शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
संजय राऊतांना PM मोंदीचे नेतृत्व, क्षमतेवर शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही?”
3
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
4
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
5
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
6
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
7
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
8
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
9
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
10
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
11
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
12
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
13
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
14
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
15
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
16
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
17
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
18
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
19
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
20
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक

आवक घटल्याने भाज्यांच्या दरात चढ-उतार कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:20 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : गेले आठवडाभर पाऊस गायब आहे. मात्र, सुरूवातीला झालेल्या पावसामुळे भाज्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला असून, ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : गेले आठवडाभर पाऊस गायब आहे. मात्र, सुरूवातीला झालेल्या पावसामुळे भाज्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला असून, आवक घटली आहे. त्यामुळे दरात चढ-उतार अद्याप कायम आहे. वाढत्या दरामुळे ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. कोरोना संकटाबरोबर वाढत्या महागाईचा सामना करताना सर्वसामान्य जनता पोळून निघत असून, दरवाढीवर निर्बंध लावण्याची मागणी होत आहे.

भाज्यांची आवक घटल्याने उपलब्धताही कमी आहे. गेल्या आठवड्यात टोमॅटो २० रूपये किलो दराने विकण्यात येत होते, मात्र या आठवड्यात ३० रूपये किलो दराने टोमॅटोची विक्री सुरू आहे. बटाट्याचे दर कमी झाले असून, २० ते २५ रूपये किलो दराने विक्री करण्यात येत आहे. फरसबी १०० ते १२० रूपये तर भेंडी ८० रूपये किलो दराने विकण्यात येत आहे. कोथिंबीर जुडीची २० ते २५ रूपये दराने विक्री सुरू आहे. कांदा २५ ते ३० रूपये किलो दराने विकला असण्यात येत आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतून भाज्यांची आवक होत असून, आवक रोडावल्याने दरावर परिणाम झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.

बाजारात पालेभाज्यांची कमतरता भासत आहे. गावठी भाज्या गायब असून, परजिल्ह्यातून येणाऱ्या पालेभाज्यांची विक्री सुरू आहे. मेथी, पालक, शेपू, माठ आदी भाज्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पालेभाज्यांची जुडी २० रूपये दराने विकण्यात येत आहे. कोथिंबीरची आवक घटल्याने दरात वाढ झाली आहे.

आषाढी एकादशीला काही दिवस शिल्लक असले तरी बाजारात रताळी विक्रीला आली आहेत. ४० ते ६० रूपये किलो दराने रताळ्यांची विक्री सुरू आहे. रताळ्यांना वाढती मागणी आहे.

फरसबी १०० ते १२० रूपये किलो दराने विकण्यात येत आहे. घेवडा ७० ते ७५ रूपये, सिमला मिरची ७० रूपये, गाजरची ६० रूपये किलो दराने विक्री सुरू आहे. लिंबू दहा रूपयांना चार नग विकण्यात येत आहेत. भाज्यांच्या वाढत्या दराने ग्राहक हैराण झाले आहेत.

कडधान्य, डाळींच्या किमती भडकलेल्या असतानाच भाज्यांच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. वाढत्या महागाईवर निर्बंध नसल्याने सर्वसामान्य जनता मात्र यात होरपळून निघत आहे. कोरोना संकटाबरोबरच महागाईत जनता भरडली जात आहे. मात्र, त्याचे सोयरसुतक राजकीय पक्षांना नाही. निवडणूक काळात आमिषांचा पाऊस पाडणारे नेते सध्या गायब आहेत.

- प्राजक्ता शिंदे, गृहिणी

भाज्या, कांदा-बटाट्यासह जीवनावश्यक वस्तूंचे दर सातत्याने वाढत आहेत. इंधन दरात वाढ झाली की, अन्य वस्तूंच्या दरात वाढ होते. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला रोजचा ‘डाळभात’ही महागला आहे. महागाईचा दर निश्चित करताना सर्वसामान्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करणे आवश्यक आहे. वाढत्या दरावर निर्बंध लावणे गरजेचे आहे.

- शर्मिला राठोड, गृहिणी