शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

भाजीपाल्याच्या दरात चढ-उतार सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:30 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : भाजीपाला अन्य जिल्ह्यांतून येत आहे. कोरोनामुळे लाॅकडाऊन सुरू आहे. वादळामुळे कडक संचारबंदी लागू करण्यात ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : भाजीपाला अन्य जिल्ह्यांतून येत आहे. कोरोनामुळे लाॅकडाऊन सुरू आहे. वादळामुळे कडक संचारबंदी लागू करण्यात आल्याने भाजीपाल्याची वाहनेच न आल्याने आवक घटली आहे. भाजी, फळे विक्रेत्यांची फारशी दुकाने सुरू नव्हती. त्यातच संचारबंदीमुळे ग्राहक फारसे नसल्याने भाजीपाल्याच्या दरात चढ-उतार सुरू आहे.

कांद्याच्या दरात वाढ झाली असून १५ ते २० रुपये किलो दराने विकण्यात येणारा कांदा सध्या २५ ते ३० रुपये किलो दराने विकण्यात येत आहे. बटाट्याचे दर अद्याप स्थिर असून २२ ते २५ रुपये किलो दराने बटाटा विक्री सुरू आहे. लसणाची १०० ते १५० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. पावसाळ्यासाठी लागणारा कांदा मे महिन्यात खरेदी करण्यात येत असला तरी दर वाढल्यामुळे ग्राहकांनी कांदा खरेदीसाठी हात आखडता घेतला आहे. भाज्यांचे दरही शंभराच्या पटीत असल्याने विक्रीवर परिणाम झाला आहे. पालेभाज्यांचे दर वाढले आहेत.

वादळामुळे जिल्ह्यात कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे परजिल्ह्यांतून भाजीच्या गाड्याच आल्या नव्हत्या. विक्रेते उपलब्ध भाज्या विकत होते. वादळाच्या भीतीमुळे मोजकीच भाजीची दुकाने खुली ठेवण्यात आली असली तरी ग्राहकही नव्हते. दुपारनंतर भाजीची दुकाने बंद करण्यात आली.

शेवटच्या टप्प्यातील आंबा विक्रीसाठी बाजारात उपलब्ध आहे. लाॅकडाऊनमुळे बाजारात फारसे विक्रेते नाहीत. ऑनलाईन विक्रीवर विक्रेत्यांनी भर दिला आहे. सध्या दर सर्वसामान्यांच्या आवाक्यातील आहेत.

हातगाडी घेऊन अननस विक्रेते गल्लोगल्ली फिरत आहेत. ३० ते ३५ रुपये नग दराने अननस विक्री सुरू आहे. अननसाचा हंगाम असल्याने कच्ची तसेच पिकलेले अननस विक्रीसाठी उपलब्ध आहेत. सोलून, कापून, अखंड अननसासाठी मागणी होत आहे.

गतवर्षीपासून लाॅकडाऊन व त्यातच वाढती महागाई यामुळे दैनंदिन खर्च भागत नसल्याने आगोटसाठी खरेदी कशी करावी असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे मोजक्या पैशातच जुळणी करावी लागत आहे.

- श्रावणी पवार, गृहिणी.

गेल्या दीड दोन वर्षात कडधान्य, डाळी, खाद्यतेलाच्या दरांनी उच्चांक गाठला आहे. महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे. महागाईचा दर निश्चित करताना, सर्वसामान्यांचा विचार करावा.

- रेश्मा जमादार, गृहिणी.