शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

आवक घटल्याने भाज्यांच्या दरात चढ-उतार कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:20 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : गेले आठवडाभर पाऊस गायब आहे. मात्र, सुरूवातीला झालेल्या पावसामुळे भाज्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला असून, ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : गेले आठवडाभर पाऊस गायब आहे. मात्र, सुरूवातीला झालेल्या पावसामुळे भाज्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला असून, आवक घटली आहे. त्यामुळे दरात चढ-उतार अद्याप कायम आहे. वाढत्या दरामुळे ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. कोरोना संकटाबरोबर वाढत्या महागाईचा सामना करताना सर्वसामान्य जनता पोळून निघत असून, दरवाढीवर निर्बंध लावण्याची मागणी होत आहे.

भाज्यांची आवक घटल्याने उपलब्धताही कमी आहे. गेल्या आठवड्यात टोमॅटो २० रूपये किलो दराने विकण्यात येत होते, मात्र या आठवड्यात ३० रूपये किलो दराने टोमॅटोची विक्री सुरू आहे. बटाट्याचे दर कमी झाले असून, २० ते २५ रूपये किलो दराने विक्री करण्यात येत आहे. फरसबी १०० ते १२० रूपये तर भेंडी ८० रूपये किलो दराने विकण्यात येत आहे. कोथिंबीर जुडीची २० ते २५ रूपये दराने विक्री सुरू आहे. कांदा २५ ते ३० रूपये किलो दराने विकला असण्यात येत आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतून भाज्यांची आवक होत असून, आवक रोडावल्याने दरावर परिणाम झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.

बाजारात पालेभाज्यांची कमतरता भासत आहे. गावठी भाज्या गायब असून, परजिल्ह्यातून येणाऱ्या पालेभाज्यांची विक्री सुरू आहे. मेथी, पालक, शेपू, माठ आदी भाज्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पालेभाज्यांची जुडी २० रूपये दराने विकण्यात येत आहे. कोथिंबीरची आवक घटल्याने दरात वाढ झाली आहे.

आषाढी एकादशीला काही दिवस शिल्लक असले तरी बाजारात रताळी विक्रीला आली आहेत. ४० ते ६० रूपये किलो दराने रताळ्यांची विक्री सुरू आहे. रताळ्यांना वाढती मागणी आहे.

फरसबी १०० ते १२० रूपये किलो दराने विकण्यात येत आहे. घेवडा ७० ते ७५ रूपये, सिमला मिरची ७० रूपये, गाजरची ६० रूपये किलो दराने विक्री सुरू आहे. लिंबू दहा रूपयांना चार नग विकण्यात येत आहेत. भाज्यांच्या वाढत्या दराने ग्राहक हैराण झाले आहेत.

कडधान्य, डाळींच्या किमती भडकलेल्या असतानाच भाज्यांच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. वाढत्या महागाईवर निर्बंध नसल्याने सर्वसामान्य जनता मात्र यात होरपळून निघत आहे. कोरोना संकटाबरोबरच महागाईत जनता भरडली जात आहे. मात्र, त्याचे सोयरसुतक राजकीय पक्षांना नाही. निवडणूक काळात आमिषांचा पाऊस पाडणारे नेते सध्या गायब आहेत.

- प्राजक्ता शिंदे, गृहिणी

भाज्या, कांदा-बटाट्यासह जीवनावश्यक वस्तूंचे दर सातत्याने वाढत आहेत. इंधन दरात वाढ झाली की, अन्य वस्तूंच्या दरात वाढ होते. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला रोजचा ‘डाळभात’ही महागला आहे. महागाईचा दर निश्चित करताना सर्वसामान्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करणे आवश्यक आहे. वाढत्या दरावर निर्बंध लावणे गरजेचे आहे.

- शर्मिला राठोड, गृहिणी