाटाण्याच्या अक्षता.-प्रवाशांनी बसस्थानकात संपर्क साधला असता दूरध्वनी उचलून बाजूला ठेवण्यात येत असल्याचा आरोप.-शाळा, महाविद्यालयातील ४५ ते ५० विद्यार्थ्यांना फटका.