शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अनावश्यक घराबाहेर पडल्यास जप्त हाेणार वाहने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:31 IST

रत्नागिरी : काेराेनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे काेराेनाचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तरीही ...

रत्नागिरी : काेराेनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे काेराेनाचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तरीही अनेकजण गाडी घेऊन अनावश्यक फिरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. या लाेकांवर वाहतूक पाेलीस विभागाने कडक पावले उचलून वाहनेच जप्त करण्याची माेहीम हाती घेतली आहे. रत्नागिरी शहरात तब्बल २५ वाहने जप्त करून पाेलीस मुख्यालयातील मैदानावर आणून ठेवण्यात आली आहेत.

गेले काही दिवस सकाळी ७ ते ११ वाजण्याच्या कालावधीत कोरोना अनुषंगाने कोणतेही नियम न पाळता भाजीपाला व अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली रत्नागिरी व चिपळूण येथील बाजारपेठेत नागरिकांची मोठी गर्दी होत होती. रत्नागिरी शहर व चिपळूण शहर येथील बाजारपेठेत सकाळी ११ वाजल्यानंतर मेडिकल वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत. त्यानंतरही लोकांची व वाहनांची गर्दी होत आहे. अत्यावश्यक कारणांसाठीच बाहेर पडण्याची मुभा असतानाही अगदी क्षुल्लक कारणासाठी लोक वाहनासह मोठ्या प्रमाणावर बाहेर येत येत आहेत.

या पार्श्वभूमीवर जिल्हा पाेलीस अधीक्षक डाॅ. मोहितकुमार गर्ग यांनी रत्नागिरी व चिपळूण येथील बाजारपेठेत तसेच रत्नागिरी जिल्ह्यात अनावश्यक कारणासाठी बाहेर फिरणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हा वाहतूक शाखा व पोलीस स्थानकाला दिले आहेत. तसेच आवश्यक कारणांसाठी बाहेर पडलेल्या लोकांकडूनही वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होत असल्यास त्यांच्यावरही कारवाईचे आदेश दिले आहेत.

या अनुषंगाने ९ मे २०२१ रोजी रत्नागिरी जिल्ह्यात मोटार वाहन कायद्यान्वये एकूण ८८६ वाहनांवर, तर विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्या ३८५ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच रत्नागिरी शहरात अनावश्यक कारणासाठी बाहेर फिरणाऱ्या वाहन चालकांकडील एकूण २५ वाहने जिल्हा वाहतूक शाखेकडून ताब्यात घेण्यात आली आहेत. ती लाॅकडाऊन संपल्यानंतरच संबंधितांना परत केली जाणार आहेत.

--------------------------

कायद्यानुसार कारवाई - ८८६ वाहने - ३,१९,६०० रुपये दंड

विना हेल्मेट - ३८५ वाहने - १,९२,५०० रुपये दंड

--------------------------

काेराेनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिकांच्या आराेग्यासाठी लाॅकडाऊन करण्यात आले आहे. या कालावधीत केवळ अत्यावश्यक सेवांनाच परवानगी देण्यात आली आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये. विनाकारण फिरणाऱ्यांवर वाहतूक शाखेची कारवाई सुरूच राहणार आहे. घरात राहा, सुरक्षित राहा.

- शिरीष सासणे, पाेलीस निरीक्षक, जिल्हा वाहतूक शाखा, रत्नागिरी