शहरं
Join us  
Trending Stories
1
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
2
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
3
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
4
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
5
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
6
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
7
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
8
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
9
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
10
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
11
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
12
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
13
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
14
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
15
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
16
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
17
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
18
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
19
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
20
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं

वेतोशीत तीन दिवस एस. टी.ची पाठ

By admin | Updated: July 23, 2014 21:54 IST

महामंडळाचा मुजोरपणा : विद्यार्थ्यांची शाळेला दांडी

रत्नागिरी : गेल्या तीन - चार दिवसांपासून वेतोशी गावात एस. टी. येत नसल्याने येथील ग्रामस्थांचे हाल होत आहेत. एस. टी. आली नसल्याने शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दांडी मारावी लागली. एस. टी. प्रशासनाच्या गलथान कारभाराचा फटका विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना बसला आहे. रत्नागिरी बसस्थानकातून मजगावमार्गे दररोज सकाळी ६.३० वाजता वेतोशी गाडी सोडण्यात येते. त्यामुळे वेतोशीतून रत्नागिरीकडे येणाऱ्या विद्यार्थी, नोकरदारांना या गाडीचा फायदा होतो. मात्र, गेले तीन दिवस ही एस. टी. सोडण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थी व नोकरदारवर्गाचे पुरते हाल झाले आहेत. एस. टी. न आल्यामुळे प्रवाशांकडून एस. टी. स्थानकात दूरध्वनीवरून संपर्क साधण्यात आला असता, उत्तर न देता फोन उचलून चक्क बाजूल ठेवण्यात येतो. समर्पक उत्तर देण्यात येत नसल्यामुळे प्रवासीवर्गातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. वेतोशीमधून शाळा, महाविद्यालयाला येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ४५ ते ५० इतकी आहे. शिवाय सकाळी कामावर येणारा नोकरवर्गही अधिक आहे. सकाळी एस. टी. फुल्ल भरून धावत असते. गाडी न आल्यामुळे बस मिळवण्यासाठी कोतवडेपर्यंत पाच किलोमीटर अंतर पायी तुडवावे लागते. किंवा करबुडे गाडीसाठी वेतोशी धारेपर्यंत चालत जावे लागते. त्यामुळे विद्यार्थी शाळा, महाविद्यालयांत पोहोचू शकत नाहीत. तसेच कर्मचाऱ्यांना कामावर वेळेत पोहोचता येत नसल्यामुळे ‘लेट मार्क’ पडत आहे.वेतोशी ग्रामस्थांतर्फे वेळोवेळी एस. टी. प्रशासनाकडे निवेदन देऊन गाडी वेळेवर सोडविण्याची मागणी करण्यात आली आहे. त्याला एस. टी. प्रशासन वाटाण्याच्या अक्षता दाखवत असल्याचे निदर्शनास येत आहे. (प्रतिनिधी)-एस. टी. महामंडळाच्या गलथान कारभाराचा विद्यार्थी, ग्रामस्थांना फटका.-ग्रामस्थांच्या मागणीला एस. टी.कडून वाटाण्याच्या अक्षता.-प्रवाशांनी बसस्थानकात संपर्क साधला असता दूरध्वनी उचलून बाजूला ठेवण्यात येत असल्याचा आरोप.-शाळा, महाविद्यालयातील ४५ ते ५० विद्यार्थ्यांना फटका.