शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
3
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
4
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
5
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
6
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
7
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
8
Travel : मन मोहून टाकतील असे भारतातील 'हिडन' हिल स्टेशन्स; ९०% लोकांना या जागांबद्दल माहितीच नाही!
9
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
10
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
11
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
12
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
13
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
14
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
15
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
16
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
17
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
18
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
19
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
20
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!

वेतोशीत तीन दिवस एस. टी.ची पाठ

By admin | Updated: July 23, 2014 21:54 IST

महामंडळाचा मुजोरपणा : विद्यार्थ्यांची शाळेला दांडी

रत्नागिरी : गेल्या तीन - चार दिवसांपासून वेतोशी गावात एस. टी. येत नसल्याने येथील ग्रामस्थांचे हाल होत आहेत. एस. टी. आली नसल्याने शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दांडी मारावी लागली. एस. टी. प्रशासनाच्या गलथान कारभाराचा फटका विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना बसला आहे. रत्नागिरी बसस्थानकातून मजगावमार्गे दररोज सकाळी ६.३० वाजता वेतोशी गाडी सोडण्यात येते. त्यामुळे वेतोशीतून रत्नागिरीकडे येणाऱ्या विद्यार्थी, नोकरदारांना या गाडीचा फायदा होतो. मात्र, गेले तीन दिवस ही एस. टी. सोडण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थी व नोकरदारवर्गाचे पुरते हाल झाले आहेत. एस. टी. न आल्यामुळे प्रवाशांकडून एस. टी. स्थानकात दूरध्वनीवरून संपर्क साधण्यात आला असता, उत्तर न देता फोन उचलून चक्क बाजूल ठेवण्यात येतो. समर्पक उत्तर देण्यात येत नसल्यामुळे प्रवासीवर्गातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. वेतोशीमधून शाळा, महाविद्यालयाला येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ४५ ते ५० इतकी आहे. शिवाय सकाळी कामावर येणारा नोकरवर्गही अधिक आहे. सकाळी एस. टी. फुल्ल भरून धावत असते. गाडी न आल्यामुळे बस मिळवण्यासाठी कोतवडेपर्यंत पाच किलोमीटर अंतर पायी तुडवावे लागते. किंवा करबुडे गाडीसाठी वेतोशी धारेपर्यंत चालत जावे लागते. त्यामुळे विद्यार्थी शाळा, महाविद्यालयांत पोहोचू शकत नाहीत. तसेच कर्मचाऱ्यांना कामावर वेळेत पोहोचता येत नसल्यामुळे ‘लेट मार्क’ पडत आहे.वेतोशी ग्रामस्थांतर्फे वेळोवेळी एस. टी. प्रशासनाकडे निवेदन देऊन गाडी वेळेवर सोडविण्याची मागणी करण्यात आली आहे. त्याला एस. टी. प्रशासन वाटाण्याच्या अक्षता दाखवत असल्याचे निदर्शनास येत आहे. (प्रतिनिधी)-एस. टी. महामंडळाच्या गलथान कारभाराचा विद्यार्थी, ग्रामस्थांना फटका.-ग्रामस्थांच्या मागणीला एस. टी.कडून वाटाण्याच्या अक्षता.-प्रवाशांनी बसस्थानकात संपर्क साधला असता दूरध्वनी उचलून बाजूला ठेवण्यात येत असल्याचा आरोप.-शाळा, महाविद्यालयातील ४५ ते ५० विद्यार्थ्यांना फटका.