शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
5
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
7
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
8
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
9
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
10
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
11
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
12
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
13
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
14
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
15
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
16
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
17
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
18
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
19
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
20
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

आवक घटल्याने भाज्यांच्या दरात चढ-उतार कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:20 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : गेले आठवडाभर पाऊस गायब आहे. मात्र, सुरूवातीला झालेल्या पावसामुळे भाज्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला असून, ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : गेले आठवडाभर पाऊस गायब आहे. मात्र, सुरूवातीला झालेल्या पावसामुळे भाज्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला असून, आवक घटली आहे. त्यामुळे दरात चढ-उतार अद्याप कायम आहे. वाढत्या दरामुळे ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. कोरोना संकटाबरोबर वाढत्या महागाईचा सामना करताना सर्वसामान्य जनता पोळून निघत असून, दरवाढीवर निर्बंध लावण्याची मागणी होत आहे.

भाज्यांची आवक घटल्याने उपलब्धताही कमी आहे. गेल्या आठवड्यात टोमॅटो २० रूपये किलो दराने विकण्यात येत होते, मात्र या आठवड्यात ३० रूपये किलो दराने टोमॅटोची विक्री सुरू आहे. बटाट्याचे दर कमी झाले असून, २० ते २५ रूपये किलो दराने विक्री करण्यात येत आहे. फरसबी १०० ते १२० रूपये तर भेंडी ८० रूपये किलो दराने विकण्यात येत आहे. कोथिंबीर जुडीची २० ते २५ रूपये दराने विक्री सुरू आहे. कांदा २५ ते ३० रूपये किलो दराने विकला असण्यात येत आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतून भाज्यांची आवक होत असून, आवक रोडावल्याने दरावर परिणाम झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.

बाजारात पालेभाज्यांची कमतरता भासत आहे. गावठी भाज्या गायब असून, परजिल्ह्यातून येणाऱ्या पालेभाज्यांची विक्री सुरू आहे. मेथी, पालक, शेपू, माठ आदी भाज्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पालेभाज्यांची जुडी २० रूपये दराने विकण्यात येत आहे. कोथिंबीरची आवक घटल्याने दरात वाढ झाली आहे.

आषाढी एकादशीला काही दिवस शिल्लक असले तरी बाजारात रताळी विक्रीला आली आहेत. ४० ते ६० रूपये किलो दराने रताळ्यांची विक्री सुरू आहे. रताळ्यांना वाढती मागणी आहे.

फरसबी १०० ते १२० रूपये किलो दराने विकण्यात येत आहे. घेवडा ७० ते ७५ रूपये, सिमला मिरची ७० रूपये, गाजरची ६० रूपये किलो दराने विक्री सुरू आहे. लिंबू दहा रूपयांना चार नग विकण्यात येत आहेत. भाज्यांच्या वाढत्या दराने ग्राहक हैराण झाले आहेत.

कडधान्य, डाळींच्या किमती भडकलेल्या असतानाच भाज्यांच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. वाढत्या महागाईवर निर्बंध नसल्याने सर्वसामान्य जनता मात्र यात होरपळून निघत आहे. कोरोना संकटाबरोबरच महागाईत जनता भरडली जात आहे. मात्र, त्याचे सोयरसुतक राजकीय पक्षांना नाही. निवडणूक काळात आमिषांचा पाऊस पाडणारे नेते सध्या गायब आहेत.

- प्राजक्ता शिंदे, गृहिणी

भाज्या, कांदा-बटाट्यासह जीवनावश्यक वस्तूंचे दर सातत्याने वाढत आहेत. इंधन दरात वाढ झाली की, अन्य वस्तूंच्या दरात वाढ होते. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला रोजचा ‘डाळभात’ही महागला आहे. महागाईचा दर निश्चित करताना सर्वसामान्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करणे आवश्यक आहे. वाढत्या दरावर निर्बंध लावणे गरजेचे आहे.

- शर्मिला राठोड, गृहिणी